समतोल…
Category:
साहित्य - ललितवर्तमानात जगा , भूतकाळ संपला , भविष्यकाळ कुणी पाहिलाय? हे कितीही खरं असलं तरी , वर्तमान काळ हा भविष्याची चाहूल घेऊनच येतो, म्हणूनच वर्तमानात जगत असताना भविष्याची तरतूद करणं आपल्या हातात आहे. मग तो पैसा असो किंवा माणसं. हे केवळ ज्येष्ठ पिढीने नव्हे तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना जमला पाहिजे तो समतोल. विचारांचा, भावनांचा, धारणांचा आणि कृतींचा..