No Picture
लेखसंग्रह

श्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व

Category:

 

श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. अशा प्रकारचे कर्तृत्त्व गाजवणारे ते एकमेव सेनापती आहेत. त्यामुळेच मराठा साम्राज्य विस्तारुन मध्य प्रदेश पार करुन राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहोचले होते. आजच्या युद्धशास्त्राच्या अभ्यासकांना त्यांच्या लढायांचे सुत्र अभ्यासण्यासारखे आहे. बाजीराव हे अतिशय युद्धकुशल सेनापती होते. युद्धातील त्यांचे डावपेच चाकोरीबाह्य होते.