नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

या जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भविष्यात घडणाऱ्या एकातरी घटनेचा संदर्भ असतोच.असे विजयला वाटते. इतकेच नव्हे तर विजयचा पाय दुखणे हे ही विनाकारण नसावे त्यामागेही नियतीची काहीतरी योजना नक्कीच असावी. विजय पाय धरून जरी घरी बसला असला तरी त्याचे डोके कधीच गप्प बसत नाही त्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतेच.
प्राचीन काळतील एका राजाच्या पदरी असलेल्या एका इमानी सेवकाची ही कथा आहेएका रुजाच्या राजवाड्यात एकसेवक होता. त्याचे वडीलही राजाच्या वडिलांच्या चाकरीत होते. मात्र सेवकाच्या वडिलांनी त्या सेवकाला बजावून ठेवले होते की, राजवाड्यात नोकरी करीत असताना अनेक प्रलोभने येतात, मात्र तू कोणत्याही मोहाला बीपडू नकोस. कोणतेही काम इमानदारीने कर, त्यातच तुझे हित आहे. त्याप्रमाणे तो सेवक आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करीत असे. रत्नाकडे रोज एक साधू यायचा व प्रसाद म्हणून त्याला एक द्यायचा, परंतु ते फळ सजा स्वतः न खाता त्या सेवकाला द्यायचा.सेवकही ते फळ राजाला दिले अहे त्यावर आपला अधिकार नाही. म्हणून स्वत: न खाता राजवाड्यातल्याच एका रिकाम्या खोलीत ठेवून द्यायचा. हा दिनक्रम बरेच दिवस चालू होता. एके दिवशी त्या साधूने राजाला असेच फळ दिले व आशीर्वाद देऊन तो निघून गेला. राजा रोजच्याप्रमाणे ते फळही त्या सेवकाला देणार तेवढ्यात तेथे एक माकडाचे पिलू आले. राजाने कुतूहल म्हणून आपल्याजवळील फळ मग त्या सेवकाला न देता त्या माकडाच्या पिलाला दिले. माकडाने लगेच ते फळ खायला सुरुवात केली. राजाही गमतीने त्याचे खाणे पहात होता. फळ अर्धवट खाक्यानंतर त्यातून एक रत्न बाहेर पडले. ते पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्याने त्या सेवकाला लगेच विचारले, की रोज तुला मी देणारे फळ तू काय करीत होतास? त्यावर त्या सेवकाने राजाला ती खोली उघडून दाखविली. ती खोली फळाने अर्धी भरली होती व त्यातील फळे सडल्यामुळे त्यातून रत्ने बाहेर आली होती. तो रत्नांचा खजिना पाहून राजा फारच आश्चर्यचकित झाला. त्या इमानी सेवकाचे त्याला कौतुक वाटले व त्याने ती सारी रत्ने त्या सेवकाला देऊ केली. मात्र त्या इमानी सेवकाने त्या रत्नावर तुमचाच अधिकार आहे, असे राजाला सांगून ती सर्व रत्ने नम्रपणे नाकारली व राजाची चाकरी करण्यातच आपल्याला खरा आनंद असल्याचे त्याने सांगितले. त्या सेवकाचा तो इमानीपणा व राजनिष्ठा पाहून राजाही भारावून गेला होता.
मारुती नावाचा एक सालदार होता. खूप कष्टाळू होता. सगळ्या गावातील लोक म्हणत, मारुती कामाला जसा वाघ आहे, तसा खायला बकासूर आहे.
माझ्या बापाने नेहमीच छोटी स्वप्ने पाहिली आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या माझी पंख छाटली, माझी आई तिने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली पण बांडगुळ बनून… माझी भावंडे ती तर बांडगुळाला खाऊन जगणाऱ्याच्या भूमिकेत होते.
रोजंदा या जीवनाच्या वाटचालीत खूप वेगवेगळे सुखद दुख:द अनुभव आपल्याला येत असतात. वेगवेगळे प्रसंग आपण बघत असतो. कित्येक प्रसंगाचा आपल्याशी काही सबंध सुद्धा नसतो. केवळ आपल्या समोर तो घडत असतो म्हणून आपण बघत असतो.

थिंपूत मौशु आईची आठवण काढीत मुसमुसत जोगना बरोबर न संपणारी रात्र पुढे ढकलत होती. नियतीने मांडलेला हा क्रूर खेळ कधीच संपणार नव्हता का?
सन 1980 ची गोष्ट त्यावेळी माझी आई घरामध्ये जळण नाही म्हणून. रानातून कुर्डू च्या फुलांच्या झाडाचे जळण डोक्यावरून एक मोठा भारा रोज घेऊन येत असे. स्वयंपाकासाठी घरांमध्ये वेळ नव्हते मी रेल्वेमध्ये नुकताच रेल्वेमध्ये कामाला लागलो होतो. त्यावेळी पगार महिना दोनशे रुपये पर्यंत मिळत होता.

विजय आज कोणत्यातरी मालिकेचे प्रमो ! पाहत होता. ज्यात एक नवरा आपल्याला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून वडाला प्रदक्षिणा घालताना दाखविला होता. तो प्रमो ! पाहून विजयला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण कालच विजय त्याच्या एका मित्राला त्याच्या कारखान्यात भेटायला ,. गेला होता… तो मित्र विवाहित आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगाही आहे. बायकोही दिसायला खूप सुंदर ! सुंदर म्हणजे इतकी सुंदर की एखाद्या शिल्पातील स्त्री जितकी सुंदर असते तितकी ! तरी तो माणूस बाहेरून येणाऱ्या – जाणाऱ्या मुली डोळे फाडून पाहत असतो…बोलता – बोलता त्याने लग्नानंतरही एक मुलगी कशी त्याच्या गळ्यात पडत होती त्याची रसभरीत कहाणी सांगितली
मी सहज आईस्क्रीम पार्लर मधल्या आमच्या सकट इतर काही टेबलांवर नजर फिरवली . कुठे मित्रांच्या गप्पा , कुठे लहान मुलांचे गोंगाट , काही परिवार , वयस्कर व्यक्ती , कुणी सेल्फी काढतायत कुणी आईस्क्रीम चे फोटो काढतायत आणि बरंच काही …
विजयने त्याच्या लहानपणी ही कधी कोणाशी कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट केला नव्ह्ता. किशोर अवस्थेतही केला नाही आणि तरूणपणी तर नाहीच नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti