व्यक्ती-परिचय

दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद

Category:

 

चेतन आनंद दिग्दर्शित हिमालय फिल्म्सचा ‘हकिकत’ (१९६४) हा आपल्याकडचा सर्वोत्तम युद्धपट मानला जातो. १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चेतन आनंद यांनी ‘हकिकत’ घडवला आणि रसिकांना प्रचंड भावला देखील.

व्यक्ती-परिचय

प्रख्यात कर्नाटकी गायक एम. बालमुरलीकृष्ण

Category:

 

शास्त्रीय गायक, पार्श्वगायक, संगीतकार, अभिनेते, विविध वाद्यांचे वादक या रूपातून बालमुरलीकृष्ण यांनी संगीत क्षेत्रात आपले आगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर देशात व परदेशात पंचवीस हजारांहून अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केले. विविध भाषांत त्यांनी विविध रागांवर आधारित ४०० हून अधिक रचना केल्या.

व्यक्ती-परिचय

‘जनकवी’ पी. सावळाराम

Category:

 

‘जनकवी’ पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम हे वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून त्यांना प्रेमाने दिलेले हे नाव! सावळारामांनी ते आयुष्यभर स्वीकारले.

व्यक्ती-परिचय

नीना गुप्ता

Category:

 

बोल्ड अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. यें नजदीकिया, मंडी, उत्सयव, डॅडी, तेरे संग आणि’ दिल से दिया वचन या‍ चित्रपटासह काही सीरियल्स मध्ये नीना गुप्ता यांनी काम केले आहे.

व्यक्ती-परिचय

लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे

Category:

 

करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या.

व्यक्ती-परिचय

लोकप्रिय गायक नट श्रीपाद गोविंद नेवरेकर

Category:

 

मृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळ मधील आश्विनशेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या; तर स्वयंवरातील ‘जा भय न मम मना’, मृच्छकटिकातील ‘रजनीनाथ हा नभी उगवला’, सौभद्रातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, एकच प्याल्यातील ‘वसुधातल रमणीय सुधाकर व्यसनघनतिमिरी’, शारदेतील ‘बिंबाधरा मधुरा’ आणि संशयकल्लोळ मधील ‘कर हा करी धरिला शुभांगी’ ही त्यांनी गायलेली पदे श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारी होती.

व्यक्ती-परिचय

गायक-अभिनेते गणपतराव बोडस

Category:

 

संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या.

व्यक्ती-परिचय

बासरीचा बादशहा पंडित हरिप्रसाद चौरसिया

Category:

 

बासरी म्हटले की प्रथम पं. हरिप्रसाद चौरासिया हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. बांबूपासून बनविलेली बासरी हे वाद्य साधे वाटत असले तरी ते पंडित चौरसियांच्या हाती आल्यावर ते रसिकांना खिळवून ठेवणारे वाद्य बनते. या साधनेमुळे पंडित चौरसिया यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे.

व्यक्ती-परिचय

प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान

Category:

 

शास्त्रीय गायनाला जगभरात नावलौकिक मिळवून देण्यास मोलाचे योगदान देण्यात राशिद खान यांचा मोठा हात आहे. विविध मैफली, सांगितिक कार्यक्रमातून देशपरदेशात त्यांचे सूर गुंजत राहिले.

भावकवी कृ. ब. निकुंब
व्यक्ती-परिचय

भावकवी कृ. ब. निकुंब

Category:

 

कृ.ब.निकुंब यांची ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो.