साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग – ३/११

Category:

 

आपण विविध भाषांमधील, मृत्युविचार express करणार्‍या काव्यावर ज़रा नजर टाकूं या. ‘जो न देखे रवि । सो देखे कवि ।’ अशी उक्ती आहे. त्यामुळें, हें पाहणें interesting ठरेल की कवींच्या नजरेतून मरण कसें दिसतें.

साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग – २/११

Category:

 

भक्तीबरोबरच, अध्यात्म, हा संताच्या लेखनातील एक महत्वाचा विचार आहे. सर्व भाषांमधील संत-साहित्यात मृत्यूचा उल्लेख कुठे ना कुठे येतोच.

साहित्य - ललित

पद्य आणि मृत्युविचार : भाग – १/११

Category:

 

मृत्यू हा जीवनाशी-संबंधित इतका मूलभूत विषय आहे की, साहित्यात त्याचा उल्लेख वारंवार येतोच. त्याचा अल्पसा आढावा आपल्याला मृत्यूकडे अधिक डोळसपणें पहायला मदत करेल असा अंदाज करायला हरकत नसावी. विविध भाषांमधील जुन्यानव्या कवींनी मृत्यूबद्दल काय लिहिलें आहे, त्यांचा काय-कसा approach आहे , याबद्दल मनात कुतुहल निर्माण झालें , व त्या जिज्ञासेपोटीं कांहीं वाचन-मनन-चिंतन केलें. त्या मंथनातून मिळालेली कांहीं माहिती मी share करत आहे.

साहित्य - ललित

शब्द, अक्षर, भाषा : कृपया ‘चारोळी’ म्हणूं नका

Category:

 

चार ओळींच्या काव्याला ‘चारोळी’ म्हणून संबोधण्याची पद्धत गेली कांहीं वर्षें बळावली आहे. कुण्या कवीनें तें नांव चार ओळींच्या (विनोदी व हलक्याफुलक्या) कवितेला दिलें, व योगायोगानें तेंच नांव मराठीत रूढ झाले. चारोळी म्हणजे अर्थातच, ‘चार ओळी’ . तसेंच, चारोळी हा पदार्थ बदाम-पिस्ते-काजू यांच्यासारखा सुका मेवा. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये चारोळी वापरतात. त्या संदर्भातील अर्थ , काव्याचें ‘चारोळी’ हें नामाभिधान करतांना , त्या कवीच्या होता की काय, नकळे.

साहित्य - ललित

मेहदी हसन यांच्या ‘रंजिश ही सही’ या सुप्रसिद्ध गझलबद्दल

Category:

 

कांहीं काळापूर्वीच, १३ जून २०१२ ला, मेहदी हसन यांचे निधन झाले. त्यांना ‘शहनशाह-ए-गझल’ म्हणतात ते यथार्थ आहे. त्यांचा नुसता उल्लेख झाला की, त्यांनी गायलेल्या अनेक उत्तमोत्तम गझला आठवतात. ‘गुलों में रंग भरे बादे नौबहार चले । चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले ।

साहित्य - ललित

ढाई अच्छर प्रेम का.. (प्रास्ताविक : ‘प्रीतिगंध’ काव्यसंग्रहाचें)

Category:

 

शिवानी पब्लिकेशनचे श्री. संतोष म्हाडेश्वर यांनी मला ‘प्रीतिगंध’ या शीर्षकाच्या, ‘प्रेम’ या विषयावरील काव्यसंग्रहासाठी प्रास्ताविक लिहायची विनंती केली, आणि मी ज़रा विचारात पडलो. मी कांहीं अनुभवी प्राध्यापक नव्हे, प्रतिथयश साहित्यिक नव्हे किंवा ज्ञानी समीक्षकही नव्हे. साहित्याशी माझा संबंध एक रसिक वाचक व हौशी कवि-लेखक, एवढाच आहे. माझें जीवन गेलें कॉर्पोरेट क्षेत्रात. तें क्षेत्र वेगळें आणि कवितासंग्रहाची प्रस्तावना लिहिणें वेगळें. पण, श्री. म्हाडेश्वर यांनी गळ घातली.