आपत्ती व्यवस्थापनाची ऐशी तैशी
Category:
अवर्गिकृतआपत्ती व्यवस्थापनाची गरज असल्याचे पटत असूनही राज्यकर्ते ही बाब गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. मुंबईत अलीकडेच झालेल्या क्लोरिन वायू गळती प्रकरणामुळे ही गरज नव्याने अधोरेखित झाली. वाढत्या औद्योगिकरणामुळे विविध धोके संभवत असून आपले जीवन अधिक अनिश्चित बनत चालले आहे. भविष्यात घडू शकणार्या अशा दुर्घटनांशी सामना करण्याची तयारी ठेवली नाही तर कोणताही अनर्थ ओढवू शकेल.