नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मागील आठ वर्षांतील दिव्यांग निधीचा दोन कोटी उत्पन्नाच्या प्रमाणात मागील तीन वर्षांत 5% आणि पाच वर्षांतील 3% प्रमाणे साठ लाख रुपयांचा हिशोब द्या, नाहीतर गावातील वीस दिव्यांगांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन तीन लाख जमा करा. अन्यथा साठ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी शिक्षा भोगायची तयारी ठेवा असे ठणकावून अण्णा बाहेर पडले.
राम लखन’ मध्ये ती जॅकी सोबत होती. ‘नरसिंम्हा’ मध्ये सनी देओल, ‘प्रहार’ मध्ये नाना पाटेकर, ‘रुदाली’ मध्ये राज बब्बर, ‘दिल चाहता है’ मध्ये अक्षय खन्ना सोबत. अशा विविध भूमिका तिने साकारलेल्या आहेत.
घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …

एखाद्या संहितेचं भागधेय असतं. प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही. पण मी नाराज नाही. कारण माझी संहिता दमदार आहे. कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे. दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी मिळणार आहे आणि … आणि बरंच काही आहे त्या संहितेत.
ज्ञानेश्वर मोठे संत होते, तसेच ते मोठे दार्शनिक (तत्वज्ञानी) सुद्धा होते. आणि ( त्यांच्या रचना वाचून असें जाणवतें की) ते विविधरंगी साहित्यिकही होते. ज्ञानेश्वरांचा विचार करायचा तर त्यांचें तत्वज्ञान, अध्यात्म वगैरे पुढें येणें अपरिहार्य आहे . मात्र , या क्षेत्रातील प्रस्तुत माझें ज्ञान ‘शून्य के बराबर’ आहे. त्यामुळे अध्यात्म-तत्वज्ञान वगैरे विषयांवर सखोल चर्चा करायची धृष्टता मी करूं शकत नाहीं, कारण ( हिंदीत म्हणतात, त्याप्रमाणें ), ती ‘अनधिकार चेष्टा’ (प्रयत्न) होईल. आपली चर्चा मुख्यत: साहित्यिक अंगानें जाणार आहे . तिच्यात, अध्यात्म-तत्वज्ञान यांचें जें कांहीं विवरण येईल, त्यासाठी मी (अर्थातच) ज्ञानवंतांचा आधार घेललेला आहे. त्यात, जें कांहीं ज्ञान असेल, त्याचें ‘क्रेडिट्’ त्या-त्या ( नेम्ड् ऑर् अन्-नेम्ड् ) ज्ञानवंतांचें ; आणि रेफरन्स् च्या, अर्थाच्या, व इंटरप्रिटेएशनच्या ज्या कांहीं चुका असतील , त्यांची जबाबदारी माझी, हें सांगायला नकोच.
यानंतर दोन मोठ्या कार्यक्रमांसाठी मी गायलो. माझे आवडते संगीतकार एस.डी. बर्मन आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा एक प्रदीर्घ कार्यक्रम इंद्रधनू या संस्थेने केला आणि माझे गुरू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या रचनांचा 'श्रीकांतसंध्या' हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकरता साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे आम्ही सादर केला. या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायिका रंजना जोगळेकर आणि निवेदक भाऊ मराठे होते. या सर्व कार्यक्रमांनी मला लोकप्रियता तर दिलीच. पण माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ७५०व्या कार्यक्रमाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. माझ्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा होता. ५०० नंतर ७५० वा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करायचा असे ठरवले होते. त्यामुळे या कार्यक्रमाची तयारी आम्ही जोरात सुरू केली. माझ्या सर्व तरुण विद्यार्थ्यांचा उत्साह तर ओसांडून वहात होता. सर, या कार्यक्रमाला एक हिंदी फिल्मस्टार बोलावू या. सर, आपण अवधूत गुप्तेंना बोलावयाचे का? त्यावेळी 'झी सारेगमप' लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यामुळे आमच्या तरुण मंडळींचा आग्रह होता. माझा मित्र अविनाश जोशी अवधूत गुप्तेशी बोलला आणि अवधूतने लगेच होकार दिला. काही कार्यक्रमांच्या निमित्ताने अभिनेता चंकी पांडे यांच्याशी ओळख झाली होती. माझे मित्र सिन्नरकर यांनी त्याची भेट घडवून आणली. यापूर्वी चंकी ठाण्यात आलाच नव्हता. “तुम्हारा गाना सुनने के लिए पहेली बार मैं थाने आऊंगा," चंकी म्हणाला. मग काय? आमची सर्व विद्यार्थी मंडळी एकदम खूष झाली. यावेळी कार्यक्रमासाठी प्रायोजक मिळायला वेळ लागला नाही. माझ्या पहिल्या जाहीर कार्यक्रमाला प्रयत्न करूनही प्रायोजक मिळाले नव्हते. पण आता वेळ बदलली होती. माझा ७५० वा कार्यक्रम होता. पुढील दोन महिने या कार्यक्रमासाठी एक मोठी टीम काम करत होती. वादक कलाकार, स्टेज डेकोरेशन, जाहिराती कार्यक्रमाच्या रिहल्सल्स या सर्वांमध्ये कार्यक्रमाचा दिवस कधी उजाडला ते कळलेच नाही. या टीममध्ये माझी पत्नी प्रियांका आणि मोठी मुलगी शर्वरीसुद्धा असल्याने आमचे संपूर्ण घर कार्यक्रमात बुडाले होते. ९ फेब्रुवारी २००७ च्या रात्री ठीक ८.३० वाजता माझ्या ७५०व्या जाहीर कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमाची सुरवात माझी मुलगी शर्वरीच्या सरस्वतीस्तवनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे आणि अभिनेत्री समीरा गुजर करणार होते. 'अनिरुद्ध, गडकरी रंगायतन श्रोत्यांनी संपूर्ण भरलेले आहे. जय शारदे वागेश्वरी कठीण गाणे आहे. शर्वरी घाबरणार तर नाही ना?bभाऊ मराठे काळजीच्या स्वरात मला विचारत होते. 'शर्वरी माझी मुलगीच नाही तर माझी विद्यार्थिंनीसुद्धा आहे. तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तिला संधी देणे हे सुद्धा माझे काम आहे.' मी भाऊंना उत्तर दिले. शर्वरीने माझे शब्द सार्थ ठरवले. कार्यक्रमाची सुरुवात तिने उत्तम केली. टाळ्यांच्या कडकडाटात मी स्टेजवर प्रवेश केला. "बाबा, तुम्ही अगदी राजासारखे स्टेजवर आलात." नंतर शर्वरी मला म्हणाली. पण मला त्यावेळी खरोखरच राजा असल्यासारखे वाटत होते. तीस वर्षे सातत्याने गाणे शिकून, रियाज करून मी गाण्याचा आत्मविश्वास मिळवला होता. आत्तापर्यंत गायलेल्या ७४९ कार्यक्रमांनी त्यात सहजता आणि सफाई आणली होती आणि रसिक प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम मी मिळवले होते. माझे गाणे ऐकण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर समोर बसले होते. मग अजून काय हवे? काही गझल आणि गाणी सादर केल्यावर मान्यवरांना स्टेजवर निमंत्रित करण्यात आले. हिंदी चित्रपट अभिनेते चंकी पांडे, संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते, खासदार प्रकाशजी परांजपे, माजी महापौर सतीश प्रधान, आमदार निरंजन डावखरे, चित्रपट दिग्दर्शक प्रमोद जोशी, निवेदक अशोक शेवडे आणि वासंती वर्तक, ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष एम.वाय. गोखले, उपाध्यक्ष उत्तमराव जोशी, बीपीएल मोबाईलचे अध्यक्ष अरुण सोनाळकर, इंद्रधनूचे अध्यक्ष महेश वर्दे आणि कित्येक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
“नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत अनेक मान्यवरांची उपस्थिती ही अनिरुद्धची खरी कमाई आहे." माझ्या ठाणे शहराच्या या गझल गायकाला दिल्लीतही ओळखले जाते याचा मला सार्थ अभिमान आहे. खासदार प्रकाशजी परांजपे म्हणाले.
