नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
माणुस जेव्हा गुहेतून, झाडांवरून रहाण्यासाठी इतर ठिकाणे शोधू लागला, त्यावेळी त्याने सर्वप्रथम वृक्षांच्या पानांचा वापर करून आडोसा तयार केला असवा, त्यानंतर बांबू, दगड, विटा, माती, चुना यांचा वापर करून भिंत उभारली असावी, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आदीम काळापासुन सुरू झालेला भिंतीचा हा प्रवास अलिकडच्या स्मार्ट भिंतीपर्यंत येऊन थांबलेला आहे.
वडगावात एक मोठा वाडा होता. वाड्यातील बिऱ्हाडात चार मुलगे होते. राजू, संजू, अजू, बंडू ही त्यांची नावे. रामराव त्या वाड्याचे मालक. त्यांना मूलबाळ नव्हते. ते फार मायाळू होते. मुलांना ते कधी खाऊ देत, कधी पैसे देत. एकदा ते गावाला जायला निघाले. ते तीन महिन्यांनंतर परत येणार होते.
नेहमीप्रमाणे प्राध्यापक अविनाश सरांच्या लेक्चरला क्लास पूर्ण भरलेला होता. अविनाश संस्कृत विषय शिकवत. सगळे विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत असत अविनाश सरांच संस्कृतवर प्रभुत्व होतंच पण त्याचं विवरण ते इंग्रजीतही फार सुंदर करत. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या इंग्रजीत. मेघदूत हे काव्य, शाकुंतल हे नाटक शिकवतांना तर ते नेहेमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन आणि रंगवून सांगत. त्यामुळे त्यांच्या तासाला कोणी दांडी मारत नसे.

आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली मच्या घरी जातवालीच हवी ना.. मिळाली एकदा
एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या
पाण्यात लपून बसायचे.
आमच्या गाडीने मलकापूर सोडलं आणि कोकरूडमार्गे पुण्याला जाण्यासाठी गाडी वळली . पावसाची हलकी सर पडून गेली होती . गाडीने गती घेतली .पुढच्या उतारावर खूप छान दृश्य होतं . मोकळ्या रस्त्यावर दोन चिमण्या ,रस्त्यावरच्या अगदी लहानशा खड्यात साठलेल्या पाण्यात चोच बुडवून तहान भागवत होत्या . दृश्य खरंच मनोवेधक होतं. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ .डाव्या हाताला एक घर .डांबरी सडक नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरीमुळं ताजीतवानी झालेली . हवेत छानसा गारवा .आणि दूरवर क्षितिजापाशी निळ्या ढगांच्या आश्रयाला आलेले तुरळक काळे ढग .
चमच्यानी ढवळत ढवळत एकीकडे तो व्यक्त होत होता . आपसूकच “मम” म्हंटल्यासारखा तिचा हात त्याच्या हाताकडे वळला ….. दोघांनीही एकत्र ढवळत….कॉफीच्या दोन्ही थरांची सरमिसळ करत , दोन्ही नात्यांना एकसंध , “एकजीव” केलं होतं …. अगदी नकळतपणे !!! ………दोन्ही नाती एकत्र होत एक नवीन नातं तयार झालं होतं “मैत्रीपूर्ण नवरा-बायकोचं नातं “
मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता . वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती . मुलांनी आणि पत्नीने विचारले सुद्धा .
गाडी त्या सुप्रसिद्ध हायफाय वृद्धाश्रमाजवळ थांबली.त्यातून साठ पासष्टीचा माणूस त्याची पत्नी त्याचा मुलगा सून उतरले.तिथले वातावरण पाहून त्याला खूप बरे वाटले.ऑफिसमध्ये गेला तो कोण आणि का आला ते संगितले.

…किसी नजर को तेरा इंतजार आज भी है ‘ भूपेंद्र आणि आशा भोसले यांचे गाणे चालू होते ..आणि ती माझ्या डोळ्यासमोर आली . डोळ्यासमोर म्हणजे प्रत्यक्षच माझा विश्वासच बसत नव्हता .अजून तशीच होती.
Copyright © 2025 | Marathisrushti