(User Level: User is not logged in.)

मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुमधुर गाण्यांचे जादूगार – अविनाश विश्वजीत

    सुमधुर गाण्यांचे जादूगार – अविनाश विश्वजीत

    चित्रपट संगीतक्षेत्रात संगीतकार जोड्यांचा एक सुरेल इतिहास आहे. त्याच धर्तीवर चित्रपटातल्या गाण्यांना मेलोडियस संगीत देणारी मराठी संगीतकार जोडी म्हणजे अविनाश-विश्वजीत अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी मराठी असले तरी फक्त मराठी संगीतक्षेत्रापुरते मर्यादित न राहता आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी हॉलिवूड पर्यंत नेला आहे. सुमधुर गाण्यांचे जादूगार – अविनाश विश्वजीत मराठीसृष्टी टॉक्स वर धनश्री बरोबर संवाद साधत आहेत

  • सर्वोच्च न्यायालयाचे निर्भिड न्यायमूर्ती अभय ओक

    सर्वोच्च न्यायालयाचे निर्भिड न्यायमूर्ती अभय ओक

    Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक अगदी लहानसहान कारणांसाठी दाखल होणारे खटले, आपल्या देशात चालतं म्हणून काहीही करायचं अशा मानसिकतेत वावरणारे नागरिक, न्यायालयाचे आदेश वेळच्या वेळी अंमलात न आणण्याकडे यंत्रणांचा असलेला कल….. या सगळ्यामुळे खरंच आपला Civic Sense, हरवत चालला आहे का असा प्रश्न पडतो.

  • कशी बनवली जाते दिनदर्शिका किंवा पंचांग

    कशी बनवली जाते दिनदर्शिका किंवा पंचांग

    सुप्रसिद्ध पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री दा कृ सोमण यांनी पंचांगातील विविधता, कालगणनेच्या विविध पद्धती, leap year, अधिकमास यांचा कालगणनेशी संबंध यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकलाय मराठीसृष्टी टॉक्सच्या या पॉडकास्ट मध्ये.

  • भारताचे अध्यात्मिक पर्यटन कसे बदलत आहे?

    भारताचे अध्यात्मिक पर्यटन कसे बदलत आहे?

    यावर प्रकाश टाकण्यासाठी MarathiSrushti Talks वर येत आहेत — Dushyant Desai, Destiny Tours यांचे संस्थापक. आजचा भारत मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांकडे केवळ श्रद्धेने नाही, तर इतिहास, स्थापत्य, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव यांच्या एकत्रित दृष्टीकोनातून पाहू लागला आहे.

  • किनवटचा क्रिमिनल ते किशोर चे संपादक

    किनवटचा क्रिमिनल ते किशोर चे संपादक

    हुशारीला योग्य दिशा मिळाली तर ते ज्ञान होतं आणि असं ज्ञान समाजोपयोगी असतं. मात्र प्रचंड बुद्धिमत्ता असताना केवळ पैशाच्या अभावी माणूस भरकटतो आणि एका वेगळ्या दिशेने प्रवास करायला लागतो. ही कथा आहे एका अशा तरुणाची ज्यांच्या आयुष्यात दोन वेळा असे टर्निंग पॉइंट आले.

  • आयुर्वेद, काल आज आणि उद्या

    आयुर्वेद, काल आज आणि उद्या

    आयुर्वेद. शतकानुशतकांपासून वापरली जाणारी भारतीय उपचार पद्धती. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत. पाश्चिमात्य उपचार विरुद्ध आयुर्वेद असा वाद तर अनेकदा बघायला मिळतो.

  • असं घडलं पाकिस्ताननामा ! – अरविंद गोखले

    असं घडलं पाकिस्ताननामा ! – अरविंद गोखले

    भारतीय पत्रकाराच्या चष्म्यातून पाकिस्तानचा प्रवास हा आजच्या भागाचा विषय. हे पत्रकार कोण ? तर टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचे माजी संपादक , लोकमत या वृत्तपत्राचे माजी संपादक आणि लोकसत्ताचे माजी सहाय्यक संपादक अरविंद गोखले. सुरुवातीला क्रिकेट मॅचच्या निमित्ताने होणाऱ्या पाकिस्तान भ्रमंतीचं अनुभवकथन त्यांनी केलं आहे त्यांच्या ‘पाकिस्ताननामा’ या पुस्तकात. बेनझीर भुट्टो यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणारे पहिले मराठी पत्रकार म्हणजे अरविंद गोखले.

  • माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो

    माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो

    श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !

  • स्वाक्षरी घेणं हा त्यांचा छंद आहे..सह्याजीराव

    स्वाक्षरी घेणं हा त्यांचा छंद आहे..सह्याजीराव

    ‘सह्याजीराव’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले आणि तब्बल ६ वेळा Limca Book of Records मध्ये नोंद झालेले विक्रमवीर सतिश चाफेकर यांच्याशी फक्त स्वाक्षरी संग्रहच नाही तर त्यांच्या एकूणच विविधांगी संग्रहांबद्दल जाणून घेऊया आपल्या या भागात…

  • आणि म्हणून मी अश्वत्थामा लिहायला घेतला !

    आणि म्हणून मी अश्वत्थामा लिहायला घेतला !

    अश्वत्थामा या महाभारतल्या एका अति महत्त्वाच्या पात्राने औत्स्युकतेची भूल घातली आहे. त्याचं चिरंजीवित्व हा अभ्यासाचा, उत्सुकतेचा, आश्चर्याचा असा विषय आहे.

    अश्वत्थामा कोण होता आणि तो अजूनही कसा आहे, तो कुठे असतो, तो भेटतो म्हणे अनेकांना, तेल तुप मागत फिरतो आपल्या जखमेसाठी, त्याचा तो नीलमणी कसा होता, अशा अगदी अतिसाधारण प्रश्नांपासून ते त्याला श्रीकृष्णाने दिलेला हा शाप म्हणजे कलियुगातलं वरदान तर नाही ना ? कृष्णाचं यामागे नेमकं प्रयोजन काय, त्याचं अस्तित्व अजूनही माणसाला काही शिकवण्यासाठी रचलेला हेतुपरस्पर खेळ तर नाही ना ?