अवर्गिकृत

बेळगाव आणी गोयकार

Category:

 

गोव्यासाठी बेळगाव फारच जवळच महत्वाचे शहर आहे. आपल्या हारातील मुख्य घटक दुध, भाजीपाला, फळे, अंडी हे गोव्याला बेळगावकरच पुरवितात.

अवर्गिकृत

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Category:

 

कॉलेज व क्रिकेट जीवनातील अनेक चढउतार सुरू असताना माझ्या एका मित्राने मला एक दिवस विचारले, ‘चल येतोस का अक्कलकोटला, श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी ?’
पहिल्यांदाच काहीतरी वेगळे ऐकले म्हणून उत्सुकता व माझा एक मावस काका सोलापूर येथे राहात होता, त्याला भेटण्याच्या ओढीने त्याला हो म्हणालो आणि…श्री स्वामी समर्थांच्या प्रथम दर्शनासाठी निघालो, तेंव्हापासून बहुतेक दरवर्षी जायला लागलो.

लेखसंग्रह

दिवाळीचे बदलते संदर्भ

Category:

 

दिवाळी म्हणजे आठवते ती लवकर उठवणारी आई.उठा उठा दिवाळी आली,मोती साबणाची वेळ झाली असे सांगणारे आजोबा..दिवाळी सणाचे स्वरूप काळानुसार आणि समाजातील बदलांनुसार खूप बदलले आहे. पारंपरिक दिवाळीचा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वावर आधारित होता, तर आधुनिक दिवाळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.

व्यक्ती-परिचय

राजकुमार – विवादाच्या स्टेटमेंटमध्ये अडकलेला सशक्त अभिनेता

Category:

 

राजकुमार हा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अभिनेता होता. त्यामुळे त्याचा अभिनय दुर्लक्षित राहीला. लक्षात राहिले त्याची इतरंबद्दल केलेली विधाने.

साहित्य - ललित

आजपासून दीपावली

Category:

 

दीपावली म्हणजे आपल्या आयुष्याला आकार देणारे एक प्रकाशपर्व ! आनंदाचा मंगलमय अमृतकलश घेऊन येणारे जीवनातील अनमोल क्षण !नवी स्वप्ने , नव्या आकांक्षा यांना मिळणारी सुवर्ण झळाळी म्हणजे हा दीपोत्सव ! आपल्या जगण्याला नवीन भान देणारी , आपल्या तनमनात वज्रशक्ती पेरणारी , नवसृजनाला आवाहन करणारी तेजाची आरती म्हणजे हा दिव्यांचा सण !

कथा

बकासुराची गोष्ट

Category:

 

कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत.
ते ती भिक्षा कुंतीकडे देत. त्यातला एक भाग ती भीमाला देई आणि बाकीच्या भागात कुंती, धर्मराज, अर्जुन, नकूल आणि सहदेव आपला उदरनिर्वाह करीत.

कथा

लंकादहन

Category:

 

रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता. त्याने आपला धाकटा भाऊ ‘सुग्रीव’ याच्यावर फार अन्याय केला होता. रामाने सुग्रीवावरील अन्याय दूर करण्याकरिता वालीला ठार मारले आणि सुग्रीवाला राज्यावर बसविले. या उपकाराची फेड म्हणून सुग्रीवाने रामाला मदत करण्याचे कबूल केले. त्याने आपले आणि इतर वानर राजांचे सारे सैन्य गोळा केले. लाखो वानर वीर गोळा झाले.