व्यक्ती-परिचय

रसिका जोशी

Category:

 

रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या.

व्यक्ती-परिचय

रवींद्र साठे

Category:

 

सामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.”पिक करपल” हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.

लेखसंग्रह

रंग

Category:

 

आपण आजकाल कृत्रिम रंगांचा वापर जोरात करतो आहे, तर सुरुवातीला लोक फक्त नैसर्गिक रंग वापरत असत. मोहेंजोदारो आणि हडप्पाच्या उत्खननात सापडलेल्या वस्तूंमध्ये अशी भांडी आणि मूर्ती होत्या, ज्या रंगवलेल्या होत्या. त्यांच्याकडे लाल रंगाच्या कापडाचा तुकडाही सापडला. तज्ज्ञांच्या मते, मजिठ किंवा मजिष्ठाच्या मुळापासून तयार केलेला रंग त्यावर लावला होता. हजारो वर्षांपासून, मदिथचे मूळ आणि बक्कम झाडाची साल हे लाल रंगाचे मुख्य स्त्रोत होते. पीपळ, गुलार, पाकड या झाडांवरील लाख अळीपासून महार रंग तयार केला जात असे. हळदीपासून पिवळा रंग व सिंदूर मिळत असे.

व्यक्ती-परिचय

रवींद्र सदाशिव भट

Category:

 

नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत.

अवर्गिकृत

कोकण

Category:

 

कोकणी माणूस  दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते.चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो.माती लाल,रस्ते लाल,पाणदी लाल, चिर्याची घरे लाल,  कौले  सुद्धा लाल,झाडांची पाने आपला मुळचा रंग दडवून   लाल झालेली असतात.

व्यक्ती-परिचय

रवींद्र म्हात्रे

Category:

 

ब्रिटनमध्ये कार्यरत जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या सहयोगी जम्मू-काश्मीर लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी बर्मिंगहम मध्ये त्यांचे अपहरण केले तेव्हा भारतीय राजदूत रवींद्र म्हात्रे पहिल्यांदा ३ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रसिद्धीस आले.

कथा

एक परीस स्पर्श ( भाग – ३१ )

Category:

 

आज जगात राजकारणी, विचारवंत, अभ्यासक, बुवा, बाबा, बापू आणि महाराज त्यासोबत लेखक कवी आणि पत्रकार. विचार तर खूप मांडतात पण प्रत्यक्ष जीवनात तेच त्याच्या विचारांची होळी करताना दिसतात. त्याला हातावर मोजण्याइतके अपवाद असतात. पण जे अपवाद असतात त्यांच्याच वाट्याला खडतर आयुष्य येते.