दु:खातची शिकतो सारे,
उघडोनी मनाची द्वारे ।
दु:खा परी नसे कुणी,
जो सांगे अनुभवाने ।।१।।
दु:ख मनावरी बिंबविते,
वस्तुस्थितीची जाणीव देते ।
दुसऱ्या परि आस्था देई,
जाणीव ठेवूनी कार्य करते ।।२।।
अधिकाराने माज चढतो,
खालच्यांना तुच्छ लेखतो ।
जाता हातातूनी अधिकार,
माणूसकी काय? हे कळणार ।।३।।
कष्ट करण्याची वृत्ती येते,
सर्वांना समावून घेते ।
श्रीमंतीमध्ये वाहून जाती,
आरामाची नशा चढती ।।४।।
गरीबी शिकवते मेहनत,
कष्टाने राही आनंदात ।
अनुभवासारखा शिक्षक,
नसे दुजा परि एक दु:ख ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हे मयुरेश्वर, श्रीसिद्धिविनायक
हेरंभ, लंबोधर शुभाय
प्रगटलास विविध रुपा धरणीवर ह्या
तुझ्या कृपेचा आशीर्वाद द्याया
वंदू तुजला प्रथपुजीताय !
बल्लाळेश्वर, वरदविनायक
रूप तुझे मोहक सुंदर
तुंदिल शोभे लंबोधर
तुझीया दर्शना चिंता-कष्ट दूर
वंदू तुजला गणाध्यक्षाय !
चिंतामणी, गिरिजात्मक
आम्हीं तुझी बालके अडाणी
बोबडे बोल, आमुची वाणी
शहाणे करण्या सत्वर येशी
भक्ती-सेवेत आम्हां गुंतवीशी
वंदू तुजला श्रीभक्तकल्याणाय !
श्रीविघनेश्वर, महागणपती
मोदकांवरी प्रीती भारी
एकवीस नैवैद्याते अर्पण सत्वरी
आनंदाने सर्व स्वाहीशी
तृप्तीचे एकवीस ढेकर पिताश्री देती
वंदू तुजला एकदंता, भालचंद्रा !
काय वर्णाव्या तुझ्या लिला
आमच्या अल्पमती बुद्धीच्या पलीकडल्या
करुनिया अल्पश्या गुणसंकीर्तना
ठेवितो तुझ्याया चरणी माथा
वंदू तुजला शूर्पकर्णाय विकटाय !
घेउनी पंचारती, मंजुळ वाजंत्री अनेक
सहर्ष स्वागता आम्हीं सज्ज
मानुनी घे मोदकापरी गोड
भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिस !
जगदीश पटवर्धन
तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी
उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी
वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो
सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो
अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो
जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो
विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी मालक
दुजास देण्यातील आनंद, हाच मिळवित असे एक
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
करू नकोस विचार त्याचा,
करणे नाही जेंव्हां तुजला
मोलाचे हे जीवन असता,
व्यर्थ दवडशी वेळ कशाला....१
दोन घडीचे जीवन सारे,
क्षणा क्षणाने जाईल निघूनी
कुणासाठी हा काळ थांबला,
उत्तर याचे घे तू शोधूनी....२
लहरी उठतील विचारांच्या,
आघात होता जेंव्हां मनी
विवेक बुद्धीने शांत करावी,
भाव तरंगे त्याच क्षणी....३
मर्यादेचे आयुष्य असता,
वाहू नकोस विचार प्रवाही
भगवंताचे स्मरण करण्या
वेळेची परि बचत करावी....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
राहू केतुनो सोडून द्या तुम्ही, मगरमिठीतून चंद्राला
बघा बघा ह्या प्रथ्वीवरती, काय तो हा: हा: कार मजला
प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो, सौंदर्याचा मुकुटमणी
झाकळला सारा नभात हा, म्हणती त्यास गिळला कुणी
आत्मा जाता सोडून देहा, उरे न कांही मागे
चंद्र चांदणे नभात नसता, सौंदर्याची मिटतील अंगे
सौंदर्यातची बघतो सारे, जगण्यासाठी सौंदर्य हवे
विश्वचक्र हे फिरत रहाण्या चंद्राचे आस्तित्व सतत हवे
नष्ट होतील जीवजीवाणू, आनंद त्यांचा जाईल विरुनी
बलिदानाच्या पुण्याईने परि सुटेल चंद्र मगरमिठीतून
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
स्मृतीलहरींच्या झुल्यावरती
मी नित्य सुखात झुलतो आहे
आठव सारेच गगनभारले
भावशब्दातुनी गुंफीत आहे
सुखदुःखांची संमिश्र सावली
अजुनही ती साथसंगती आहे
मनांतर कधी नाही बदलले
संवेदना नैसर्गी तीच आहे
जढणघड़ण सुंदर संस्कारांची
जीवन आज कृतार्थी आहे
मैत्र नात्यांचे छान लाभले
हीच जन्माची श्रीमंती आहे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०९
२८/११/२०२२
जगमोगन रेड्डी नी “घराणेशाही” साठी “भुकंप” घडवला ?
विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित
कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।
राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी
राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।
नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे
परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।
आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं
काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।
दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे
राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।
सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti