शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाडपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची इथे सतत गर्दी असते.

शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुके व प्रमुख गावे जोडण्यात आली आहेत. मनमाड-काचीगुडा व पूर्णा-आदिलाबाद हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. औरंगाबाद, पुणे हे जिल्ह्याला नजिकचा विमानतळ आहेत.

शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत.शिवाय जिल्ह्यात ६ साखर कारखाने आहेत.

शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. नंद घराण्याच्या राजवटीमुळे नांदेडला ‘नंदतट’ असेही म्हणत.या दोन्ही शब्दांचा अपभ्रश होऊन पुढे या ठिकाणाला नांदेड म्हणून ओळखले जाऊ लागले.

शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.

शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक वसाहत तळोदे येथे आहे. जिनिंग व प्रेसिंगचे कारखाने नंदूरबार व शहादे येथे आहेत. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

शहरे आणि गावे

नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्‍ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्हा

Category:

 

ठाणे जिल्हा अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा जिल्हा आहे. ठाण्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे. बहुविध वैशिष्ठ्ये लाभलेला कोकण सुध्दा ठाणे जिल्ह्याच्या जवळ आहे.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

शहरे आणि गावे

ठाणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

ज्येष्ठ साहित्यिक. यांचा जन्म ठाणे येथे झाला. ”सत्यकथा’ या मासिकाचे ते काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी १९४१ साली नाट्यनिकेतन ही संस्था स्थापन केली. कन्यादान, भटाला दिली ओसरी ही त्यांची काही प्रसिद्ध नाटके होत.