वर्षा ऋतुचर्या
लेखसंग्रह

वर्षा ऋतुचर्या

Category:

 

अंगाची लाही लाही करणाऱ्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात सर्वजण पावसाळयाची आतुरतेने वाट पाहत असतात. आगमनाविषयी अनिश्चितता असली तरी जूनच्या सुरुवातीला आपल्याकडे धडकणारा पाऊस येताना आल्हाद, गारवा घेऊन येतो. मात्र हा गारवा, ओलावा येताना अनेक आजारही घेऊन येतो. जरा एक दोन सरी पडल्या नाही की लगेच जवळच्या पर्यटन स्थळी जाऊन भिजायचं, भजी, वडापाव सारख्या पदार्थावर ताव मारायचा, असा जणू काय सध्या ट्रेंड झालेला दिसतो.

आत्मा हरवलेली पत्रकारिता !
लेखसंग्रह

आत्मा हरवलेली पत्रकारिता !

Category:

 

मराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. मराठी पत्रकारितेची ही थोर परंपरा पुढे लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निळकंठ खाडिलकर, ह. रा. महाजनी, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, माधवराव गडकरी, कुमार केतकर यांनी पुढे सुरू ठेवली. या पवित्र व्यवसायाचा धंदा न करता एका समर्पित भावनेने सुरू असलेली पत्रकारिता आता तशी उरली आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माझी पत्रकारिता तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळीत प्रथम दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ आणि नंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांचे मला भरभरून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. लोकसत्ताचे तत्कालिन सहसंपादक चंद्रशेखर वाघ हे ऋषितुल्य पत्रकार माझे पत्रकारितेतील गुरु ! हाताने लिहिलेल्या बातम्यांचे कागद रोज सकाळी त्यांच्या घरी नेऊन द्यायचे आणि नंतर बँकेत कामावर हजर व्हायचे असा रोजचा दिनक्रम होता. लिहिलेल्या बातम्या, वृत्तांत ते वाचून काढायचे आणि मला समोर बसवून त्यातील चुका आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. त्यातूनच पुढे पत्रकारितेचा प्रवास उलगडत गेला आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा अनेक कुप्रथांवर कोणाचीही भिडभाड न बाळगता बिनधास्तपणे उजेडात आणायचे नैतिक बळ मिळत गेले.

मराठी संगीत रंगभूमी
लेखसंग्रह

मराठी संगीत रंगभूमी

Category:

 

काही वर्षांपूर्वी बंगाली रंगभूमी ही अतिशय प्रगत आणि प्रगल्भ आहे आणि ती भारतात प्रथम क्रमांकावर आहे, असं मानलं जात होतं, परंतु प्रथम क्रमांकाची जागा आता सर्वांगानी बहरलेल्या अशा मराठी रंगभूमीने घेतली आहे, असं मानायला काहीच प्रतिवाद नसावा. व्यावसायिक, प्रायोगिक, हौशी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी अशा विविध नाट्यक्षेत्रात नवेनवे प्रयोग चालू आहेत, परंतु मराठी संगीत रंगभूमी, जी महाराष्ट्राने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी अशी मानली जाते, तिची पिछेहाट झालेली दिसते, किंबहुना ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असं म्हटलं जातं.

ग्रंथाक्षर या दिवाळी २००९ विशेषांकात रामदास कामत ह्यांनी लिहिलेला हा लेख

बालसाहित्यिकांच्या प्रेरणेची भरारी
लेखसंग्रह

बालसाहित्यिकांच्या प्रेरणेची भरारी

Category:

 

पुण्यात काही दिवसापूर्वी एका बाल साहित्य महोत्सवाचे उद्घाटन भावार्थ व संवाद तर्फे आयोजित केले होते.आराध्या नंदकर, साक्षी भांड व पालवी मालुंजकर या तीन मुलींनी उद्घाटन केले होते. राजीव तांबे यांनी या तीनही मुलींची साहित्यिक म्हणून मुलाखत घेतली. अनेक बाल साहित्य संमेलनातूनही मुलांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.असे उपक्रम प्रेरणेचे वारंवार घडायला हवेत. पुस्तक प्रदर्शनातही आता मुला मुलींचे साहित्यिक म्हणून पुस्तकें स्टाॅल वर ठेवली जातात.मुले लिहीत आहेत ती केवळ प्रेरणेमुळेच. समृद्ध माणसांचा राबता घरात असण्याबरोबरच पुस्तकांचाही राबता घरात असेल तर मुले वाचू लागतात, लिहू लागतात.

लाल माकड
लेखसंग्रह

लाल माकड

Category:

 

एकदा एक शिष्य आपल्या गुरुंना म्हणतो की मला असा एक प्रभावी मंत्र द्या ज्याच्यामुळे आत्मशांती लाभेल. गुरु म्हणतात की रोज तुझ्या आराध्य दैवतेचा नामजप कर आणि दुसरे कोणतेही विचार मनात येणार नाहीत याची काळजी घे. विशेषतः लाल माकडाचा विचार तर अजिबातच करू नकोस. आत्मशांतीचा इतका सोपा मार्ग कळल्यावर शिष्य समाधान पावला. त्याच दिवशी तो जपाला बसला.तेव्हा त्याला आठवले की लाल माकडाचा विचार मनात अजिबात आणायचा नाही.

पाकिस्तानात डोकावणारा भारत
लेखसंग्रह

पाकिस्तानात डोकावणारा भारत

Category:

 

‘केसरी’ चे माजी संपादक अरविंद व्यंकटेश गोखले यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे आणि यापुढेही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा असा प्रवास करत राहतील. तथापि त्यांनी पाकिस्तानला जाऊन आपल्यातल्या लेखकाच्या धर्माची जपणूक केली. त्यांनी पाकिस्तानात जाऊन भारताचा शोध घेतला. पन्नास वर्षांपूर्वी या देशाचं अविभाज्य अंग असणाऱ्या; परंतु आता परक्या बनलेल्या प्रदेशाचा त्यांनी मागोवा घेतला आहे. भारतीय उपखंडातल्या या दोन्ही देशांचा पिंड एकच असल्याने त्यांच्यात काही मूलभूत परिवर्तन व्हायचा सवालच निर्माण होत नाही.