क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ८
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ८

Category:

 

स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, वान्ची अय्यर यासह महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाबात अमरत्वाचे कुंभ घेऊन उडणार्‍या गरूडांच्या पंखात प्रेरणेचं आकाश भरणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विसाव्या शतकातल्या क्रांतीचे प्रणेते.

क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ७
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा’- भाग ७

Category:

 

अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि वांची अय्यर कर्झन वायलीच्या वधाचे सूत्रधार होते स्वातंत्र्यवीर सावरकर! सावरकरांमागे रीतसर सरकारी ससेमिरा चालू झाला. सावरकरांच्या मोठ्या बंधूना क्षुल्लक कारणास्तव काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्यानं क्रांतिकारक चिडीला आले. त्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा काटा काढण्याचं ठरवलं. कामगिरी पत्करली एका कोवळ्या मुलानं- अनंत लक्ष्मण कान्हेरे यानं.

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग ६ मदनलाल धिंग्रा
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग ६ मदनलाल धिंग्रा

Category:

 

बंगालची क्रांतीज्योत पंजाबात पोहोचली. सरदार भगतसिंगचे आजोबा अर्जुनसिंग, वडील किशनसिंग, काका अजितसिंग व पंजाब केसरी लालालजपतराय यांनी ती पेटवली आणि अनेकांनी आपल्या देहाचा अग्नी देऊन ती तेवत ठेवली.

क्रांतिवीरांची अमृतगाथा- भाग ५
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा- भाग ५

Category:

 

क्रांतिवीरांच्या कर्तृत्वाला शाप होता फितूरीचा. या देशात जसे प्राणाची आहुती देणारे राष्ट्रभक्त वीर जन्माला आले तसेच त्यांच्या विरुद्ध फितूर होणारे राष्ट्रद्रोही नतद्रष्टही इथे होतेच. या फितूरांना ठेचणाऱ्या सत्येन बोस, कन्हाई दत्त, चारुचंद्र बसू यांच्या क्रांतीवीरांची अमृतगाथा ऐकुया या भागात.

क्रांतिवीराची अमृतगाथा-भाग ४
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीराची अमृतगाथा-भाग ४

Category:

 

महाराष्ट्राची क्रांतिज्योत बंगालन हाती धरली. राजा राममोहनांपासून बंगालात जनजागृतीचे वारे वाहत होते. त्या वार्‍याला अचूक दिशा दिली स्वामी विवेकानंदांनी. स्वामी विवेकानंदाची विदेशी शिष्या भगिनी निवेदिताच्या प्रेरणेनं बंगालात क्रांतिदलाची सुरूवात झाली. आणि ‘तरुण बंगाल’ बलिदानासाठी सिद्ध झाला, तेव्हा त्याचं नेतृत्व करायला पुढे आले अरविंद घोष. त्यांच्यासह खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी अशा बंगाली क्रांतिकारकांची कहाणी पाहूया या भागात.

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ३
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ३

Category:

 

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीयज्ञात स्वप्राणाची आहुती देण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता. लोकमान्यांचे अग्रलेख सरकार विरुद्ध आग ओकत होते. सार्वजनिक उत्सवातून असंतोषचा वणवा भडकत होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन चाफेकर बंधुनी रॅन्डचा वध करून मृत्यूला कवटाळलं.

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग २
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग २

Category:

 

1857 च्या चक्रीवादळानंतर सारं कसं वरकरणी शांत शांत होतं. पण त्या काळातही क्रांतीच्या ठिणग्या इतस्ततः उडतच होत्या. महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके, पंजाबात रामसिंग कूका, मणिपुरात  टिकेन्दजीत सिंग, बिहारात विरसा मुंडा कीती नावं सांगावीत? याच वीरांपैकी ‘आद्य क्रांतिकारक’ वासुदेव बळवंत फडके आणि ‘भारतीय असंतोषचे जनक’ लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध या भागात घेत आहोत.

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग १
इतर मराठी व्हिडिओज

क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग १

Category:

 

भारतीय स्वातंत्र्ययुद्धात 1857चा उठाव, हे क्रांतीचं पहिलं पर्व मानण्यात येतं. बॅरकपूर छावणीत मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्धातल्या युद्धाची आरोळी ठोकली. सार्जंट ह्यूसन आणि लेफ्टनंट बॉ यांना यमसदनाला पाठवून सुरू झालेल्या या युद्धामुळे 3 मे 1857 रोजी दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाली. दुर्देवाने हा विजय केवळ 133 दिवसांचा ठरला.

ऐतिहासिक

महाकाव्यकालीन विश्वकर्मा शिल्पकार

Category:

 

ज्या कालखंडात रामायण व महाभारत प्रथम लिहिल्या गेले त्या कालखंडातील विश्वकर्मा समाजाचा विचार या प्रकरणात केला आहे. हा कालखंड नक्कीच वैदिक काळाच्या नंतरचा पण बुध्दपूर्व आहे यात शंका नाही. कांही इतिहास तंज्ज्ञांनी इ.स. पूर्व १५०० नंतरचा काळ उत्तर वैदिक काळ मानला आहे. परंतु याच कालखंडात घडलेले रामायण आणि महाभारत नेमके कोणत्या वर्षात घडले या विषयी एक वाक्यता नाही. तसेच ही दोन्ही महाकाव्ये कधी लिहिल्या गेलीत या विषयी सुद्धा एकमत दिसत नाही. तरी या अध्यायात उपलब्ध ग्रांथिक पुराव्यावरुन इ. स. पूर्व १५०० ते इ. स. पूर्व ६०० या ९०० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडातील विश्वकर्मा समाजाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.