C-##
शिक्षणसम्राटाचे वारस
Category:
लेखसंग्रह
आत्मा हरवलेली पत्रकारिता !


Category:
लेखसंग्रहमराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. मराठी पत्रकारितेची ही थोर परंपरा पुढे लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निळकंठ खाडिलकर, ह. रा. महाजनी, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, माधवराव गडकरी, कुमार केतकर यांनी पुढे सुरू ठेवली. या पवित्र व्यवसायाचा धंदा न करता एका समर्पित भावनेने सुरू असलेली पत्रकारिता आता तशी उरली आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माझी पत्रकारिता तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळीत प्रथम दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ आणि नंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांचे मला भरभरून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. लोकसत्ताचे तत्कालिन सहसंपादक चंद्रशेखर वाघ हे ऋषितुल्य पत्रकार माझे पत्रकारितेतील गुरु ! हाताने लिहिलेल्या बातम्यांचे कागद रोज सकाळी त्यांच्या घरी नेऊन द्यायचे आणि नंतर बँकेत कामावर हजर व्हायचे असा रोजचा दिनक्रम होता. लिहिलेल्या बातम्या, वृत्तांत ते वाचून काढायचे आणि मला समोर बसवून त्यातील चुका आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. त्यातूनच पुढे पत्रकारितेचा प्रवास उलगडत गेला आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा अनेक कुप्रथांवर कोणाचीही भिडभाड न बाळगता बिनधास्तपणे उजेडात आणायचे नैतिक बळ मिळत गेले.
व्यंगचित्राची ताकद
Category:
लेखसंग्रहभारतामध्ये व्यंगचित्र कलेची फार मोठी परंपरा आहे. १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या देशात वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रे, हास्यचित्रे प्रकाशित होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात राजकीय विषय व समाज प्रबोधन यासाठी ह्या माध्यमाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. मात्र त्या काळात छपाईचे तंत्र फारसे प्रगत नव्हते. प्रत्येक चित्राचा वेगळा ठसा (ब्लॉक) बनवून छपाई केली जात असे. एकदा व्यंगचित्र प्रकाशित झाल्यावर त्या ब्लॉक/ ठोकळ्याचा काहीही उपयोग होत नसे म्हणून छोट्या दैनिकांना/ छोट्या मासिकांना व्यंगचित्र छपाईचा खर्च करणे परवडत नसे. त्यामुळे देशात व महाराष्ट्रात फारच कमी व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्र रेखाटणे हा पूर्ण वेळेचा, पोटापाण्याचा व्यवसाय नसल्याने व्यावसायिक चित्रकारच कधीतरी गरजेप्रमाणे व्यंगचित्रे रेखाटून देत असत. फारच मोठ्या दैनिकांकडे/ प्रकाशन संस्थांकडे निवडक व्यंगचित्रकार नेमण्याची ऐपत असे.
अग्रलेखांचा दबदबा

Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.
आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.
मोबाईल – एक खाजगीपण
Category:
लेखसंग्रहकाल परवाचीच गोष्ट एकजण एका जुन्या मित्राशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना तो म्हणाला मला अमुक तमुक अँप वर फोटो टाकता येत नाही. काहीतरी शोधण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला , पण ते अँप मी ओपन करताच घाई घाई ने त्याने माझ्या हातून मोबाईल घेतला.
हे तुमच्याही बाबतीत किंवा घरात घडले असेल, अगदी नवरा बायको ह्यांच्या बाबतीत देखील.. माझ्या फोन ला हात का लावला वगैरे. मी तर माझा फोन कधीच लॉक करत नाही पासवर्ड ने.
साला आपली जिंदगी तो खुली किताब हैं.
बायको मात्र नेहमी ह्या न त्या कारणाने माझा फोन घेते, तिचा फोन मात्र लॉक असतो , मला तिने अनेक वेळेला तिचा पासवर्ड सांगितला पण तो मी विसरतो म्हणा लक्षात ठेवायची गरज भासत नाही.
‘संकल्प’ आणि संकल्प सिद्धी ?


Category:
लेखसंग्रहडिसेंबर महिना चालू झाला की ‘संकल्पाचे’ वारे सुरू होतात . मी सुद्धा पंधराव्या वर्षापासून काही ना काही संकल्प करायचा ठरवीत असे . पण अनेक वेळा जानेवारी महिना संपण्यापूर्वीच तो मोडलेलाच असायचा. संकल्प करणे म्हणजे काय? संकल्प म्हणजे ‘कृती’ नव्हे. ती गोष्ट प्रत्यक्षात आणता आली पाहिजे.
शाळेत असताना खूप अभ्यास करून खूप खूप गुण मिळवायचे असा माझा संकल्प असे . पण गणपती ,नवरात्र , दिवाळी आणि डिसेंबर मधल्या सहली , स्नेहसंमेलन , क्रीडा स्पर्धा यात मी इतकी गुंतली जात असे की , मी केलेल्या संकल्पाचा मलाच विसर पडत असे .
महाविद्यालयात गेल्यावर इंग्रजी माध्यम असणार , तेव्हा आपल्याला इंग्रजीचे ज्ञान असणं आवश्यकच आहे . म्हणून मी इंग्रजी- मराठी शब्दकोशातून पाच-सहा शब्द , त्यांचा उच्चार आणि अर्थ जाणून लक्षात ठेवत असे . हळू हळू हा संकल्प सुद्धा अर्धवटच सोडला गेला .
आई पोळी भाजी करायला मुद्दाम सांगत असे . पण रोज रोज तेल – मोहरी – हिंग- हळद घालून तीच , तीच फोडणी चार दिवस शिकल्यावर मला अगदी कंटाळा आला . म्हणून स्वयंपाक घरातील कोणत्याही संकल्पाचा विचार करायचाच नाही , असं मी त्याचवेळी ठरविलं.
थोडी मोठी झाल्यावर ‘संकल्प’ म्हणताच , मला १२ जून १९२९ रोजी जन्मलेल्या नेदरलँड्सच्या ‘ॲना फ्रँकची’ आठवण यायची. ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी पक्षाने जर्मनीवर नियंत्रण मिळवल्यानंतर, ज्यूंचा छळ चालू केला, नाझी सैनिकांच्या अत्याचारापासून स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ॲन फ्रँकच्या वडिलांनी कुटुंबासह ६ जुलै १९४२ ला अॅम्स्टरडॅममध्ये एका बिल्डींगमधील सिक्रेट खोलीमध्ये लपून बसण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरात लपून बसलेल्या फ्रॅंक कुटुंबाला भयानक जीवन जगावे लागले.
सिने मे जलन
Category:
लेखसंग्रहप्रत्येकाचा एक काळ असतो तसा तलतचा ही काळ होता, नव्हे आजही आहे. वार्धक्यामुळे व्यक्तिमत्त्वाला घरघर लागते पण प्रसिद्धीला कधीच घरघर लागत नाही. पुस्तके कपाटात बंद असली तरीही त्यांचा इतिहास कधीच बंद होत नाही. तरल अनुभव काय असतो हे तलत कडून शिकावं.
टेलिफोनवर गाणं म्हणणं ही कल्पना आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. गाणं म्हणजे नायक नायिकेंचा धुसमुसळेपणा पाहण्याच्या सवयीला छेद देणारं हे गाणं तरलतेचा रेशमी अनुभव देतं.आपल्या मनातील दर्द सांगत असताना किती संयमीत पद्धतीने तलत यांनी ते गाणं म्हटलं आहे.
गुगल आजी

Category:
साहित्य - ललितआमच्या घराशेजारी देशमुख आडनावाचे नवीनच कुटुंब राहायला आले. देशमुख पती-पत्नी, त्यांचा सातवीत शिकणारा मुलगा आर्यन आणि आर्यनची आजी… राधाआजी.
घरात इनमीन चारच माणसं. आर्यनच्या आजीने घरात लागणारे किराणा सामान इथे जवळ कुठे मिळते याची आमच्याकडे चौकशी करताच आईने त्यांना आमचा दूधवाला, पेपरवाला, किराणावाला, इस्त्रीवाला, केबलवाला यांचे संपर्क नंबर आणि पत्ते दिले. त्यामुळे त्यांचं काम खूपच सोपं झालं. त्यांना ह्या गोष्टींसाठी विनाकारण धावाधाव करावी लागली नाही. पोळ्या लाटण्याच्या कामासाठी आजी जेव्हा बाई शोधत होत्या तेव्हासुद्धा आईनेच आमच्याकडच्या घरकाम करणाऱ्या रखमाबाईंना त्यांच्याकडे काम करण्यासाठी राजी केले. आईमुळे रखमाबाई आढेवेढे न घेता लगेच त्या घरी कामासाठी तयार झाल्या. आजीला किती हायसं वाटले. सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यासारख्या झाल्या. आईला तर त्या कितीतरी वेळ धन्यवाद देत होत्या. आर्यनच्या नवीन शाळेच्या प्रवेशासाठीसुद्धा बाबांनीच मदत केली. बाळूच्याच शाळेत प्रवेश मिळवून दिला.
पाकिस्तानात डोकावणारा भारत


Category:
लेखसंग्रह‘केसरी’ चे माजी संपादक अरविंद व्यंकटेश गोखले यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे आणि यापुढेही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा असा प्रवास करत राहतील. तथापि त्यांनी पाकिस्तानला जाऊन आपल्यातल्या लेखकाच्या धर्माची जपणूक केली. त्यांनी पाकिस्तानात जाऊन भारताचा शोध घेतला. पन्नास वर्षांपूर्वी या देशाचं अविभाज्य अंग असणाऱ्या; परंतु आता परक्या बनलेल्या प्रदेशाचा त्यांनी मागोवा घेतला आहे. भारतीय उपखंडातल्या या दोन्ही देशांचा पिंड एकच असल्याने त्यांच्यात काही मूलभूत परिवर्तन व्हायचा सवालच निर्माण होत नाही.