शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

दादासाहेब कन्नमवार – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.

शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

चंद्रपूर जिल्ह्यात मराठी भाषेबरोबरच गोंडी, कोलामी व हिंदी भाषा या भाषादेखिल प्रचलीत आहेत. राजुरा व गोंडपिंपरी, मूल व चंद्रपूर या तालुक्यांच्या काही भागांत महाराष्ट्र राज्य शासनाची ‘विशेष कृती योजना’ कार्यान्वित केली आहे.

शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.

शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

Category:

 

ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) – हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले.

शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपूरमध्ये अनेक चुन्याच्या खाणीदेखील आहेत.

शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले.

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्हा

Category:

 

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला ही ऐतिहासिक ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे.

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यातले एकूण ६,८९,८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते, त्यातील जिरायती ५,३७,३०० हेक्टर आहे व १,५२,५०० हेक्टर क्षेत्र बागायती आहे

शहरे आणि गावे

औरंगाबाद जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

संत ज्ञानेश्वर –  वारकरी संप्रदायाचे दैवत व महाराष्ट्राचे अनमोल रत्न संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स.१२७५ मध्ये येथील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते.