कथा

माणसा किती रे तुझा स्वार्थ

Category:

 

एकदा एक वाघ आणि वाघीण पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.

कथा

खर प्रेम काय असत

Category:

 

एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता. त्याने पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक हरीणी त्याच्या शेजारी येऊन बसली. जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे. एक दिवस गेला. दोन दिवस गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. धनगर जसजसं ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे येऊन जवळ बसुन रडु लागायची. मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता मध्येच थांबला. ती हरीणी रडणं थांबवुन निघुन जाऊ लागली. त्याने पुन्हा वाजवायला सुरुवात केली. हरीणी पुन्हा जवळ आली. धनगराने हरीणी समोर हात जोडले आणि म्हणाला, माझं काही चुकतं का गं? मी कित्येक दिवस बघतोय जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो. तेव्हा तेव्हा तु ईथे येऊन रडतेस. कारण काय आहे. सांगना माझं काही चुकतं का गं?

कथा

गरीबी आणि जिद्द

Category:

 

विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.

कथा

गुडमाॅर्नींग पथक आणि मास्तर

Category:

 

पहाटं पहाटं कावळे मास्तर नि शेरगाव गाठलं. झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर. गाडी उभी केली.उपरण्याने आळपलेले थोबाडं मोकळ केल. इकडं तिकडं पाहिलं .कुणाचाच पत्ता नव्हता. कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता. सीयोची आडर असल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून…

आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू…

आता हे बसले तंबाखू मळीत पण पंचायत बायांची झाली. बायाच्या हागणदारीच रस्ताचं ग्रमपंचायती म्होरून जातो.तिथंचं हे मास्तरं उभं टाकलं.बरं लयं उशीर झाला की मग पंचाईतच व्हती बायांची. झावळात उरकून यावं लागतं.नाहीतर सकाळ सकाळ झॅक होऊन बरीचं गडी ग्रमपंचायती म्होरं थांबत्यात. खंडाची खंडाच असतो.उग उग चकाटया पिटीत बसलेला. तसल्या ख॓डयातून जमतं असतं व्हयं कुठं बायाला पोरीला टरमेल घेऊन जायला ? पाच सहा महिने झालं असलं. काळयाची सून अशीचं परसाकडं चालली व्हती.ते पवाराचं येडकोंढूळ माग माग गेलं. हासलं. पवारचं घर तसलं डेंजर..
दहा बारा जणांनी मरणाचं चेचलं.केसी भानगडी झाल्यात.बसलेतं खेटं देत कोर्टात…बाया तरी काय करत्याल ?

कथा

कथा आणि व्यथा – तहान

Category:

 

त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं याडया बाभळीची झाडे होती.त्याला पानं नव्हती राहीली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती.

गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या. बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती. त्यातल्याचं काही थोराडं पोरी, बायानं मात्र डर्म, डब्बे, कळश्या बकेटा काढल्या. आता तिथचं संसार थाटणारं होतं. त्यांना पाणी लागणारं होतं. हे कुठून पाणी आणणार ? मलाच प्रश्न पडला.त्या पटांगणात कुठं ही सार्वजनिक नळ नव्हता.हापश्या ही बंद होता. नळाला पाणी यायचं ही पंधरा दिवस बंद झाले होते.टॅकरने पाणी पुरवठा होतं होता.