व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

Category:

 

ढेरे यांच्या लेखनाचा प्रारंभ झाला तो साधारण १९४८ मध्ये, वयाच्या अठराव्या वर्षी कवितेतून. पुढे दोनच वर्षांत, १९५० मध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तिका प्रकाशित केली.

व्यक्ती-परिचय

जयश्री शांताराम

Category:

 

जेव्हा जेव्हा शांताराम प्रॉडक्शनच्या चित्रपटांचा उल्लेख होईल किंवा प्रभातच्या उत्कृष्ट कलाकृतींचा विचार होईल तेव्हा नाजूक चेहर्‍याची, गोड गळ्याची, रुपसंपन्न नायिका म्हणून जयश्री शांताराम यांचं नाव कायमच स्मरणात राहिल.

व्यक्ती-परिचय

गोपाळ हरी देशमुख

Category:

 

सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, मृत्यू : पुणे ऑक्टोबर ९ इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.

व्यक्ती-परिचय

चन्द्रशेखर मोरेश्वर टिळक

Category:

 

चन्द्रशेखर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेली १३ वर्षे ते ‘एनएसडीएल’मध्ये कार्यरत आहेत, त्याशिवाय त्यांनी मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधीत नोकरी केली आहे. १ एप्रिल १९९२ साली त्यांची सेबीवर प्रतिनियुक्ती झाली. भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधुन प्रतिनियुक्तीवर जाणारे सर्वात तरूण आणि पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहे. अनेक अर्थिक घोटाळ्यांची त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून तपासणी केली आहे.

व्यक्ती-परिचय

गौरी देशपांडे

Category:

 

गौरी देशपांडे या लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्पुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत.

व्यक्ती-परिचय

चंदाबाई तिवाडी

Category:

 

संत एकनाथांनी समाजमनाची नस ओळखली आणि भारुडांच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींवर हल्लाबोल केला. नाथांच्या याच सामाजिक प्रबोधनाचा वारसा सांगत चंदाबाई तिवाडी या लोककलावंत सध्या महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. भारुडाच्या माध्यमातून समाजातील दुष्प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवत आहेत.

व्यक्ती-परिचय

गौतम राजाध्यक्ष

Category:

 

फॅशनफोटोग्राफी, व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रातल्या विश्वातील अग्रगण्य मराठी नाव म्हणजे “गौतम राजाध्यक्ष”! १६ सप्टेंबर १९५० रोजी मुंबई येथे जन्मलेल्या गौतम राजाध्यक्षांचे घराणे मुळातच बुध्दीवादी व्यक्तींनी संपन्न असल्यामुळे शिक्षण व करियरसाठी उत्तम वाव होता. मुंबईतल्या सेंट झेविअर हायस्कूलमधील इंग्रजी माध्यमातील शिक्षण व याच महाविद्यालयातून बी.एस्सी पर्यंतच पदवीचं शिक्षण गौतमजींनी पूर्ण केले.

व्यक्ती-परिचय

गोविंद त्र्यंबक दरेकर (कवी गोविंद)

Category:

 

अभिनव भारत या क्रांतिकारक संस्थेच्या कार्यात सावरकरांना जे सहकारी मिळाले त्यात आणि पुढील काळात सावरकरांनी ज्यांना ‘स्वातंत्र्यशाहीर’ या बिरूदाने गौरविले ते म्हणजे कवी गोविद त्र्यंबक दरेकर. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे स्वातंत्र्य हा विषय केंद्रीभूत मानून काव्य करणे, स्वातंत्र्य प्रेमाची सुक्ते आणि वीरतेची सुभाषिते गाणारे कवी गोविद यांचा उल्लेख स्वातंत्र्य शाहरी म्हणून यथार्थ वाटतो.