अवर्गिकृत

निसर्ग आणि आपण

Category:

 

संक्रांत होऊन गेली, की हवा गरम होऊ लागते. पहाटे आणि संध्याकाळी येणारे वारे सुखद वाटू लागतात. ‘तहान’ जागी होऊ लागते. या दिवसात मला आठवतं, आम्ही झाडाला मडकी टांगून ठेवत असू. त्या मडक्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवलं जाई. दिवसभर जाता-येता त्या मडक्यात पाणी आहे ना, हे पाहिलं जाई. झाडावरचे कावळे, चिमण्या ते पाणी पीत आणि तृप्त होऊन उडून जात.

अवर्गिकृत

दूरदर्शन

Category:

 

टेलिव्हिजनचा शोध जरी १९३० च्या सुमारास लागला होता तरी भारतात टेलिव्हिजन यायला १९५९ साल उजाडावे लागले. दिल्लीत भरलेल्या जागतिक तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनीत एका युरोपियन कंपनीने सर्वप्रथम भारताला टेलिव्हिजन दाखवला. प्रदर्शनानंतर तो टीव्ही संच आपल्याला भेट म्हणून दिला.

अवर्गिकृत

सज्जन: सन्तु निर्भया: ।

Category:

 

व्यक्ती आणि समाज हे नेहमी परस्परावलंबी असतात. प्रत्येक व्यक्ती एकेकटी आदर्श, सदगुणी झाली की समाज आदर्श होतोच. मात्र व्यक्तीच्या विकासाकरिता सामाजिक परिस्थितीदेखील चांगली असली पाहिजे. म्हणूनच की काय, भारतीय संस्कृतीमध्ये वैयक्तिक पूजा-अर्चा करताना जे श्लोक म्हटले जातात त्यांचा सामाजिक आशयही मोठा असतो.

अवर्गिकृत

पार्सल आते हैं… संदेसे लाते हैं…

Category:

 

पंधरा पैशाच्या पोस्ट कार्ड वर 30 वर्षांपूर्वी दूर गावच्या लेकीला सणावाराचे आशीर्वाद लिहून तुमची अशा वेळी आठवण येते हो ,पण असाल तिथे सुखी रहा,आनंदात सण साजरा करा आणि शुभाशीर्वाद असे मजकूर लिहिलेले असत.

अवर्गिकृत

गृहिणी… सखी… सचिव

Category:

 

कॉलेजमध्ये असताना अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी हमखास ऐकावं लागायचं – पारलौकिक जीवनाला अतिमहत्त्व दिल्यामुळे भारतातील लोक ऐहिक उन्नती करू शकत नाहीत. भारत अविकसित राहण्याचं हे एक कारण मानलं जातं. अनिच्छेनं हे लिहावं लागायचं, पण मन हे स्वीकारायचं नाही.

अवर्गिकृत

श्रीसूक्ताचे सौंदर्य

Category:

 

कॉलेजमध्ये असताना अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी हमखास ऐकावं लागायचं – पारलौकिक जीवनाला अतिमहत्त्व दिल्यामुळे भारतातील लोक ऐहिक उन्नती करू शकत नाहीत. भारत अविकसित राहण्याचं हे एक कारण मानलं जातं. अनिच्छेनं हे लिहावं लागायचं, पण मन हे स्वीकारायचं नाही.

अवर्गिकृत

विज्ञानयुगात धर्माची आवश्यकता

Category:

 

‘जो धारणा करतो तो धर्म’ अशी धर्माची व्याख्या केली जाते. त्यातून समाजसुधारणेसाठी, तो सुव्यवस्थित चालावा यासाठी धर्म आहे हे सूचित होते, पण कित्येक वेळा धर्मातील अनिष्ट रूढींमुळे किंवा धर्मामधील भांडणामुळे समाजाची घडी विस्कटते. त्याची प्रगती खुंटते. तेव्हा आजच्या या विज्ञानयुगात धर्म आवश्यक आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.

अवर्गिकृत

मनाचा धाक

Category:

 

नुकतीच एका ऑफिसमध्ये गेले होते. एरवी दुसऱ्या मजल्यावरच्या या ऑफिसमध्ये जाताना नेहमी जाणवायचं, जिन्यातले कोपरे लोकांनी पान खाऊन थुंकून घाण करून टाकलेत.

अवर्गिकृत

अपग्रेडेशन

Category:

 

माणसाच्या भाग्यात जसे चढ-उतार असतात ,भरती-ओहोटी असते तसे गाव आणि शहराचेही असावे.नालासोपारा या गावाच्या बाबतीत हे दिसून येते.मुंबई महानगर प्रदेशाच्या सीमेवर पश्चिम रेल्वेच हे एक लोकल स्टेशन. एकेकाळी म्हणजे यादवांच्या वगैरे काळात हे महत्त्वाचे व्यापारी बंदर.