शहरे आणि गावे

हिंगोली जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

हिंगोली हा कृषिप्रधान जिल्हा असून येथे शेतकरी मोठ्या संख्येने राहतात. या जिल्ह्यात मराठी, हिंदीसह उर्दू भाषाही काही प्रमाणात बोलली जाते.

शहरे आणि गावे

धुळे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. जिल्ह्यात सुमारे ३.९५ लाख हेक्टर कृषीयोग्य जमीन आहे. भुईमुग हे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हा जिल्हा राज्यातील भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

मुंबई-पणजी-कोची हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या जिल्ह्यामधून जातो. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग या नावाने परिचित आहे. सातारा जिल्ह्याला जोडणारा कुंभार्ली घाट, रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट व कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट हे महत्त्वाचे घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

भात’ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

शहरे आणि गावे

हिंगोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

ज्वारी हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, ते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी आणि जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक असून कळमनुरी, हिंगोली, वसमत व सेनगाव या तालुक्यांत कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो.

शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला नाशिक जिल्हा पर्यटनाच्या विविध अंगांनी नटलेला आहे. नैसर्गिक आणि जैविक वैविध्य जिल्ह्याच्या समृध्दतेचे एक अविभाज्य अंग आहे. रामकुंड परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला ते काळाराम मंदिरदेखील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, पुणे-हैद्राबाद,राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ व पुणे-नाशिक,राष्ट्रीय महामार्ग क्र.५० हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातत. महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरील अनेक दळणवळण अधिक सोयीचे बनले आहे.

शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

गोपाळ कृष्ण गोखले – यांचा जन्म याच जिल्ह्यातील कोतळूक या गावी झाला. ते भारत सेवक समाजाचे संस्थापक होते तसेच वाराणशी येथे १९०५ साली भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षही होते.

शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यालती दळणवळण सोयी:

Category:

 

महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भर घालणारा मुंबई-पुणे हा द्रुतगती मार्ग पनवेल, खोपोली या तालुक्यांतून जातो. तसेच या जिल्ह्यातून मुंबई – पुणे – बंगलोर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) व मुंबई – गोवा – मंगलोर महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) असे दोन महामार्गही जातात.