साहित्य - ललित

रूद्रनाथ आणि कल्पेश्वर

Category:

 

‘कल्पेश्वर’ पंचकेदारमधील पाचवा आणि शेवटचा केदार! (उंची २१३४ मी.) दुर्वास ऋषींनी या स्थळी कल्पवृक्षाच्या छायेत तपश्चर्या केली होती. दानवांच्या जाचाला त्रासून देवदेवतांनी या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू आपल्या चतुर्भूज रूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि सांगितलं की, ‘शिव संहारक आहे आणि तेच दानवाचा संहार करतील.’

साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५५ – मणिबेन पटेल

Category:

 

१९३० साली मणिबेन आपल्या वडिलांच्या बरोबर काम करू लागल्या. सरदार पटेलांचे सगळे वेळापत्रक त्याच बघत. त्यांच्या कामाच्या, विचारांच्या नोंदी ठेऊ लागल्या. १९४५ साली कारागृहातून परतल्यावर सुद्धा त्या आपल्या वडिलांबरोबर काम करत राहिल्या. १९५० साली सरदार पटेल ह्यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर मणिबेन ह्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. १९७६ सालच्या ‘इमर्जन्सी’ मध्ये त्यांना परत एकदा कारावास भोगावा लागला.

साहित्य - ललित

बग्या 

Category:

 

खरंच बग्या सारखी माणसं हि आलेपाकाच्या वडी सारखी असतात, अत्यंत गुणकारी, थोडी गोड, थोडी तिखट , पण जिभेवर ठेवल्या शिवाय कुठल्याच पदार्थाची खरी चव कळत नाही हेच खरं.

साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५४ – अक्कमा चेरियन

Category:

 

अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले.

साहित्य - ललित

सर्वाधिक उंचीवर ‘तुंगनाथ’

Category:

 

पावले तुंगनाथची वाट चालू लागतात. साधारण १ कि.मी. अंतर चालल्यावर वृक्षवल्ली आपल्याला एका सुरेख हिरव्या कुरणावर आणून सोडतात व आपला निरोप घेतात. अशा कुरणाला ‘बुग्याल’ असे म्हणतात. या पुढच्या प्रवासात मात्र कुठेही झाडे दिसत नाहीत. वातावरणात होणारा सुखद बदल स्पष्ट जाणवत असतो. समोर सोनेरी तेजाने झळकणारी पर्वतशिखरे उभी असतात.