छापा की काटा?
Category:
कथा साहित्य - ललितवसंतराव आणि वसुधा हे सत्तरी ओलांडलेलं जोडपं.. वसंतरावांनी चाळीस वर्षे सरकारी नोकरी केली. वसुधानं ‘घर एके घर’ सांभाळलं.. वसंतराव खेड्यातून शहरात आले, शिकले व नोकरीला लागले. नोकरी लागल्यावर घरच्यांनी नात्यातील एका मुलीशी, वसंतरावांचे लग्न लावून दिले. वसुधाचं शिक्षण कमी असल्याने त्यांनी गृहिणीपद व्यवस्थित सांभाळले. उपवास, व्रतवैकल्ये करुनही त्यांना मूलबाळ काही झाले नाही. जुन्या चाळीतच अनेक वर्षे राहिल्यामुळे वसुधाचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध कधी आलाच नाही..