साहित्य - ललित

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ७ – सावरकरांची लेखणी

Category:

 

सावरकरांच्या अनेक पैलू पैकी आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे लेखन.  १९३७ साली सरकारने सावरकरांची पूर्ण मुक्तता केल्यावर १९३८ मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर निवडले गेले. एक राजकारणी, क्रांतिकारक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ. सावरकर वयाच्या ११ व्या वर्षापासून लिखाण करीत होते. लहानपणाचा काळ यात त्यांनी फटके, पोवाडे, लिहिले.

साहित्य - ललित

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ६ – सावरकरांची कर्तव्यनिष्ठा

Category:

 

देशसेवेच व्रत सावरकरांनी वयाच्या १६व्या वर्षीच शपथेवर घेतले. त्यांची मीमांसा करताना ते सांगतात. ”चापेकरांचे कार्य पुढे कोणीतरी चालवायला हवे मग ते मी का चालवू नये? इतरानाही ते कार्य करावेसे वाटत असे पण काही कारणास्तव ते करू शकत नव्हते मग मीच ते का करू नये?” देशाचा झेंडा पुढे नेता यावा म्हणून क्रांतिकारकांच्या  मार्गातील काटे साफ करायला कुणी तरी सेपार्स एंड मायानर्स हवे असतात ते कार्य आपलेच समजून आम्ही पुढे सरसावलो”

साहित्य - ललित

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ४ – सावरकरांची गुण ग्राहकता

Category:

 

सावरकरांनी १९२९ साली सन्यस्तखड्ग नाटकावर पुण्याच्या श्री. वि.ना. कोठीवाले यांनी टीकात्मक लेख लिहिला तो वाचून सावरकरांनी त्यांना भेटीसाठी बोलावले. व म्हणाले “ तुम्ही माझ्या भाषेतल्या दोषावर टीका केलीत ती बरोबर आहे.पण मराठी नाटके बहरत असताना मी अंदमान येथे तुरुंगात होतो,त्यामुळे मला सद्यस्थितीतिल नाटकाची  भाषा अवगत नाही, मी मराठी नाटकेही मी पहिली नाहीत,पण नाटकाच्या नावाचे जे विवेचन केले आहे ते अगदी योग्य आहे. व लोकापुढे मांडून माझं ध्येय साध्य केले आहे.”