ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
Category:
शहरे आणि गावेवाघ ही भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने व्याघ्र प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली. देशात २६ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तीन ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते विदर्भातच आहेत. यामध्ये मेळघाट, चंद्रपूरचा ताडोबा आणि नागपूरचा पेंच प्रकल्पाचा समावेश आहे. वाघांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी या प्रकल्पात काम केले जाते. पर्यटक मोठ्या संख्येने या प्रकल्पांना भेटी देतात.