व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर

Category:

 

त्यांनी ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. कोकणासह राज्य, देशातीलही अनेक धांडसी विषयांचे कव्हरेज दिनेश केळुसकर यांनी केले आहे.

व्यक्ती-परिचय

लेखक जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद

Category:

 

तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली.

साहित्य - ललित

संधीचं सोन! – Part 1

Category:

 

‘सगळं नीट लक्षात ठेवा. ती यादी घ्या बरोबर. ‘राधाक्कांनी बजावले. आज तायडीचा म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीचा साखरपुडा. मोठी म्हणजे मुलीत मोठी. दोन मुली, त्यात तायडी मोठी. बबडी छोटी. दोन मोठे भाऊ – राहुल आणि केदार. दोघांचीही लग्न होऊन ते परदेशी. तायडीचं लग्न तसं उशिराच जमलं. हुषार, सुंदर, गोरीगोमटी मुलगी पण मंगळ कडक. लोक कितीही सुधारले तरी हे मंगळ, राहू, केतु मात्र अजूनही बोडक्यावर बसतात. त्यामुळे बबडीचं पण लग्न लांबणीवर पडत होतं. तिला मंगळ फिंगळ काही नव्हता, दिसायलाही तायडीपेक्षा अंमळ जास्तच सुंदर, काही स्थळांकडून आडून आडून विचारणाही झाली होती पण आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं!’ असा बबडीचा बाणा होता. शेवटी तायडीला पत्करणारं एक बेणं मिळालं. म्हणजे बेण्यांच्या शरदने तिला पसंत केलं. त्याचा मंगळ म्हणजे तायडीच्या मंगळापेक्षाही भारी होता! राधाक्का बेण्यांना म्हणाल्या, ‘ते मंगळ फिंगळ तुमचं काय ते पहा, आम्ही पत्रिका पहात नाही.’

व्यक्ती-परिचय

भाजपाचे खासदार कपिल पाटील

Category:

 

खासदार कपिल पाटील यांचा विकासात्मक दृष्टिकोन ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. कपिल पाटील यांच्या व्हिजनमुळे ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, एमएमआरडीएने ग्रामीण भागासाठी दिलेला निधी, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आदी कार्य ही कपिल पाटील यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष आहे.

व्यक्ती-परिचय

सी. डी. एस. अधिकारी बिपिन रावत

Category:

 

रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली होती. त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या आणि ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक काम करत होते. बिपिन रावत म्हणत असतत, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता ते भारतातील पहिले सीडीएस अधिकारी म्हणूनही काम करत होते.

दिनविशेष

नो सेल्फी डे

Category:

 

नॉटिंगहॅम ट्रेन्ट विद्यापीठ व तामिळनाडूची त्यागराजर स्कूल मॅनेजमेंट या संस्थांनी २०१४ मध्ये सेल्फिटिसची चर्चा सुरू झाल्यानंतर याबाबत संशोधन सुरू केले. सेल्फिटिस हा मानसिक रोग असल्याचे वर्गीकरण पहिल्यांदा अमेरिकन सायकिॲ‍कट्रिक असोसिएशनने केले होते. आता सेल्फिटिस वर्तन हा रोग असल्याचे ठोसपणे सांगण्यात आले आहे.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ लेखक बापू वाटवे

Category:

 

‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.

व्यक्ती-परिचय

रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे

Category:

 

ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.