(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रखर राष्ट्रभक्ती

    राष्ट्रभक्तीची भावना प्रखर असली, की समोर मृत्यू जरी येऊन उभा राहिला तरी त्याची तमा नसते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत मृत्यूला कवटाकेल्या अनेक क्रांतिकारकांनी हे सिद्ध केले आहे. या राष्ट्रभक्तीला कशाचेच बंधन नसते. ना वयाचे, ना जातीचे, ना धर्माचे. खान्देशातील बाल शिरीषकुमारची कथा हेच सांगून जाते. इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध लढा देण्यासाठी सुरू झालेल्या महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनाची लाट देशभर उसळली होती व हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकारचेही जोरदार प्रयत्न चालू होते. नंदूरबारला एका शाळेत शिकणाऱ्या बारातेरा वर्षांच्या शिरीषकुमारचे मन इंग्रजांविरुद्ध बंड करून उठले. गोऱ्या राजवटीविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी जेव्हा नंदूरबारला मिरवणूक निघाली, तेव्हा शिरीषकुमार तिरंगा झेंडा घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होता. इंग्रजी सैनिकांनी मिरवणूक हाणून पाडण्यासाठी प्रथम लाठीमार केला; तरीही मिरवणूक पांगली नाही' शेवटी बंदूकधारी इंग्रज सैनिक आले. त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली तरीही बहादूर शिरीषकुमार डगमगला नाही. तो आपला तिरंगी झेंडा घेऊन पुढे चालतच राहिला आणि कोठूनतरी एक गोळी सूऽऽ सूऽऽ करीत आली अन् शिरीषकुमारच्या छातीत घुसली आणि तो खाली कोसळला. मात्र हातातील झेंडा त्याने शेवटपर्यंत सोडला नाही. ' भारतमाता की जय' असे म्हणतच त्याने शेवटचा श्वास मोडला. शिरीषकुमारची ती प्रखर राष्ट्रभक्ती पाहून सारेच धन्य झाले. आजही नंदूरबार म्हटले की, सर्वप्रथम हुतात्मा शिरीषकुमारची आठवण येते.

  • उघडी खिडकी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३८)

    “आपण बसा ना ! माझी मावशी थोड्याच वेळात खाली येईल.
    आपलं नांव नानासाहेब नाफडे म्हणालात ना !”
    मावशींची पंधरा वर्षांची नटखट भाची बंगल्यात नुकताच प्रवेश केलेल्या पाहुण्यांना म्हणाली.
    ती पुढे म्हणाली, “तोपर्यंत मी आहे ना तुमच्याशी बोलायला. चालेल ना !”
    थोड्याच वेळांत तिची मावशी खाली येणार आहे हे लक्षात घेऊन पण ह्या क्षणी त्या भाचीला खूष करता येईल असे काय बोलावे, याचा विचार नाना नाफडे करत होते.
    त्यांच्या मनांत एक दुसराही विचार येत होता.
    ते इथे खास विश्रांतीसाठी आले होते.
    अशा अपरिचित लोकांना भेटून विश्रांतीने बरे होण्याचा उद्देश साध्य होईल कां ?
    अशी शंका त्यांच्या मनांत डोकावत होती.
    मुंबईत अनेक डाॅक्टर्स आपल्या रूग्णांना तेव्हां बरं होण्यासाठी विश्रांती घ्यायला सांगत.
    ते म्हणत, “तुमच्या नर्व्हजवर खूप ताण आहे.
    तो फक्त शांत जागी विश्रांती घेऊनच कमी होईल.”
    ही पध्दत त्यांनी अर्थातच ब्रिटीशांकडून उचलली होती.
    विश्रांती घ्यायला खंडाळा, लोणावळा, पांचगणी, महाबळेश्वर ह्यांतलं एखादं ठिकाणही सुचवीत.
    नानासाहेब नाफडे इथे यायला निघाले, तेव्हां त्यांची थोरली बहिण त्यांना म्हणाली, “मला माहित आहे की पांचगणीसारख्या ठिकाणी तुला स्वतःला स्वतःशीच बोलायची वेळ येईल कारण तिथे दुसरा कोणी भेटणंही कठीण आहे आणि एकटेपणामुळे तुझ्या मनावर आणखीच ताण येईल.
    मी तुला तिथे रहाणाऱ्या कांही ओळखीच्या व्यक्तींना पत्रे लिहून देते.
    माझ्या आठवणींप्रमाणे ज्या व्यक्तींचा अनुभव मला चांगला आला अशाच व्यक्तींना पत्रे लिहिन मी.”
    नाना नाफडे मनांत विचार करत होते की ज्या श्रीमती वसुंधरा पंडित यांच्या नावे बहिणीने पत्र दिले होते, त्यांच कुटुंब व विशेषत: स्वतः श्रीमती वसुंधरा पंडित चांगल्या लोकांत मोडत होत्या की विरूध्द बाजूच्या होत्या
    तेवढ्यात बराच वेळ आपण कांहीच बोललो नाही, हे शिष्टाचाराला धरून नाही असे वाटून वसुंधराबाईंच्या भाचीने विचारले, “तुम्ही इथल्या बऱ्याच रहिवाशांना ओळखत असाल ना !”
    नाना नाफडे म्हणाले, “तसं मी स्वतः नाही ओळखत कुणाला पण माझ्या बहिणीने कांही लोकांना उद्देशून पत्रे लिहून दिलीत.
    हळू हळू होईल ओळख.”
    हे बोलतांना त्यांना मनांत थोडा विषाद वाटत होता आणि बहिणीकडून ही पत्रे घेतली त्याचा पश्चात्तापही.
    ती नटखट तरूणी म्हणाली, “म्हणजे तुम्हाला माझ्या मावशीबद्दल कांहीही ठाऊक नसणार तर !”
    “मला फक्त तिचे नांव आणि पत्ता माहित आहे.” पाहुण्यांनी कबुल केले.
    नाना नाफडे विचार करत होते ह्या श्रीमती पंडित सधवा होत्या की विधवा ?
    दिवाणखान्याच्या रचनेवरून तो एखाद्या पुरूषाच्या आवडीप्रमाणे सजवलेला होता.
    “मावशीच्या आयुष्यांतली भयानक शोकांतिका बरोबर तीन वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला तिच्या आयुष्यात घडली.
    बहुदा तुमची बहिण इथे येऊन गेली त्यानंतर लगेचच.” ती मुलगी म्हणाली.
    “त्यांची शोकांतिका ?” नाना नाफडेंनी विचारलं.
    ह्या शांत सुंदर गांवात शोकांतिका घडणं त्यांना स्वाभाविक वाटलं नाही.
    “तुम्ही बसला आहात त्याच्या बरोबर समोर एक मोठी फ्रेंच विंडो दिसत्येय.
    तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या अशा हवेत आम्ही ती खिडकी पूर्ण उघडून कां ठेवली असेल ?”
    एका मोठ्या खिडकीकडे बोट दाखवत ती भाची म्हणाली.
    प्रवेशद्वार त्यांच्या उजव्या हाताला होतं आणि ती प्रचंड खिडकी समोरच होती.
    तिची खालची बाजू जमिनीपासून दीड फूटांवरच होती आणि समोर नीट गवत कापून केलेले छोटे अंगण (Lawn) दिसत होते.
    “ह्या ऋतुमधे ह्या गांवी सध्या हवा थोडी विचित्र आहे पण त्या खिडकीचा आणि त्या शोकांतिकेचा कांही संबंध आहे ?” नानासाहेबांनी तिला विचारले.
    ती तरूणी म्हणाली, “तीन वर्षांपूर्वी ह्या खिडकीतून मावशीचे यजमान आणि तिचे दोन धाकटे भाऊ हातात बंदुका घेऊन नेहमीप्रमाणे शिकारीसाठी बाहेर पडले.
    ते कधीच परत आले नाहीत.
    त्यांना आवडणाऱ्या पक्षांच्या शिकारीसाठी योग्य जागेच्या दिशेने जात असतांना ते अचानक दलदलीत रुतले.
    थोड्याच अवधीत ते तिघेही दलदलीत आंत नाहीसे झाले.
    त्या वर्षी अवकाळी पाऊस जास्त झाल्यामुळे अशी दलदल बऱ्याच ठिकाणी झाली होती.
    त्यामुळे एऱ्हवी सुरक्षित वाटणाऱ्या जागा अचानक दगा देत होत्या.
    त्यांचे देहही सांपडले नाहीत.
    ही त्यांतली भयानक गोष्ट होती.”
    हे सांगताना एऱ्हवी धिटाईने बोलणाऱ्या त्या तरूणीचा आवाज हळवा आणि कातर झाला होता.
    ती पुढे सांगू लागली, “माझ्या बिचाऱ्या मावशीला अजूनही वाटतं की ते तिघे कधी तरी परत येतील व त्यांच्याचबरोबर गेलेल्या स्पॅनिएल जातीच्या कुत्र्यासह नेहमीच्या संवयीप्रमाणे त्या समोरच्या खिडकीतून आत येतील.
    म्हणून खिडकी अगदी काळोख होईपर्यंत उघडी ठेवलेली असते.
    बिचारी माझी मावशी पुन्हा पुन्हा ते कसे बाहेर गेले, तिच्या यजमानांनी कसा पांढरा रेनकोट खांद्यावर घेतला होता, तिचा धाकटा भाऊ राजन कसे “अंधार कां पसरला चहूंकडे” हे गाणे म्हणवून तिला चिडवत होता.
    मावशीला ते गाणं आवडत नसे, ते तिला उदास करत असे.
    तुम्हांला माझ्या मनातलं सांगू ? अशा शांत संध्याकाळी माझ्या मनांत भयानक विचार येतो की ते सगळे खरंच तर त्या खिडकींतून आंत येणार नाहीत ना !” बोलतांना तिच्या अंगावर शहारे आले असावेत आणि ती थांबली.
    जेव्हां श्रीमती वसुंधरा पंडित बाहेर यायला उशीर लागल्याबद्दल पाहुण्यांची क्षमायाचना करत बाहेर दिवाणखान्यात आल्या, तेव्हा नाना नाफडेंना हायसं वाटलं.
    त्या म्हणाल्या, “मला वाटते आमच्या सुनिताने तुमची चांगली करमणूक केली असेल ना !”
    नाना नाफडे म्हणाले, “तिचं बोलणं खूपच मन वेधून घेणारं होतं.”
    श्रीमती पंडितनी चटकन त्यांना विचारलं, “आणि हो, ही समोरची मोठी खिडकी उघडी आहे त्याचा तुम्हाला कांही त्रास वाटत नाही ना !
    माझे यजमान आणि भाऊ शिकार आटोपून परतले की नेहमी तिथूनच प्रवेश करतात.
    आज ते दलदलीतील पक्षी मारण्यासाठी गेलेत.
    येतील तेव्हा त्यांचे बूट वगैरे इतके खराब असतील की माझी कार्पेट खराब करून टाकतील.
    तुम्ही सर्व पुरूष ह्या बाबतीत सारखेच ! होय की नाही ? “
    श्रीमती पंडित उत्साहाने बडबडत होत्या.
    शिकारीविषयी, मारायला पक्षी कमी झाल्याबद्दल, सध्याच्या हंगामात बदके मिळण्याबद्दल, इ. वर अधिकारवाणीने कांही सांगत होत्या.
    नाना नाफडेंना मात्र ते सर्व भयानक वाटत होतं.
    ते अधूनमधून तिची गाडी दुसऱ्या एखाद्या विषयाकडे वळवायचा प्रयत्न करत होते पण त्यांत फारसं यश येत नव्हतं.
    त्यांना दिसत होतं की तिला त्याच विषयावर बोलायचं होतं आणि तिची नजर बरेचदा समोरच्या खिडकीतून दूरवर पहायचा प्रयत्न करत होती.
    नाना नाफडेनी भेटीसाठी आजचाच, तिच्या शोकांतिकेला तीन वर्ष पूर्ण करणारा, दिवस निवडावा, हे त्यांना त्यांच दुर्दैव वाटत होतं.
    ते म्हणाले, “दोन तीन डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांती घ्यायला आणि मेंदूवर कोणताही ताण येणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले आहे.
    तसेच जास्त थकवा येईल असे शारिरीक कामही टाळायला सांगितले आहे.”
    अनेक लोकांचा जसा समज आहे तसं त्यांनाही मनातून वाटत होतं की ऐकणाऱ्यांना दुसऱ्या व्यक्तीचे आजार व त्यावरील औषध ह्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला क्वचितच उत्सुक असतात.
    तरीही ते पुढे म्हणाले, “परंतु खाण्याचं पथ्य मी काय पाळावं, ह्या बाबतीत मात्र डॉक्टरांच एकमत नाही.”
    ऐनवेळेस येऊ घातलेली जांभई दाबून श्रीमती पंडित अचानक उत्साहाने बोलू लागल्या.
    मात्र ते बोलणं नाना नाफडेंच्या आजाराबद्दल नव्हतं.
    त्या म्हणाल्या, “ते पहा, ते आले एकदाचे.
    बरोबर चहाच्या वेळी आले आणि चिखल अगदी त्यांच्या डोळ्यांपर्यंत लागलेला दिसतोय.”
    नाना नाफडेंच अंग भितीने किंचित थरथरू लागलं आणि ते भाचीकडे वळले व नजरेतून तिला सहानुभूती दर्शवू लागले.
    ती मुलगी खिडकींतून बाहेर पहात होती आणि तिच्या नजरेत आश्चर्ययुक्त भीती दाटून आली होती.
    एकाएकी धक्का बसल्याप्रमाणे नाना नाफडे खुर्चीत बसूनच गर्रकन खिडकीकडे वळले व बाहेर त्याच दिशेला पाहू लागले.
    संध्याकाळनंतरचा काळोख दाट होत होता आणि तीन व्यक्ती त्या पटांगणातून खिडकीकडे येत होत्या.
    तिघांच्याही खांद्याला बंदुका अडकवलेल्या होत्या आणि एकाच्या खांद्यावर पांढरा रेनकोट होता.
    एक थकलेला स्पॅनिएल कुत्रा त्यांच्याबरोबरच चालत येत होता.
    आवाज न करता तिघेही घराच्या जवळ आले आणि मग त्यांतला एक तरूण गाण्याची ओळ गाऊ लागला, “अंधार कां पसरला चहूंकडे“.
    नाना नाफडेंनी आपली काढून ठेवलेली टोपी पटकन घातली, बाजूलाच ठेवलेली हातातली कांठी उचलून घेतली आणि मग अशा वेगाने पळत ते मुख्य रस्त्यावर आले की त्यांना दिवाणखान्याचं प्रवेशद्वार, बंगल्याकडे येणारा रस्ता आणि बंगल्याचे फाटक नुसते नजरेखालून गेल्यासारखे भासले.
    तिथूनच जाणाऱ्या सायकलस्वाराने ब्रेक दाबल्यामुळे होऊ घातलेला अपघात टाळला.
    “आलो बरं कां बाईसाहेब.” खिडकींतून आत येत पांढरा कोट खांद्यावर घेतलेला गृहस्थ पंडित बाईंना म्हणाला.
    “वाटेत मधेमधे चिखल होता पण बहुतेक वाट सुकी होती.
    काय ग ! आम्ही आत येतांना दिवाणखान्यांतून पळून जाणारी व्यक्ती कोण होती ?”
    “एक अगदी वेगळा आणि विचित्रच इसम होता, नाना नाफडे नांवाचा.”
    बाईसाहेबांनी खुलासा केला. “तो फक्त त्याच्या आजाराबद्दल बोलत होता आणि निरोपाचा एक शब्द किंवा अचानक जावं लागतंय म्हणून माफी वगैरे कांही न मागताच तो तुम्ही येताच पळाला.
    कुणाला वाटेल की त्याला इथे भुत दिसले.”
    भाची शांतपणे म्हणाली, “मला वाटते की ह्या स्पॅनिएल कुत्र्यामुळे ते पळाले.
    ते मला म्हणाले होते की त्यांना कुत्र्यांची खूप भीती वाटते.
    एकदा नदीकिनारी एक गावठी कुत्र्यांची झुंडच त्यांच्या मागे लागली होती.
    शेवटी त्यांना जवळच्या ख्रिश्चन स्मशानांत खणलेल्या एका खड्ड्याचा आश्रय रात्रीसाठी घ्यावा लागला होता आणि ते सर्व गांवठी कुत्रे वरून भुंकत होते.
    अशा प्रसंगामुळे एखाद्याच्या मनांत कुत्र्यांबद्दल कायम भीती बसली तर त्यांत काय नवल ?”
    सुनिताने कांही सत्त्य बोलण्याचं व्रत घेतलं नव्हत; ऐन वेळी रोमांचक कथा रचणं आणि त्या खऱ्या वाटतील अशा पध्दतीने सांगण, ही त्या मुलीची खासियत होती.

    शिकारीहून परतणा-या पंडित बाईंचे यजमान आणि भाऊ ह्यांना ते भूतच समजले व “य: पलायते, स जीवते”, हे धोरण अवलंबून ते तिथून धांवण्याचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडत जे पळाले, ते आपल्या पाचगणीतल्या तात्पुरत्या मुक्कामावर म्हणजेच एका चांगल्या लॉजवर आले.
    अशोक लॉज कांही फार मोठा नव्हता.
    एका बंगल्याचे चार भाग करून चारजणांना देत असत.
    ॲाफीस आऊटहाऊसमधे होतं.
    नाना नाफडेंनी त्यांतले चांगले दोन भाग स्वत:ला आरामांत रहाता यावं म्हणून घेतले होते.
    त्यांनी त्या जागेचं चांगलं महिनाभराच भाडं आगाऊ भरलं होतं.
    ते अशोक लॉजपर्यंत जरा वेग कमी करून पण धांवतच आले.
    कधी एकदा लॉजवर पोहोचतोय असं त्यांना झालं होतं.
    तरीही जेव्हा ते लॉजवर पोहोचले तेव्हा ते सरळ आपल्या खोलीत गेले नाहीत.
    ते ॲाफीसमधे गेले.
    ॲाफीसमधे तेव्हा मॅनेजर नव्हता.
    तो जेवायला घरी गेला होता.
    तिथे शिरपा बसलेला होता.
    शिरपा लॉजमधे केअरटेकर ते हमाल अशी अनेक प्रकारची कामे करत असे.
    नाना नाफडे ॲाफिसमधल्या सोफ्यावर धपापत्या उरानिशी बसले.
    शिरपाने विचारलं, “सायेब, काय वाघ वगैरे मागे लागला काय? कधीमंदी गावात येतो एखादा वाघ.”
    नाना नाफडे म्हणाले, “नाही रे बाबा, वाघ नाही. वाघाला काय मी घाबरतो काय?” लॉजवर पोचल्यावर नानांना तरतरी येऊ लागली होती.
    “मंग काय झालं म्हणायचं?” शिरप्याने प्रश्न केला.
    नाना म्हणाले, “भूत दिसलं बाबा भूत. माझ्या ह्या डोळ्यांनी पाहिलं मी.”
    भूत म्हणजे शिरपाचा खूपच आवडता विषय.
    साहेबांसाठी बियरचा ग्लास भरत तो म्हणाला, “भूत दिसलं! आसलं, आसलं! हिथ लई भूताटकीचे वाडे आहेत. ते त्या पारशाचं दिसलं की काय?”
    बियरचे घुटके घेत नाना नाफडे म्हणाले, “नाही, अरे अख्खी भुतावळ दिसली मी कसा सुटलो तिथून, माझं मलाच माहित?”
    शिरप्याच कुतुहल वाढलं, “आख्खी भुतावळ, म्हणजे किती?”
    नाना म्हणाले, “पांच दिसली, पाच!”
    शिरप्याने आश्चर्य व्यक्त करत म्हटलं, “अगागागा! पावनं सुटलात तुम्ही.”
    नाना म्हणाले, “सुटलो म्हणजे काय! अरे पहिल्या दोन भुतांशी तर मी त्यांना जिवंत माणसं समजून त्यांच्याशी मस्त गप्पा मारल्या. ती दोन भुतेच सारखी मला आणखी तीन भुतं येणार आहेत, असं सांगत होती. थोड्या वेळाने ती तीन भुत खरंच आली.” नाना नाफडेंनी बियरचा ग्लास रिकामा करून खाली ठेवला.
    शिरपा म्हणाला, “सायेब, तुम्ही त्यांचे पाय बघून ओळखलं कां?”
    नाना नाफडे मान हलवत म्हणाले, “हो रे शिरपा! ती भुत खिडकीतून आत आली खिडकी वर त्यांनी एकेक पाय ठेवला तर तीनही पाय उलटे. मग मी त्या पहिल्या भुतांकडे पाहिलं तर त्यांचे पण पाय उलटे.”
    ती तीन भुतं आत यायच्या आधीच मी तिथून पळालो. ती तीन भुतं अशी काळोखात अचानक दिसायला लागली. ती तीनही भयानक होती. अंगाला चिखल आणि राख फांसली होती त्यांनी. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या पण वेगळ्याच होत्या.”
    ती मुलगी काही तरी खाणाखुणा करत होती. बहुदा मला कसं खायचं ते सांगत होती.”
    शिरपाने विचारलं, “हा कोणाचा बंगला म्हणायचा?”
    नाना नाफडे तोंड वांकड करत म्हणाले, “मी ‘लॉंग शॅडो’ हे बंगल्याचं विचित्र नाव ऐकूनच जायला नको होतं तिथे. तो माळाच्या टोकाला आहे तो! आता पंडितांना शोधत मी तिथे गेलो होतो.”
    शिरपा म्हणाला, “सायेब, कुठले पंडित! अहो, इथे गो-या सायबांची भूतं खूप!”
    शिरपा हाताची बोटं मोजत म्हणाला, “हा आठवा बंगला भूतांचा!”
    नाना म्हणाले. “आठवा! मी चाललो बाबा मुंबईला! उद्या सकाळीच.”
    शिरपा म्हणाला, “अहो, तुम्ही महिन्याचं भाडं भरलंय!”
    नाना नाफडे म्हणाले, “माझी विश्रांती झाली आणि आजच्या धांवण्याने नर्व्हज पण ठीक झाल्या असाव्यात. आता बास्स!”
    नाना नाफडे ठरवल्याप्रमाणे दुस-या दिवशी सकाळी मुंबईला निघून गेले. संध्याकाळपर्यंत शिरपाने कमीत कमी पंधरा-सोळा बंगल्यांच्या केअरटेकर्सना आणि तेवढ्याच प्रवाशांना लोंग शेडोतल्या भूतांच्या विविध कहाण्या ऐकवल्या.
    त्या पसरत गेल्या.
    पंडितांच्या कानावर नाही आल्या पण सर्वत्र झाल्या.
    सहा महिन्यांनी पंडित कुटुंब पुण्याला रहायला गेले.
    आणखी सहा महिन्यांनी पंडितांनी पांचगणीचा तो बंगला विकायचा ठरवले.
    पुण्याचा एक दलाल त्यांच्या घरी आला होता. त्याने पांचगणीतल्या मित्राशी संपर्क साधला होता.
    तो दलाल आला तेव्हां भाची सुनिता तिथेच होती.
    तो पंडितांना म्हणाला, “साहेब, तुमचा बंगला विकला जाणं कठीण आहे.”
    पंडित आश्चर्याने म्हणाले, “कां? इतका सुंदर बंगला!”
    सुनिता म्हणाली, “हो, तिथे किती छान छान कल्पना सुचतात.”
    तो दलाल तिच्याकडे, विशेषत: तिच्या पायांकडे पहात चांचरत म्हणाला, “माफ करा, पंडितसाहेब पण तो बंगला पांचगणीत भुताचा बंगला म्हणून ओळखला जाऊ लागलाय. बंगल्याच्या दिवाणखान्याच्या खोलीतल्या बंद खिडकींतून आंत बाहेर करणारं, एका पंधरा-सोळा वर्षांच्या
    गो-या मुलीचे भूत पाहिल्याचे अनेकजण शपथेवर सांगताहेत."
    सुनिताचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता.

    -- अरविंद खानोलकर.

    मूळ कथा - द ओपन विंडो.

    मूळ लेखक - साकी (एच. एच. मन्रो १८७०-१९१६)

  • कथातरंग – अनुपच्या शब्दात सल्ला

    साधारण पांच एक वर्षांपूर्वी धोंडीबा कडे सहा एकर बागायती शेती होती, आणि शेताच्या एका कोपर्‍यात तीन खोल्यांचे छोटेसे पण देखणे असे कौलारू घर होते. त्यात धोंडीबा, राधा आणि त्यांची एक मुलगी राहत असे. दिवसभर कष्ट करून त्याने हे माळरान नंदानवनात फुलवले होते. कोणाकडे काही मागायची गरज पडणार नाही अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालला होता.

  • प्रेषित (कथा)

    धर्मेन्द्रला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणल्यावर नर्स साफसफाई, औषध देण्यासाठी रूममध्ये आल्या. धर्मेन्द्रची कॉट खिडकीजवळच होती. त्यामुळे बसल्या बसल्या तो बाहेरचे पाहू शकत होता. मधूनच विमान धूर सोडत आवाज करत गेल्याचेही दिसू शकत होते.आवाज ऐकताच त्याला आठवले त्याने राधिकाला हाक मारली.

  • सत्यकामाची गोष्ट

    सत्यकाम अगदी एकटा पडला. त्याचे सर्व खेळगडी त्याला सोडून गेले होते. त्यांच्या आईबापांनी त्यांची उपनयने करून त्यांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवून दिले होते

  • विमर्श कथा : १

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला.

    “राष्ट्रीय स्मारकांचा विध्वंस करून , या देशाच्या परंपरेशी , संस्कृतीशी , ज्ञानाशी आणि मातीशी गद्दारी करणाऱ्या देशद्रोह्यांनो , तुमचा मेंदू सडलाय . स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रांतिकारक या देशात होऊन गेले म्हणून तुम्ही जिवंत आहात . त्यांनी सुखासीन आयुष्याचा त्याग केला म्हणून तुम्ही आज सुखासीन आयुष्य जगत आहात . त्यांची चरित्रं वाचा . त्यांचा त्याग , त्यांनी सोसलेल्या यातना , ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून अवघ्या देशाचा केलेला विचार , संघर्षमय आयुष्य हे सगळं माहितेय तुम्हाला ? हिंदुत्व , सामाजिक समरसतेसाठी केलेले प्रयत्न , हिंदुस्थानच्या सीमा आणि त्यांचे संरक्षण याबद्दल केलेला विचार , देशाच्या एकात्मतेसाठी मांडलेल्या संकल्पना … यातलं काय माहितेय तुम्हाला ? परदेशातून येणाऱ्या अमाप पैशावर जगणारी तुम्ही बांडगुळे आहात , तुम्हाला काय माहिती सावरकर , काय माहिती देशहित ? तुम्ही सगळे देशाला लागलेली वाळवी आहात . देश आतून पोखरत जाणारी वैचारिक , षंढ वाळवी . भ्रम फैलावणारी वाळवी . संपत चाललेली पण संपता संपता देशाचं , समाजाचं , संस्कृती , किती नुकसान करता येईल याचा विचार करणारी वाळवी . त्यासाठी वापरत असलेल्या शब्दांना लाखो करोडो रुपये मलिदा मिळतोय , याच निर्बुद्ध जगण्यात स्वतःचं सुध्दा नुकसान होतंय हे विसरून गेलेली बधीर वाळवी”. तो क्षणमात्र थांबला .

     

  • संसार

    कुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की मोठ्ठया आवाजात आपला टेपरेकॉर्डर सुरू करायचा. सारजा जरा गडबडीनच उठली. कामाचा लय रोंभा पडला व्हता,त्यात पेरणीचे दिवस व्हते. पहाटचे सगळे कामं आटपुन शेतात जायचं व्हतं. तिनं उठून तोंडावर पाण्याचा सपकारा मारला,केसं नीट करून बुचडा बांधला अन चुली जवळ जाऊन चुलीतला एक भला मोठा ढेपसा हातावर घेऊन दात घासत घासत तिच्या नवऱ्याल,दौलतल आवाज दिला.पेरणी पाण्याचे दिवस असल्यानं दिवसभरच्या कष्टानं थकून दौलत आरमोडून झोपला व्हता. त्यालं तसं झोपलेलं पाहून सारजाच्या डोळ्यालं समाधान वाटत होतं. खरं म्हंजे कामाचा लय रोंभा पडला होता पण तरी बी त्याची झोप न मोडु देता तशीच ती उठली . पारोश्या अंगानं सयपाक पाणी करू नाही मंतात…! सारजीलं लहानपणापासूनच थंड पाण्यानं आंघुळ करायची सवय होती,म्हणून मग आधी तिनं आंघुळ करून घेतली. तव्हरोक दौलत बी उठला होता. त्याच्याकडं रेडीओ होतख.रेडिओवर गाणे ऐकण्याचा त्यालं लय नाद होता. झोपतून उठून त्यांनं रेडिओवर विवीध भारती लावलं.तेव्हड्यातं नहानीतून आंघुळ करून बाहिर येणारी सारजा त्यालं दिसली. सारजालं पाहून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले.तिचा तो लांब लांब केसांचा वलबट केशसंभार पाहून तो खुळ्यागत तिच्याकडं पाहू लागला. तेवढ्यात रेडिओवर गाणं लागलं होतं…

