लेखसंग्रह

आयुष्यात रिटेक नाही.. वन टेक ओके हवा

Category:

 

पिक्चरच्या शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न हवंहवंसं जगलं तर…?

लेखसंग्रह

महात्मा गांधी यांना अनावृत्त पत्र

Category:

 

आदरणीय महात्माजी,  विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे.

लेखसंग्रह

अनसेफ मोड’ मधले आपण

Category:

 

आपण सध्या unsafe mode मध्ये व्यवहार करीत आहोत.तुमचे लोकेशन, डेबिट कार्ड ,क्रेडीट कार्ड ,online खरेदी ,whats app ,फेसबुक या सर्व नव्या गोष्टींचे अप्रूप असल्याने आपण त्या सर्वांच्या आहारी गेलो आहोत .तुम्ही फेसबुक वरून सुद्धा लॉग इन करून खरेदी करू शकता. तुमचे लोकेशन ,तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर ,सर्व काही सार्वजनिक झाले आहे.

लेखसंग्रह

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण..!

Category:

 

प्रत्येकजण आपल्याला आयुष्यात त्याच्या पद्धतीनुसार जगत असतो. आपल्याला मिळालेल्या आयुष्यावर खूपदा तो नाखूष असतो. तथाकथित सुखाचा सदरा मला का नाही मिळाला ? असा गैरसमज करून घेत आपण आपल्या आयुष्याला दोष देत बसतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारला कि उत्तर आपोआप समोर येते..!

लेखसंग्रह

महात्मा, मुन्नाभाई ते संजू

Category:

 

महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार.

लेखसंग्रह

सोशल मीडियाचा काळा ‘फेस’!

Category:

 

सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे.

लेखसंग्रह

“गटारी” अमावस्या म्हणजे आपली “दीप अमावस्या”

Category:

 

आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे.