अलिबाग हे कोकणच्या किनारपट्टीवरील मुंबईपासून अतिशय जवळ असलेले ऐतिहासिक शहर आहे. मुंबईपासून जवळच असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत रिघ लागलेली असते. सेकंड होम साठी अनेकजण आता अलिबागला पसंती देऊ लागले आहेत.
अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. सुंदर, वालुकामय समुद्रकिनारा म्हणून अलिबागची ओळख आहे. जवळच नागाव, रेवदंडा हे समुद्रकिनारेही आहेत.
अलिबाग शहराच्या किनार्यापासून ३०० मीटर अंतरावर कुलाबा किल्ला असून समुद्रात ६० फूट उंचीचा दीपस्तंभ आहे.
Author
Post Views: 11