No Picture
व्यक्ती-परिचय

दिग्दर्शक राजू फुलकर

Category:

 

कलाक्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून राजू फुलकर यांच्याकडे पाहिले जात होते. एकांकिकेतून त्यांनी विविधांगी विषय मांडले. राजू फुलकर यांनी चाळीस वर्षे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात काम केले. ‘लोकधारा’ कार्यक्रमात हृदयस्पर्शी लोकगीते गाणारे गायक, अनेक वाद्ये वाजवणारे वादक ही त्यांची ओळख होती.

No Picture
व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ लेखक बापू वाटवे

Category:

 

मुरलीधर रामचंद्र ऊर्फ बापू वाटवे यांना प्रभात चित्रनगरीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. बापू वाटवेनी प्रभातची प्रसन्न सकाळ, नेत्रदीपक माध्यान्ह, हुरहूर लावणारी संध्याकाळ आणि मन विषण्ण करणारा सूर्यास्त हे सारे अनुभवले होते.

No Picture
व्यक्ती-परिचय

कोकणातील ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर

Category:

 

दिनेश केळुसकर यांची तळकोकणातील निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार म्हणून आपली ओळख आहे. दिनेश केळुसकर यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊनही आपण पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला.

No Picture
व्यक्ती-परिचय

चरित्र अभिनेते इफ्तिखार

Category:

 

इफ्तिखार हे १९४० ते ५० च्या काळात बॉलिवूडचे अतिशय बिझी अभिनेता होते. जसे कडक पोलीस अधिकारी या भूमिकांसाठी ते प्रसिध्द होते. तसेच नंतर च्या काळात वडील, काका, मोठा काका, आजोबा, पोलीस आयुक्त न्यायाधीश आणि डॉक्टर या भुमीकेत ते दिसून आले. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या होत्या.

No Picture
व्यक्ती-परिचय

देवगडचे कवी प्रमोद जोशी

Category:

 

एकविसाव्या शतकात मराठी कविपरंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा असे कवी म्हणजे देवगड येथील कविराज प्रमोद जोशी. संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अढळ निष्ठा प्रमोद जोशी सरांनी ढळू दिली नाही. त्यांच्या कवितेतून अलौकिक काव्य अनुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत असते.

No Picture
व्यक्ती-परिचय

दूरदर्शनवरील कल्पक निर्मात्या विजया जोगळेकर-धुमाळे

Category:

 

संगीत आणि सायकॉलॉजीमध्ये एम. ए. केलेल्या विजया जोगळेकर यांना १९७२ साली अनपेक्षितपणे दूरदर्शनवर नोकरी लागली आणि त्यांच्या आवडीचं विश्व नकळतपणे हाताशी आलं. ‘किलबिल’ या कार्यक्रमासाठी याकूब सईदना मदत करत असतानाच त्या या नोकरीत कायम झाल्या आणि त्यांच्या मनातल्या कल्पनांना जणू पंख फुटले.

No Picture
व्यक्ती-परिचय

जमशेदजी नसरवानजी टाटा

Category:

 

‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी टाटा उद्योगसमूहाची भक्कम पायाभरणी करणारे जमशेटजी टाटा यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस गुजरातच्या नवसारी नावाच्या एका छोट्याशा खेड्यात एक लहानसं रोपटं लावलं.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

छत्रपती राजाराम महाराज

Category:

 

स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून “शिवचरित्र’ लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले.

No Picture
व्यक्ती-परिचय

मेहता पब्लिशिंग हाउस’ चे अनिल मेहता

Category:

 

आनंद यादवांच्या ‘माळ्यावरची मैना’ या कथासंग्रहाने मेहता पब्लिकेशनचा प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत ४५०० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. विविध भाषांमधील पुस्तकांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी बंगाली, गुजराती, हिंदी, कानडी या भाषांमध्ये देखील पुस्तके करायला सुरुवात केली.

No Picture
व्यक्ती-परिचय

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू

Category:

 

मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले.