कथा

कथातरंग – अनुपच्या शब्दात सल्ला

Category:

 

साधारण पांच एक वर्षांपूर्वी धोंडीबा कडे सहा एकर बागायती शेती होती, आणि शेताच्या एका कोपर्‍यात तीन खोल्यांचे छोटेसे पण देखणे असे कौलारू घर होते. त्यात धोंडीबा, राधा आणि त्यांची एक मुलगी राहत असे. दिवसभर कष्ट करून त्याने हे माळरान नंदानवनात फुलवले होते. कोणाकडे काही मागायची गरज पडणार नाही अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालला होता.

लेखसंग्रह

पेट्रोरसायनांची गरज केव्हापासून पडू लागली?

Category:

 

माणूस हा निसर्गाचे बालक आहे. त्यामुळे तो सर्वस्वी | निसर्गावर अवलंबून आहे. त्याला शेती करायला लागून जेमतेम ८-१० हजार वर्षे झाली आहेत. पण त्या आठ-दहा हजार वर्षापूर्वीपासून ते अगदी ५०-१०० वर्षापूर्वीपर्यंत शेतीतून मिळणारी धान्ये, कापूस, रबर, इंधनासाठी लाकूड या सगळ्या गोष्टी त्याला पुऱ्या पडत भारताची असत.

लेखसंग्रह

टीव्हीच्या आठवणी…

Category:

 

पाचेक वर्षे झाली.. जवळपास टीव्ही पाहताच नाही! अगदी खास असं कारण नाही, पण वडिलांच्या हातातला रिमोट माझ्याकडे येता येता टीनेज मुलाच्या हाती गेला, मग बातम्या आणि फुटबॉल मॅचेसच्या मध्ये माझ्या आवडीच्या प्रोग्रॅमचं सँडविच व्हायला लागलं! त्यातच टॅब घेतला होता, त्यावर आवडीचं सगळं हेडफोन कानाला लावला की बघता यायला लागलं..

लेखसंग्रह

भारतात पेट्रोलियम उत्पादने आणि पेट्रोरसायने कोठे बनतात?

Category:

 

भारतातील पहिले तेल शुद्धिकरण केंद्र आसाममध्ये सुरु झाले. त्याला आता १०७ वर्षे झाली.मधे काही वर्षे हे तेल शुद्धिकरण केंद्र बंदही पडले होते. पण परत ते सुरु झाले. या तेल शुद्धिकरण केंद्रातील पदार्थ जनतेच्या मागणीएवढे नसत, त्यामुळे या पदार्थांची फार मोठी आयात करावी लागे. शिवाय एकेका काळाची अशा पदार्थांची गरजही वेगवेगळी .असे.१९०० सालाच्या सुमाराला जेव्हा मोटर गाडया जवळ जवळ नव्हत्या तेव्हा पेट्रोल हा टाकाऊ पदार्थ होता आणि केरोसिनला मोठी मागणी होती कारण ते कंदीलासाठी लागे.

लेखसंग्रह

मृदू, कठीण, जड पाणी

Category:

 

कठीण पाणी, जड पाणी असे अनेक शब्द आपल्या ऐकिवात आहेत. आज त्यांची माहिती करून घेऊ. पावसाचे पाणी जमिनीतून झिरपताना पाण्यात कॅल्शिअम, मॅन्गनीज (Ca2+, Mg2+) इत्यादी द्विभारीत धातूंचे क्लोराईड, सल्फेट, बायकार्बोनेट आदी क्षार पाण्यात विरघळतात. अशा पाण्याला क्षारयुक्त कठीण पाणी म्हणतात. ज्यात असे क्षार नगण्य प्रमाणात असतात ते मृदू पाणी. सोडिअमचे क्षार असल्यास मात्र पाण्याला कठीणपणा प्राप्त होत नाही.

लेखसंग्रह

मूल्ये- जीवनाला अर्थ देणारे इंधन!

Category:

 

मूल्ये नजरेला स्वच्छ करतात आणि एकाग्रता बहाल करतात. त्यामुळे पुढची वाट सुस्पष्ट दिसू लागते. स्व-जाणिवा जागृत झाल्या की आयुष्य अधिक खरं आणि कृतार्थ वाटायला लागतं. विकसित केलेली मूल्यव्यवस्था म्हणजे होकायंत्र! रस्ता हरपल्यावर आपल्याला दिशादर्शन करण्याचे आणि त्याद्वारे योग्य मार्गावर आणण्याचे कार्य आपली जीवनमूल्ये करीत असतात.