पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि पाकिस्तान पंतप्रधानाची अजमेरच्या दर्ग्याला भेट
Category:
लेखसंग्रहहैदराबाद बॉम्बस्फोटांत सांडलेले निरपराध्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. आक्रोश आणि किंकाळ्या अद्याप थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी अतिरेक्यांनी श्रीनगरमधील ‘सीआरपीएफ’च्या कॅम्पवर १३/०३/२०१३ ला आत्मघाती हल्ला केला. ‘अतिथी देवो भव:’ ही भारताची संस्कृती आहे. मात्र, ती विश्वासघातकी अतिथीला लागू पडत नाही. भारताचा सतत द्वेष करणार्या, सतत भारताशी जमेल तेथे शत्रुत्व करणार्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र पायघड्या घालत हे सरकार जाणार, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.