लेखसंग्रह

ठाण्याचा घोडबंदर रोड : सर्वांची सर्वाधिक पसंती

Category:

 

ठाणे शहर जागतिक शहरात रूपांतरित होत असताना रोडाज, ठाणे इस्टेट आणि हिरानंदानी वन पार्क  यासारखे प्रकल्प शहराचे मानबिंदू बनले आहेत. व्यापारी केंद्रे, विविध कंपन्यांची कार्यालय आणि माहिती-तंत्रज्ञानाची केंद्रे यांनी हा सारा परिसर सातत्याने उत्साहाने परिपूर्ण असतो.

लेखसंग्रह

अतिरेक झालाच आहे, आता अंत पाहू नका!

Category:

 

राजकारण तुम्हाला आश्चर्यचकित करतं. राजकारण तुम्हाला धक्काही देतं आणि राजकारणात काहीही घडू शकतं..’ असं राजकारणाचं वर्णन नेहमी केल्या जातं. त्यातील सत्यता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतेय. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पंधरवडा उलटला तरी अद्याप राज्यातील सत्ताकोंडी फुटलेली नाही.

लेखसंग्रह

निसर्गप्रकोप

Category:

 

दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या ‘कर्मा’ने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं ‘दैव’ त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात.

लेखसंग्रह

ढोरं उडवणे – विस्मृतीतील संस्कृती

Category:

 

आमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे.

लेखसंग्रह

कोण होणार मुख्यमंत्री?

Category:

 

या विधानसभा निवडणुकीने विरोधकांच्याच नव्हे तर सत्ताधार्‍यांच्या ही डोळ्यात अंजन घातले आहे. तुम्ही जनतेला गृहीत धरून त्यांच्या प्रश्नांची हेळसांड करणार असाल तर जनता तुम्हाला घरी बसू शकते, हा संदेश जनतेने मतपेटीतून दिलाय. त्यातील मतितार्थ राजकारण्यांनी समजून घेतला पाहिजे.

लेखसंग्रह

तारफुल

Category:

 

तारफुल म्हणजे नावावरून कोणाला वाटेल की कुठल्या तरी रानटी किंवा जंगली फुलांचा प्रकार आहे. पण तारफुल म्हणजे ताडाच्या झाडाला येणारे फळ आमच्या आगरी भाषेत ताडफळाला तारफुल बोलतात. उन्हाळ्यात थंडगार व गोड गोड ताडफळा साठी हल्ली खूप मागणी होत आहे.

लेखसंग्रह

भाऊचा धक्का…. आठवणीतला !

Category:

 

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर…. सुरेंद्र बा जळगांवकर यांनी लिहिलेली ही सोशल मिडियातली पोस्ट शेअर केलेय.

लेखसंग्रह

आपली ती श्रद्धा आणि दुसऱ्यांचा तो दिखावा

Category:

 

गावात तेव्हा मोजक्याच घरांमध्ये गणपती असायचे दीड दिवसाचे दहा पंधरा, पाच दिवसाचे तीस ते पस्तीस आणि दहा दिवसाचे दहा पंधरा गणपती. एकवीस दिवसांचे एखादं दुसरे. मूर्ती लहान असो की मोठी असो महाग असो की स्वस्त असो घेणारा प्रत्येक जण श्रध्देने ती मूर्ती घरात स्थापन करतो. भक्तिभावाने आणि आत्मीयतेने कुटुंबासोबत गणपतीची आराधना आणि पूजा अर्चा करतो. 

लेखसंग्रह

मोदी है तो मुमकिन है !

Category:

 

आता खऱ्या अर्थाने काश्मीरचे भारतात विलनीकरण झाले असून काश्मीर ते कन्याकुमारी असं अखंड भारतीय संघराज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वांकाक्षी निर्णयामुळे काश्मीरमध्ये विकासाची नवी पहाट उगवू शकेल ! तसेच गेल्या सात दशकापासून कुटील राजकारणाचं केवळ एक खेळणं बनून राहिलेला काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचं नंदनवन बनू शकेल. गेली सात दशकं काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती कुणी दाखवू शकलं नाही, मात्र ‘मोदी है तो मुमकिन है !’ या घोषवाक्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी करून दाखवलंय..

लेखसंग्रह

प्री ओपनिंग सेशन (BSE /NSE)

Category:

 

शेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे  दोन प्रमुख शेअर बाजार आहेत.  या ठिकाणी  शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर  शेअरची किमत  ठरत असते. ही दोन्ही  मार्केट  बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर  सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते.