प्रजेची सत्ता ?
Category:
लेखसंग्रहदेश असो कि समाज तो लोकांनी मिळून बनत असतो.. हेच लोक यंत्रणेतही असतात. त्यामुळे कोणतीही शासनव्यवस्था टिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी, प्रगल्भ करण्यासाठी ‘लोक’ समंजस आणि जागरूक असणे फार गरजेचे असते. जशी प्रजा असेल तसेच त्यांना राज्यकर्ते मिळत असतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे, देशाच्या एकंदर परिस्थिती बाबत दोष देण्यासाठी आपण एखाद्याकडे बोट दाखवणार असू, तर चार बोटे आपल्याकडेही आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे.