ऐतिहासिक

विश्वकर्मा शिल्पकार: वाकाटक-गुप्त काल ते तेराव्या शतकापर्यंत

Category:

 

गुप्त साम्राज्याचा काळ हा अनेक अर्थाने संपन्नतेचा कालखंड समजल्या जातो. या काळात धार्मिक जीवनात तर मोठाच बदल घडून येऊ लागला होता. धर्माच्या अनेक पंथ-उपपंथाची वाढ होऊ लागली होती. जुन्या वैदिक धमाचे स्वरुप पालटत होते. जुन्या वैदिक देवता व यज्ञ-याग हळुहळु लोप पावू लागल्या होत्या. धार्मिक जीवन अव्यक्ताकडून व्यक्ताकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे वळू लागले होते.

ऐतिहासिक

विश्वकर्मा शिल्पकार: समालोचन

Category:

 

विश्वकर्मा समाजाच्या सांस्कृतिक अध्ययनात सर्वप्रथम शिल्पकारांच्या अस्तित्वाचा शोध घेतल्या गेला आणि नंतर अन्य पैलुवर विचार करण्यात आला आहे. विश्वकर्मा शिल्पकारांनी आपल्या कला कौशल्याने धर्म, रुढी, परंपरा, श्रद्धा, दैवते, कुलाचार, नैतीकता, शिष्ठाचार, या सर्व मनो व्यापाराना शाश्वत रुप दिले आणि एका पिढीने जतन केलेली सांस्कृतिक ठेव पुढच्या अनेक पिढींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांनी राष्ट्रीय जीवनच समृद्ध करुन नवोन्मेषाने जगण्याची प्रेरणा दिली. पाषाणात प्रेम, शौर्य, हास्य, करुणा किंवा कोणताही भाव मूर्तीमंत (जसाच्या तसा) कोरणे मोठे अबघड काम आहे. पुराण ग्रंथातील प्रसंगाना सुद्धा मूर्त रुप देऊन पाषाणातून सजीव केल्या गेले, त्यामुळे वाचा नसलेले दगडही बोलते झाले; प्रेक्षकांशी संबाद साधू लागले.

लेखसंग्रह

जे भाग्य मजला लाभले

Category:

 

माझ्या व्यावसायिक निवदेनाच्या कारकीर्दीची सुरुवातच मूळात ग.दि. माडगूळकरांसारख्या श्रेष्ठ कविवर्य गीतकाराच्या शब्दांच्या साथीनं झाली. कार्यक्रम होता ‘चैत्रबन’. श्रीधर माडगूळकरच्या दोस्तीमुळे, अण्णांच्या ‘पंचवटीत’ त्यांना थेट भेटण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच भेटीत अण्णांनी मला एक प्रवासवर्णनपर पुस्तक भेट दिलं. खुद्द अण्णांशी बोलून, त्यांचे लेखनिक बाळ बापट, तसेच सुधीर मोघे, बाबूजी, श्रीधर यांच्याशी गप्पा करता करता, गदिमांच्या गाण्यांमागच्या कहाण्या कळल्या आणि त्या कहाण्या संपादीत करत मी गदिमांच्या चित्रपटगीतांचं निवेदन केलं आणि टाळी मिळवली. पु. ल. देशपांड्यांच्या वाणी आणि लेखणीतून खरेखुरे कविवर्य ग. दि. माडगूळकर सोप्या शब्दात मनात रुजत गेले.

मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश
पर्यटनस्थळे

मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश

Category:

 

हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला  या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.