दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितचैत्र महिना उजाडतो. आकाश निळ्या रंगाने झळकू लागते. आसमंतात सोनशिंपण पसरते. सूर्यकिरणांचे नाजूक हात पर्वतशिखरे गोंजारू लागतात. बर्फाची चादर हलकेच दूर होऊ लागते. नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. खुलणारा निसर्ग हसरा होऊ लागतो.
Category:
साहित्य - ललित21व्या शतकात ठाणे शहराने आपले हात-पाय पसरवले. कधी काळी जंगलातून जाणारा घोडबंदर रोड आता भरवस्तीत आला आहे. या वाढत्या ठाण्यातील रसिकांच्या कलातृप्तीसाठी निर्माण झालं डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह! या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत वाढलेल्या ठाण्यासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र निर्माण होणं अपरिहार्य होतं. या अपरिहार्यतेमधून 6 डिसेंबर 2012 रोजी ‘ठाणे आर्ट गिल्ड’ अर्थात TAG या संस्थेची स्थापना झाली. कलेच्या माध्यमातून कलेचा प्रसार हेच ध्येय समोर ठेवून टॅगचा जन्म झाला. अर्थात ‘ठाणे आर्ट गिल्ड’ ही संस्था केवळ कलावंतांची नसून, सर्व रसिकांसाठी आहे.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललित१८५६ पर्यत ब्रिटिशांचे एकछत्री साम्राज्य संपूर्ण भारतात स्थापित झाले होते. १८५७ चा ऐतिहासिक लढ्याने जनजगृती तर केली पण त्याला यश आले नाही. पुढे १८८५ पर्यंत राष्ट्रीय भावना वाढीस आली होती. लोकांमध्ये देशप्रेम, पारतंत्र्याची चीड, स्वराज्य हे सगळे विचार वाढतांना दिसून आले. सुरवातीला अर्ज-आर्जव करून अधिकार पदरात पाडून घ्यावे असे वाटत होते आणि तसेच काम पण सुरू होते,मात्र पुढे-पुढे ह्यातून निष्पन्न निघत नाही म्हटल्यावर मात्र जहाल विचार प्रबळ होऊ लागले. ह्या सगळ्या साठी संघटन महत्वाचे, एकी महत्वाची त्यासाठी काय काय करू शकतो, तर महाराष्ट्रातल्या पुण्याच्या डॉ इंदुमती नाईक ह्यांनी चक्क घरातच बांगड्यांचे दुकान काढले, घरा-घरातून स्वातंत्र्य चळवळ पोचविण्यासाठी.
Category:
साहित्य - ललितसोशल मीडिया आल्यापासून काही नतद्रष्ट लोकांनी चंगच बांधलेला आहे की आपल्याला एक ही सण आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने करू द्यायचा नाही. हे लोक इतर वेळेस झोपलेले असतात पण एखादा सण आला की यांना जाग येते आणि मग पोस्ट सुरु होतात.
Category:
साहित्य - ललित१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहात ही त्यांनी भाग घेतला ज्याचे फलित १२०० लोकांना कारावास भोगावा लागला. विदूरश्वथ जे कर्नाटकातील एक गावा आहे, तिथल्या सत्याग्रहाच्या वेळी पोलिसांनी समोरच्या घोळक्यावर गोळ्या झाडायला सुरवात केली, ३५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि बाकीच्यांना कारावास मिळाला, श्रीमती यशोधरा दसप्पा त्यापैकी एक होत्या. त्यांचे घर म्हणजे भूमिगत सत्याग्रही लोकांसाठी हक्काची जागा. स्वातंत्र्य चळवळीतल्या सेनानी, वीरांगना ह्याचीभेटण्याची जागा. आपल्या देशातील एका वास्तू ‘हॅमिल्टन’ हे नामविधान त्यांना मान्य नव्हते, त्यासाठी त्यांनी अनेक पत्र लिहिलीत, अनेक ठिकाणी भाषणे दिली.
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCopyright © 2025 | Marathisrushti