व्यक्ती-परिचय

नटसम्राट नानासाहेब फाटक

Category:

 

विद्यार्थीदशेतच १९१५-१६ च्या सुमारास नानासाहेबांनी ‘ महाराष्ट्र हितचिंतक भ्रातृमंडळ ‘ या हौशी नाट्यसंस्थेने केलेल्या काकासाहेब खाडिलकर यांच्या ‘सत्वपरीक्षा ‘ या नाटकात विश्वामित्राचे काम केले. ही त्याच्या आयुष्यातील पहिली भूमिका , ही पहिलीच भूमिका खलनायकाची होती.

व्यक्ती-परिचय

धीरूभाई हिराचंद अंबानी स्मृतिदिन

Category:

 

यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले.

व्यक्ती-परिचय

दुर्गाबाई भागवत

Category:

 

त्यांनी संशोधनपर , समीक्षात्मक , वैचारिक , कथा , चरित्र, संपादन , अनुवाद, बालसाहित्य , ललितगद्य असे विविधअंगी लेखन केले. त्यांची सुमारे सत्तर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दुर्गाबाई विणकाम, भरतकाम, स्वयंपाक यामध्ये पारंगत होत्या . त्यांनी काही नव्या पाककृतीही शोधून काढल्या आहेत. दुर्गाबाईंचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. तर हायस्कुलमधील शिक्षण अहमदनगर, नाशिक, धारवाड आणि पुणे यथे झाले. त्यांनी ‘ अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस ज्यूरिसप्रूडन्स ‘ हा विषय घेऊन एम.ए केले. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी महात्मा गांधींच्या चळवळीतही भाग घेतला होता. भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या त्यांच्या भगिनी होत्या. दुर्गाबाईचे फ्रेंच, जर्मन, संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते.

व्यक्ती-परिचय

दिग्दर्शक अदूर गोपाल कृष्णन

Category:

 

अदूर गोपालकृष्णन यांचे जास्त चित्रपट केरळमध्ये प्रदर्शित झालेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांना केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे , भारत सरकारने त्यांना पदमश्री आणि पदमविभूण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. चित्रपट क्षेत्रामधील मोठा सन्मान समजला जाणारा दादासाहेब फाळके सन्मान त्यांना मिळालेला आहे

व्यक्ती-परिचय

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

Category:

 

भारतीय एकात्मतेची पुष्टी करणारी विधायक अध्ययनदृष्टी, आंतरशाखीय अभ्यासपद्धती ही ढेरे यांच्या विचाराची, लेखनाची वैशिष्ट्ये होती. एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे त्यांनी सारे आयुष्य संशोधन, लेखन यांसाठी दिले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

व्यक्ती-परिचय

ट्रॅजिडी किंग अभिनेते दिलीपकुमार

Category:

 

पेशावर मधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ

Category:

 

असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट

Category:

 

एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचा स्मृतिदिन

Category:

 

‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक कांबळी यांच्या नाट्यप्रवासात महत्त्वाचा टप्पा ठरले. ‘वात्रट मेले’हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सादर केलेला ‘हसवा फसवी’ हा कार्यक्रम रसिकांच्या लक्षात असेल. प्रभावळकर यांनी यात सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. कार्यक्रमात सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत नाटक तोलून धरणारी ‘वाघमारे ’ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती. ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांनी ती भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने खुलविली. म्हटले तर भूमिका ‘रिप्लेसमेंट’ची होती. कारण आधी ही भूमिका रमाकांत देशपांडे व नंतर डॉ. हेमू अधिकारी आलटून पालटून करत होते. या दोघांनाही काही कारणाने ती करणे शक्य झाले नाही आणि ती भूमिका लीलाधर कांबळी यांच्याकडे आली आणि कांबळी यांनी ती समर्थपणे पेलली.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचा स्मृतिदिन

Category:

 

मधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत मामा म्हणत असत. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात मुंबईत शाळेपासून झाली. शेठ आनंदीलाल पोद्दार ही त्यांची शाळा. शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला नाटकात काम करण्याची आवड असल्याचे त्यांनी वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. चिं. वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक मामांनी बसवले. दिग्दर्शन आणि अभिनयाची सुरुवात तिथूनच झाली. नंतर झालेल्या अनेक स्नेहसंमेलनात, अन्य कार्यक्रमांत नाटक बसवण्याची जबाबदारी मामांवरच आली जी त्यांनी यशस्वी पार पाडली.