शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

येथे वारली ही प्रमुख आदिवासी जमात राहते. २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १५% लोक आदिवासी आहेत.वारल्यांची खेडी विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटांनी वसलेली असतात. या वस्तीच्या गटाला पाडा म्हणतात. दहा-बारा पाड्यांचे एक खेडे बनते. यांच्या झोपड्यांच्या भिंती कुडाच्या, शेणा-मातीने लिंपलेल्या असतात. यांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती, शेतमजुरी, पशुपालन, लाकूडतोड या व्यवसायांवर होतो.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

जिल्ह्यात थळ घाट, नाणे घाट व माळशेज घाट हे नाशिक, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे घाट आहेत. भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली. जिल्ह्यातून जाणारे तीन प्रमुख लोहमार्ग मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता व मुंबई-दिल्ली हे आहेत.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

ठाणे जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या विकसित असून ठाणे, ठाणेवाडी, कळवा, मिर्‍या, वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, कल्याण-भिवंडी रोड, ठाणे-बेलापूर रोड, बदलापूर, तारापूर, मुरबाड व शहापूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९५५८ कि.मी. इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १,१०,५४,१३१ इतकी आहे. ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे तर उत्तरेस गुजरात, वलसाड जिल्हा आहे.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

ठाणे जिल्ह्याचा इतिहास हा साधारणपणे चार टप्प्यांमध्ये विभागला जातो. पुरातन काळ-प्रागैतिहासिक काळापासून ते इ.स. १३०० पर्यंत, मुस्लीम राजवटीचा काळ (इ.स. १३०० ते १६६०), मराठ्यांचा काळ (इ.स.१६६०-१८००) व ब्रिटिश काळ (इ.स. १८८०- १९४७). प्राचीन काळापासून येथील सोपारा, कल्याण, ठाणे व संजन ही बंदरे महत्त्वाची आहेत. बौद्ध लिखाणांप्रमाणे सोपारा हे राजधानीचे शहर होते व गौतम बुध्दांच्या काळात व्यापाराचेही प्रमुख ठिकाण होते.

शहरे आणि गावे

सांगली जिल्हा

Category:

 

कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला.

शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिध्द आहे.

शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तिमत्वे

Category:

 

वि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत.

शहरे आणि गावे

सांगली जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत.