(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राजा सूर्यदेवा

    राजा सूर्यदेवा तुला
    माझा नमस्कार
    तुझ्यामुळे उघडते
    दिवसाचे दार

  • आयुष्य

    सरतेच आहे आयुष्य सारे
    तरी मी कोण कळले नाही
    धावलो, मी मृगजळापाठी
    कां? कसा ते कळले नाही

    लाभली नाती ऋणानुबंधी
    ओढ कधी जाणवली नाही
    भावनां, साऱ्याच कोरड्या
    मनांतर कधी भिजले नाही

    जगणे सारेच भोग भाळीचे
    मी त्यास कधी टाळले नाही
    जे लाभले ते निमूट भोगीले
    त्रागा कधीच मी केला नाही

    सत्संगास मी सदा भुकेलेला
    तो मार्ग कधीच सोडला नाही
    प्रारब्धयोगा भोगूनी संपवावे
    हा विचार मी अव्हेरला नाही

    विवेके केवळ सत्कर्म करावे
    सूत्र! जगण्याचे भुललो नाही
    कधीतरी भेटेलही तो भगवंत
    ही मनीषा कधी सोडली नाही

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८६.

    १९ - ३ - २०२२.

  • प्रेम…

    प्रेम
    एक स्त्री
    एक पुरुष
    यांचे मिलन नसते...

    प्रेम
    समुद्र
    आहे अमर्याद
    खोल अथांग...

    प्रेम
    पाण्यात साखर विरघळते
    तसे विरघळणे असते
    अस्तित्वात नसतानाही
    आपला गोडवा राखणारे...

    प्रेम
    मेणबत्ती सारखे
    जळणे असते
    जगाला प्रकाश देत...

    प्रेम
    फक्त मरणे असते
    जगणे त्यास माहीतच नसते

    प्रेम
    एक भ्रम असते
    जे साऱ्या जगाला भ्रमित करते...

    ©निलेश बामणे

  • पहिला पाऊस आणि तिची आठवण

    पहिला पाऊस अलगद बरसला,
    आणि मन पुन्हा तिच्याकडे वळलं,
    मातीच्या त्या ओल्या सुगंधात
    तिचं अस्तित्व पुन्हा दरवळलं.

    थेंबांच्या प्रत्येक सरीसोबत
    तिच्या हास्याचे सूर झंकारले,
    आभाळात चमकणाऱ्या विजेसंगे
    तिच्या डोळ्यांचे तेज उजळले.

    खिडकीत उभा मी एकटा,
    पावसाला अलगद स्पर्शत होतो,
    पण प्रत्येक थेंबात तिच्याच
    आठवणींचं विश्व शोधत होतो.

    रस्ते भिजले, झाडं भिजली,
    भिजलं सारं आसमंत,
    पण सर्वांत जास्त भिजलं होतं
    तिच्या विरहाने व्याकूळ मन.

    अशाच पावसात कधीतरी
    आपणही हातात हात घेऊन चाललो होतो,
    स्वप्नांच्या छोट्याशा दुनियेत
    एकमेकांत हरवून गेलो होतो.

    आज पुन्हा तोच पाऊस आला,
    तसाच गंध, तसाच वारा,
    फरक इतकाच...
    यावेळी तिचा नाही सहारा.

    सर ओसरली, ढग सरले,
    आभाळ पुन्हा निळं झालं,
    पण तिच्या आठवणींचं पावसाळं
    मनात अजूनही तसंच बरसलं.

    पहिला पाऊस दरवर्षी येतो,
    निसर्गाला नवसंजीवनी देतो,
    पण तिची आठवण मात्र
    प्रत्येक सरीसोबत मनाला पुन्हा भिजवून जाते...
    अखंड... निःशब्द... अनंत...

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

  • देहातील शक्ती

    नाकासमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा ।
    थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते ।।१।।

    अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून ।
    भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती ।।२।।

    आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते ।
    भावना जेव्हां जागृत होती, रोमरोमी पुलकित होते ।।३।।

    अवयवे सारी स्फूरुनी जाती, देहामधूनी विज चमकती ।
    धनको ऋणको विद्युत साठे, अलग अलग दिसती मोठे ।।४।।

    विजातीय लिंग येता जवळी, परिणाम दिसे विजेचा त्यावेळी ।
    प्रकाश आहे आपल्या देही, ज्ञानीजन तो सहज पाही ।।५।।

    स्थिर करूनी चंचल मना, प्रकाश दिसेल हृदयी सर्वांना ।
    उष्णता वीज प्रकाश शक्ती, निसर्गाची रूपे असती ।।६।।


    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • जीवन प्रभूमय

    जीवन काय आहे मला जे वाटत असे

    ते समजून घ्या तुम्हीं प्रभूमय ते कसे ....१

    मृत्यूचा तो विचार कधी न येई मनी

    मृत्यू आहे निश्चित माहीत हे असूनी...२

    भीती आम्हां देहाची कारण ते नाशवंत

    न वाटे मरूत आम्ही आत्मा असूनी भगवंत....३

    आत्मा आहेची अमर मरणाची नसे भीती

    जी भीती वाटते ती देहाची असती....४

    आत्मा नसे कुणी तो तर प्रभूच आहे

    साकारलेला सर्वत्र बाहेर व अंतरी राहे...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • एकतेची शपथ

    चला बंधूहो एक होऊ या शपथ तुम्हाला शिवरायाची
    आज देऊ या, खंबीर शाश्वती, समर्थ भावी भारताची ॥ धृ ॥

    प्रणाम असू द्या त्या शिवबाला प्रणाम हा लोकमान्यांना
    प्रणाम असू द्या वीरांना माझा, निष्ठांना नि मूल्यांना ॥
    हिमालयासम पावित्र्याला नि शांतिच्या येथील पूजेला
    प्राणांहूनही प्रिय अशा या विशाल माझ्या देशाला ॥ १ ॥

    हा हिंदूचा देश मुलांनो आहे भूमी गौतम बुद्धाची
    इस्लाम-ईसाई सर्वांस शाश्वती बात कशास हो युद्धाची ॥
    दुभंगलेली मने सांधूनि विभागलेले हात जोडूया
    एकदिलाने एकमनाने भूमीचे या पांग फेडूया ॥ २ ॥

    भारत माझी जात आणिक धर्मही माझा भारत आहे
    एक धर्म नि एक कुळीचे आपण एकच आपला मांडव आहे
    एक ईश्वर एकच अक्षर, एक सदा काळीज अपुले आहे
    एकतेचा मंत्र जपोनी, शांतीचा आपला जयघोष आहे ॥ ३ ॥

    एकोप्याने जवळ येऊ या, एक होऊ या प्रवाहाने
    एकजूटीने उत्कर्ष साधू या मिळून होऊ या एक मने
    खांद्यास मग भिडवून खांदा एक घेऊ या शपथ साथीहो
    एकमुखाने, एक लयीने गर्जत राहू जयजय हिंदुस्थान हो ॥ ४ ॥

    रामायणाचे करुनी पारायण आदर्शाचे करुया मंथन
    विषमतेला बूजवून; अस्मानी झेपाऊ या उदंड उन्मन
    संकोचित तणांना खुडूनी फुलवू प्रेमाच्या विश्वकळ्यांना
    समर्थतेची रुजवून स्वप्ने जोपासूया निरोगी मनांना ॥ ५ ॥

    बंधुभावाशी नाते अतूट होवो अडसर जातीचा नको
    सर्वांप्रती असू द्या समान आदर आनंदाला मग पार नको
    हातात गुंफूनी हात करुया मोहक मोत्यांच्या माळा
    समर्थतेच्या कळसास नेऊया गोवर्धन होऊन सारे गोळा ॥ ६॥

    -- यतीन सामंत

  • अबोल कथा पाऊसाची

    प्रत्येकाचा पाऊस वेगळा,
    प्रत्येकाची ओल निराळी.
    कुणा सरी या स्वप्नफुलांच्या,
    कुणा अश्रूंची रात्र काळी.

    कुणा पावसात माती गाते,
    दरवळतो ओला गंध.
    कुणा विजांच्या तीक्ष्ण रेषा,
    लिहितात भयाचे छंद.

    कुणा पावसात प्रेम उमलते,
    हातामध्ये हात गुंफे.
    कुणा पावसात एकटेपण,
    निःशब्द अश्रूंमध्ये झुरे.

    कुणा पाऊस शेतामधला,
    हिरवी स्वप्ने पेरून जाई.
    कुणा शहरच्या काचांआड,
    ओल मनाची सुकून जाई.

    प्रत्येकाचा मेघ वेगळा,
    प्रत्येकाचे आभाळ नवे.
    ज्याच्या त्याच्या वाटेवरती,
    पावसाचे अर्थ वेगळे.

    प्रत्येकाच्या हास्यामागे,
    दडलेली असते व्यथा.
    म्हणून प्रत्येकाच्या पावसाची,
    असते एक अबोल कथा.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

  • जीवन प्रभूमय

    जीवन काय आहे मला जे वाटत असे

    ते समजून घ्या तुम्हीं प्रभूमय ते कसे ....१

    मृत्यूचा तो विचार कधी न येई मनी

    मृत्यू आहे निश्चित माहीत हे असूनी...२

    भीती आम्हां देहाची कारण ते नाशवंत

    न वाटे मरूत आम्ही आत्मा असूनी भगवंत....३

    आत्मा आहेची अमर मरणाची नसे भीती

    जी भीती वाटते ती देहाची असती....४

    आत्मा नसे कुणी तो तर प्रभूच आहे

    साकारलेल्या सर्वत्र बाहेर व अंतरी राहे...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • ऋणमुक्त जीवन

    जीवन होते गर्दी मधले, मुंबापुरीचे त्याचे,

    खडतर असती मार्ग सारे, येथील जगण्याचे...१,

    दिवस होता त्याचेसाठी, तारेवरची कसरत

    धावपळ करीत असता, सावध ठेवी चित्त....२,

    जाण होती एकची त्याला, मृत्यू आहे स्वस्त इथे

    सज्ज राही सदैव मनी, स्वागत करण्या त्याते....३,

    ठेवीत होता धन थोडेसे, स्वत:चे जवळी,

    उपयोगी ते पडेल केंव्हां, येत्या संकटकाळी....४,

    लिहून ठेवीले पत्र एक ते, त्याने खिशामाजी

    “ऋणमुक्त जीवन व्हावे, अंतीम इच्छा माझी”......५,

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०