“अनिरुद्ध जोशी हा उत्तम गायकच नव्हे तर धाडसी आयोजकदेखील आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे इतके काटेकोर आयोजन पाहून मी थक्क झालो," अवधूत गुप्तेने कौतुक केले. हे कौतुक माझ्या एकट्याचे नसून आमच्या टिमचे होते. त्यात माझे असंख्य विद्यार्थी, पत्नी प्रियांका, मुलगी शर्वरी आणि छोटी केतकी आणि माझी आईदेखील होती. मला एक मोठा फरक जाणवत होता. एकूण कार्यक्रमाचा ताण सोडल्यास मला परिश्रम बिलकूल झाले नव्हते. 'स्वर-मंच'च्या अनेकांनी तो भार उचलला होता. मी लावलेल्या रोपट्याचा आता वृक्ष होत होता. याची काही गोड फळे मला चाखायला मिळत होती.
-अनिरुद्ध जोशी

किसी नजर को तेरा… इंतजार आज भी है….’ जगजीतची ही गजल मला नेहमीच व्याकुळ करत असते , का कुणास ठाऊक. खरे तर आयुष्य सुरळीत चाललेले असतानासुद्धा ही गजल अस्वस्थ करतेच करते.
उंच झाडावरून तयार नारळ खाली जमिनीवर पडला तरी आतील ” बीज ” सुखरूप राहावे म्हणून चवडांचं भक्कम आवरण त्याचं संरक्षण करतं आणि पाण्यात पडला तरी पाण्याच्या तळाशी न जाता त्या नारळाला तरंगत असतानाही कोंब फुटतो. निसर्ग अगाध आहे.
आपल्या आवडीची आवड असणारा जेव्हा भेटतो तेव्हा विषयांना, गप्पांना उधाण येते. येथे जातीचे म्हणजे जातधर्म अपेक्षित नसून, आवड असलेली गोष्ट अपेक्षित आहे.
ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली.
बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी होता. बालपणापासून त्यांचे संबंध मैत्रीचे राहिले होते.
एक दिवस राजेसाहेब आपल्या लवाजम्यासह इरावद्दी नदीवर सहलीसाठी गेले. ब्रह्मदेशातील या सर्वांत मोठ्या नदीला ब्रह्मी लोक 'इतरावत्ती माता' म्हणतात. ते जिथे गेले होते, तिथे नदीचे पात्र विस्तीर्ण, नजरेच्या टप्प्यात न भरणारे होते. दिवस मावळला. राजाला कंटाळा आला. त्याला यु पॉ ची थट्टा करायची लहर आली. यु पॉ आता दरबारी खूशमस्कर्या होता. त्याला मंत्र्याचा दर्जा होता.
'यु पॉ ही नदी ओलांडून जाशील का ?'
'होय महाराज !' त्याने तत्काळ उत्तर दिले.
'तू मला खूश करण्यासाठी हे म्हणतोयस, हे मला ठाऊक आहे; पण ही थट्टा नाही.'
'महाराज, खरंच मी नदी पार करून दाखवतो.'
'मग आताच्या आता नदी ओलांड पाहू ।'
हे ऐकल्यावर यु पॉने आपला सॅरॉग वर उचलला आणि तो किनार्यावर येरझारा घालू लागला. बर्याच वेळाने राजाने विचारले,
' अरे, तू थांबलास का ?'
'महाराज, मी बोटीची वाट पाहतोय.''
'बोटीने तर कोणीही सामान्य माणूस जाईल, मग तूच कशाला हवा ?'!
युपॉने राजापुढे गुडघे टेकले. जमिनीवर डोके टेकवून तो म्हणाला,
'महाराज, त्या सामान्यांतला मी एक सामान्य माणूस आहे.'
राजेसाहेब त्यावर खळखळून हसले, झालं!
Copyright © 2025 | Marathisrushti