No Picture
लेखसंग्रह

हिन्दी सृष्टीतील फाईट मास्टर- शेट्टी

Category:

 

हिंदी सिनेमा सृष्टीत अनेक फाईट मास्टर झाले पण त्यात सर्वात नावाजलेला होता शेट्टी. कारण तो फाईट मास्टर शिवाय अभिनेता सुद्धा होता.त्याचे नाव होते मुद्दू बाबू शेट्टी. तो मुळचा मंग्लोरचा.लहानपणी त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते. म्हणून त्याच्या  वडिलांना काळजी होती. त्यांनी त्याला मुंबईला पाठवले.त्यावेळी तो केवळ 9 वर्षाचा होता.मुंबईला आल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. त्याला कॉटन ग्रीन येथे टाटाच्या canteen मध्ये वेटरची नोकरी मिळाली.जेवण व थोडे पैसे याची सोय झाली.प्रसिद्ध जिम्नॅस्टिक् के.एम.मंडन याची भेट झाली.शेट्टीची शरीरयष्टी बघून त्यांनी त्याला बॉक्सिंग चे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.त्यात तो चम्पिअन बनला.सलग आठ वेळा त्याने मुंबईतील बॉक्सिंगची स्पर्धा जिंकली.याच वेळी अभिनेता भगवान यांची नजर त्याच्यावर पडली.त्यांनी शेट्टीला बोलावले व त्यांचे सहकारी बाबुराव पहेलवान यांच्या बरोबर फाईट सीन घेतले व त्याला 200 रुपये दिले.

No Picture
लेखसंग्रह

मंगळावरचे आवाज

Category:

 

बॅप्टिस्ट चाइड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून मंगळावर आवाजाला ‘दुहेरी’ वेग असल्याचं तर दिसून आलं आहेच; परंतु त्याचबरोबर आणखी एक गोष्ट निदर्शनास आली आहे. ती म्हणजे, सर्वच प्रकारच्या आवाजाच्या वेगात दिवसातील वेळेनुसार होणारा लक्षणीय बदल. मंगळावरच्या सकाळनंतर सर्वच ध्वनिलहरींचा वेग हळूहळू वाढत जाऊन मध्यान्हीच्या सुमारास तो कमाल पातळी गाठतो. त्यानंतर कमी होत-होत संध्याकाळपर्यंत तो बराच कमी झालेला असतो.

No Picture
साहित्य - ललित

माझे शिक्षक – भाग १ (आठवणींची मिसळ १५ )

Category:

 

शिक्षक म्हणजे गुरू.दत्तात्रेयांनी २४ गुरू केले असे म्हणतात.अनेक सुप्रसिध्द गायकांनी दोन-तीन गुरू केल्याचे सांगितले आहे.जो जो आपल्याला कांही शिकवतो, तो आपला गुरू, अशी व्याख्या केली तर आई-वडिलांपासून सुरूवात करून ह्या वयातही आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या पत्नीपर्यंत असंख्य गुरू आपल्याला आठवतील.अगदी लोकलच्या प्रवासांत चपळाईने चौथी सीट कशी मिळवावी हे शिकवणाऱ्या गुरूचीही आठवण होईल.पण शाळा कॉलेजमधे जे आपल्याला शिकवतात, तेंच आपले अधिकृत गुरू, म्हणजेच शिक्षक.अगदी बिग्रीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत खूप शिक्षक आपल्याला भेटतात.कांही कायम लक्षात रहातात.कांहीना विसरावसं वाटत पण विसरतां येत नाही.आपल्याला घडवण्यात आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो.

No Picture
साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५८ – सरला बहन

Category:

 

१९३२ साली भारतात आल्या. भारतात आल्यावर दोन वर्षे उदयपूर येथे एका शाळेत काम केले. त्यानंतर त्या गांधीजीसमवेत सेवाग्राम येथे आल्या. तिथे त्यांनी ८ वर्ष काम केलं. पण वर्ध्याचे वातावरण त्यांना फार पोषक ठरले नाही, इथल्या उन्हाने त्यांची वारंवार तब्येत बिघडू लागली, मग त्या कसोली, अलमोडा येथे आल्या. कुमाऔ घाटीतल्या महिलांसाठी त्यांनी फार मोठे काम उभे केले. त्याच बरोबर जंगल तोडी विरोधात सुद्धा मोठी मोहीम राबविली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात कुमाऔ जिल्ह्या त्यांनी एकत्रित आणला, तिथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटविली. त्यांचे नेतृत्व केले, परिणामी त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. त्याचा अवधी एकूण दोन वर्षांचा होता.