साहित्य - ललित

अवघा रंग एक झाला !

Category:

 

किशोरीताई गेल्या….. यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले….. आज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा आहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ? अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्‍यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात….. रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो

साहित्य - ललित

बनगरवाडीचा लेखक – व्यंकटेश माडगुळकर

Category:

 

मी वाचन सुरु केल्यानंतर पहिल्या उत्साहात खूप पुस्तकं वाचली. खुप म्हणजे बरीच पुस्तकं वाचली. अक्षरशः एका दिवसात चारचाराशे- पाचपाचशे पानाची पुस्तकं मी संपवली आहेत. तो उत्साह आता कुठे गेलं कळत नाही. असंच एक दिवसात मी एका बैठकीत ‘बनगरवाडी’ हे पुस्तक वाचून काढलं होतं. जी अनेक पुस्तकं कायम लक्षात राहतात त्यापैकी बनगरवाडी हे आहे. मल वाटत नाही कि ती कादंबरी वाचताना लागलेला वेळ आणि मिळालेला आनंद कधी विसरला जाईल. सगळं आयुष्य लहानपणापासून शहरात गेलेलं आहे. आणि बनगरवाडीची सगळी गोष्ट त्या ग्रामीण भाषेत आहे. त्यामुळे सुरवातीला ती भाषा आणि ते जीवन अनभिज्ञ वाटत राहतं. पुस्तकातल्या जीवनामध्ये जो जिवंतपणा आहे तसाच आपल्या रोजच्या जगण्यातही आहे.

साहित्य - ललित

श्रद्धांजली…. महाराजांना !!

Category:

 

आज ३ एप्रिल ! हृदयाच्या एका कप्प्यात कायम विराजमान असणार्‍या आमच्या महाराजांची आज पुण्यतिथी ! (म्हणजे महाराजांच्या पुतळ्याला हार घालून , पेपरमध्ये आपला फोटो छापून आणण्याचे राजकारण्यांची पुण्य पदरात पाडून घेण्याची तिथी !)

३३७ वर्षे झाली या दु:खद घटनेला , पण का कुणास ठाऊक मन एकदम ३३७ वर्षांनी मागे जातं आणि कुठल्याश्या अनामिक भावनिक सेतूनं ते आसन्नमरण अवस्थेतल्या त्या श्रीमंत योगीश्वराच्या मनाशी एकरूप होऊन सांगू लागतं.

साहित्य - ललित

माझी कोकणची सहल – पावशीच्या जंगलात काढलेली एक रात्र

Category:

 

डॉ. बापू भोगटे हा जनावरांचा डॉक्टर. मुंबईतली चांगली ‘गोदरेज’ मधली नोकरी सोडून आपल्या गावी म्हणजे कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावात स्थायिक झाला..थोडे पैसे गुंतवून काजू, बांबूची लागवड सुरु केली..वेळ मिळेल तसा खांद्यावर बंदूक लटकावून जंगलात घुसायच आणि मनमुराद भटकायचं हा याचा छंद..बंदूक स्व-संरक्षणासाठी, शिकारीसाठी नव्हे..असाच शहरतील काही मित्रांसमवेत एकदा जंगलात गेला असता त्याला जंगलात जंगलात मुक्काम करण्याची कल्पना सुचली व लगेच दुसऱ्या दिवशी बापूने ती अमलातही आणली. सोबत तेच शहरातले मित्र होते..ते तर जंगलातील मुक्काम ह्या कल्पनेनेच वेडे झाले होते व ती रात्र त्याची जंगलात काढली..त्याचे फोटो बापूने फेसबुकवर टाकलेले मी पहिले आणि एकदा तरी बापुसोबत जंगलत मुक्काम करण्याचा निश्चय केला आणि लगेच काही दिवसात तो अंमलातही आणला. हरकुळ खुर्दच्या नंतरचा मुक्काम आम्ही बापूकडे पावशीच्या जंगलात करण्याच ठरवल होत..

साहित्य - ललित

मला भेटलेली माणसं – दिल्लीचा सचिन

Category:

 

बरोबर एक वर्षापूर्वी मी माझ्या कुटुंबासहीत दिल्ली-हरीद्वार-ऋषिकेशची अक छोटीशी सफर केली होती. ट्रेनमधून जाताना दिसलेल्या जाहिरातीं व त्यातून मला उमगलेल्या तिथल्या लोकांच्या मानसिकतेवर मी एक लहानसं भाष्यही केलं होतं..ते काहीसं नकारात्मक होतं, पण चाच प्रवासात एक सकारात्मक गोष्टही घडली होती आणि मी ती साफ विसरूनही गेलो होतो. चांगल्या गोष्टी माणसं लगेच विसरतात आणि वाईट मात्र लक्षात ठेवतात या सर्वसामान्य मनुष्यस्वभावाला अनुसरून मी वागलो..ती चांगली गोष्ट सांगणं माझं कर्तव्य आहे..

साहित्य - ललित

माझी कोकणची सहल – कोकणचं ‘जरा हटके’ रुपडं

Category:

 

कोणताही पाणवठा रात्रीच्या वेळेस असाही गुढगर्भ वाटतोच परंतू हरकुळ खुर्दच्या ह्या तलावास देवाधर्माने भारलेल्या कोकणाची पार्श्वभुमी असल्यामुळे या जलाशयास एक वेगळेच परिमाण मिळाले होते..सर्वांचीच समाधी लागली होती..हा आनंद शब्दात नाही उतरवता येत.

पुन्हा घरी आलो आणि तांदळाच्या ऊन ऊन भाकरी, काळ्या वाटण्याची (चिकनचा मसाला घालून केलेली) भाजी, वरण आणि भात खाऊन निवांत झोपी गेलो. हे आणखी एक वैशिष्ट्य. रासमांकडे प्राधान्यांने केवळ कोकणी पदार्थच रसदार कोकणी मसाल्यांमधे करून दिले जातात.

साहित्य - ललित

शिवी; एक अत्यावश्यक मानसिक गरज..

Category:

 

आमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या ‘व्यवस्थे’ला दिलेल्या शिव्या असतात..