  • डॉक्टर संशोधिका गर्टी थेरेसा कोरी

    कोणत्याही परिस्थितीत आपण डॉक्टर व्हायचेच हे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. वैद्यकीय शिक्षण फार अवघड असते हे तिला घरातील लोकांनी व इतरांनी सांगून पाहिले. मात्र ध्येयापासून ती किंचितही ढळली नाही. कठोर परिश्रमाच्या आधारे सर्व अडथळे पार करून ती अखेर डॉक्टर झाली व नंतर रोगाबाबत तिने असे काही संशोधन केले की, अनेक मोठ्या रोगांवरती उपाय शोधणे सहज सोपे झाले. तिच्या संशोधनाबद्दल तिला १९४७ साली नोबेल पुरस्कारही मिळाला. गर्टी थेरेसा कोरी (Gerty Theresa Cori) हे तिचे नाव. हा नोबेल पुरस्कार तिचे पती कार्ल कोरी तसेच अर्जेंटिनाचे वैज्ञानिक बर्नार्डो ए हाऊसे यांच्यासह तिला विभागून देण्यात आला होता.

    गर्टी थेरेसाचा जन्म १५ ऑगस्ट १८९६ रोजी ऑस्ट्रियातील प्राग शहरात झाला. तिचे वडील एका चिनी कारखान्यात व्यवस्थापक होते. घरची आर्थिक स्थिती उत्तम होती. गर्टीचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले व वयाच्या दहाव्या वर्षी तिला पब्लिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेच तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले व पूर्ण करून दाखविले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच तिची व कार्ल कोरीची ओळख झाली व नंतर दोघेही एकमेकांचे जीवनसाथी बनले. पहिल्या महायुद्धाच्या काळात केवळ ऑस्ट्रियन असल्यामुळे कोरी दाम्पत्याला प्राग शहर सोडावे लागले व दोघेही व्हिएन्नामध्ये आले. एका बालरुग्णालयात दोघांनीही काम सुरू केले. मात्र वैद्यकीय संशोधनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून दोघेही अमेरिकेत आले व त्यांनी विविध रोगांसंबंधी संशोधन सुरू केले. रक्तामधील साखरेबाबत त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळेच मधुमेहावरचे उपाय सुलभ झाले. या संशोधनाला 'कोरीचक्र' असे आजही संबोधले जाते. या संशोधनाबद्दलच त्यांना डॉ. बर्नार्डो हाऊसे यांच्यासमवेत नोबेल पुरस्कार लाभला. त्यानंतर कोरी दाम्पत्याने सेंट सुई येथे स्वतःची प्रयोगशाळा काढून संशोधनाचे कार्य पुढे चालू ठेवले. या प्रयोगशाळेचा अनेक संशोधकांनी लाभ घेतला. दुर्देवाने गर्टी कोरीला एका असाध्य रोगाने पछाडले. तब्बल दहा वर्षे तिने या रोगाशी झुंज दिली,परंतु २६ ऑक्टोबर १९५७ रोजी तिचे निधन झाले.

  • एक परीस स्पर्श – भाग ४

    जयराम शेट यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं. त्यांच्या आयुष्यात सगळे रंग होते म्हणजे असं म्हणता येईल की हा माणूस आयुष्य भरभरून , उत्साहात , आनंदात आणि दिवसरात्र काबाड कष्ट करून जगला होता. ज्याला आपला आदर्श ठेवावा असा उद्योगपती होता.

  • यक्षप्रश्न

    वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.