शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची इथे सतत गर्दी असते.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९५५८ कि.मी. इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १,१०,५४,१३१ इतकी आहे. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे तर उत्तरेस गुजरात, वलसाड जिल्हा आहे.

शहरे आणि गावे

नागपूर जिल्हा

Category:

 

नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्‍या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे.

शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तेलुगूचा व दखनी उर्दूचा उपयोगही काही प्रमाणात या जिल्ह्यात केला जातो.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

ठाणे जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या विकसित असून ठाणे, ठाणेवाडी, कळवा, मिर्‍या, वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, कल्याण-भिवंडी रोड, ठाणे-बेलापूर रोड, बदलापूर, तारापूर, मुरबाड व शहापूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.

शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

गोंड राजा बुलंद शहा या देवगड (छत्तीसगड) च्या राजाने १७०२ साली नाग नदीच्या काठी नागपूर शहर वसवले. १७०६ मध्ये बख्त बुलंद शहाच्या मुलाने-राजा चांद सुल्तान याने-देवगडवरून आपली राजधानी नागपूरमध्ये हलवली. राजा चांद सुल्तानाकडून रघुजी भोसले यांनी १७४९ मध्ये नागपूर शहर जिंकले व तेव्हापासून भोसलेंचे नागपुरावर राज्य सुरू झाले. १८१७ मध्ये सीताबर्डीचे प्रसिध्द युध्द लढले गेले.

शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

ज्वारी व कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. प्रामुख्याने किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आढळते.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

जिल्ह्यात थळ घाट, नाणे घाट व माळशेज घाट हे नाशिक, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे घाट आहेत. भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली. जिल्ह्यातून जाणारे तीन प्रमुख लोहमार्ग मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता व मुंबई-दिल्ली हे आहेत.

शहरे आणि गावे

नागपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात येतो. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.

शहरे आणि गावे

सांगली जिल्हा

Category:

 

कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला.