व्यक्ती-परिचय

अप्पासाहेब पटवर्धन

Category:

 

अप्पासाहेब पटवर्धन हे प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला.

व्यक्ती-परिचय

हरहुन्नरी कलाकार वैभव मांगले

Category:

 

टाइमपास’ चित्रपटातील ‘नया है यह’ हा डायलॉग म्हटला की डोळ्यांसमोर चेहरा येतो वैभव मांगले यांचा. टीव्ही मालिका, रंगभूमी आणि चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये सध्या सर्वाधिक व्यग्र असलेले अभिनेता म्हणजे वैभव मांगले.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जागतिक निर्वासित दिवस

Category:

 

निर्वासितांच्या वेदनांविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरून संवेदनशीलता निर्माण व्हावी, निर्वासितांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, निर्वासितांच्या मूलभूत मानव अधिकारांचे रक्षण व्हावे या प्रमुख उद्दिष्टांसाठी हा करार करण्यात आला.

साहित्य - ललित

प्रतिकृती (कथा)-भाग-३

Category:

 

गावी पोचायला दोन दिवस लागले. आई शेवटच्या घटका मोजत होती. मला पाहून तिला खूप बरं वाटलं आणि आश्चर्य म्हणजे तिची प्रकृती सुधारू लागली. पण तिने एकच ध्यास घेतला, “बाज्या, आता तू पुन्हा जाऊ नकोस. पुरं झालं ते संशोधन! तुला इथे काय कमी आहे. तू आता इथेच माझ्याजवळ राहा. लग्न कर, मला नातू पाहू दे.” तसं तर मोठा भाऊ होताच. त्याची मुलं पण होती. पण ती कुणाचंच ऐकेना. शेवटी आता ही काही फार दिवसांची सोबती नाही असा विचार करून मी होकार दिला. तिच्या पसंतीची मुलगी पाहून लग्नही केलं.

लेखसंग्रह

हिलिअमची गळती

Category:

 

पृथ्वी जेव्हा जन्माला येत होती तेव्हा पृथ्वीभोवती असणाऱ्या हायड्रोजन आणि हिलिअमयुक्त वातावरणाचा दाब हा, पृथ्वीच्या वातावरणाच्या आजच्या दाबाच्या तुलनेत दोनशे ते तीनशे पट इतका प्रचंड होता! या प्रचंड दाबामुळे याच वातावरणातला हिलिअम वायू हा द्रवरूपातल्या तप्त शिलारसात मोठ्या प्रमाणात विरघळला. त्यानंतर या शिलारसाच्या अभिसरणाद्वारे या हिलिअमचा काही भाग शिलारसाखालील गाभ्यात मिसळला.

लेखसंग्रह

सांगावसं वाटलं म्हणून , त्या भाजीविक्रेत्या

Category:

 

मुख्य बाजारात जाण्याआधी डावीकडे जाणाऱ्या एका रस्त्याने थोडं पुढे आलं की तिथे तीन रस्ते एका ठिकाणी मिळतात . अगदी सकाळी साडेआठ नऊ पासून या जागी त्यांची डेरेदाखल व्हायला सूरवात होते. प्रत्येकीचं अढळपद ठरलेलं असतं. ट्रेनमधून भाजीच्या टोपल्या, बोचकी उतरवून पुढे ऑटोने आपल्या नित्याच्या जागी त्या दाखल होतात आणि आपला भाजीबाजार मांडायला सूरवात करतात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्यापासून चिकू , पेरू, जाम (रानफळ) पिवळ्या सालीची केळी, झेंडूची, जास्वंदीची फुलं अशा बऱ्याच गोष्टी असतात.

साहित्य - ललित

दान आणि मान

Category:

 

वटसावित्री पौर्णिमा.. आम्हा बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा दिवस असतो वडाच्या पुजेची तयारी पारंपरिक पोषाख आणि श्रद्धेने भक्तीने अखंड सौ भाग्याचे लेण मिळावे म्हणून वडाला दान मागायचे असते गावी असतांना वडाच्या पुजेला जात होते पण नंतर मात्र घरीच वटवृक्षाच्या पुजेचे चित्र मिळायचे ते आणून एका खपटावर डकवून पुजा करते आहे आजही फक्त दोरा घेऊन फेरी मारता येत नाही म्हणून त्याचे सातपदरी फोटोतल्या वडाला चिटकवते पूर्वी सात प्रदक्षिणा घालायची आता नाही.