(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ३ बौद्ध philosophies

    ‘हंपी’ सिनेमा बघत होते… साधारण अर्ध्या तासानंतर, ललित प्रभाकरच्या तोंडी एक वाक्य आहे… की Buddhist philosophy प्रमाणे जीवनात तीनच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात…

  • ऑलिव्ह ऑईल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते

    जेवणात अथवा खाण्यासाठी आपण कोणते तेल वापरतो यावरही आपले आरोग्य अवलंबुन असते. आजकाल जेवण बनविण्यासाठी कोणते तेल वापरावे याबद्दल बहुतेक जण जागरुक असतात. अगदीच डॉक्टबरांच्या सल्ल्याने नाही तर सर्वसाधारण माहिती घेऊनच आज तेलाचा वापर केला जातो. ज्या तेलामध्ये फॅट्‌स कमी अथवा कॅलरिज कमी अशा तेलाचा वापर करण्याकडे सर्वांचा कल असतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात असे लक्षात आले आहे की, ऑलिव्ह ऑईल हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. ऑलिव्ह ऑईल शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी तर करतेच याशिवाय रक्तषदाबाची पातळीही आटोक्याशत ठेवण्यामध्ये ऑलिव्ह ऑईल लाभदायक ठरते. दिवसेंदिवस लोकांना ऑलिव्ह ऑईलचे आरोग्यासंबंधीचे महत्व पटताना दिसत आहे. या दोन महत्वाच्या फायद्यांबरोबरच ऑलिव्ह ऑईलमुळे आणखीही अनेक फायदे होतात. ऑलिव्ह ऑईलमुळे त्वचा तुकतुकीत होते. ऊन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सनबर्न होऊ नये यासाठीही हे फायदेशीर आहे. केस सिल्की आणि मऊ बनविण्यासाठी, त्वचेवर असलेले स्ट्रेच मार्क्सा घालविण्यासाठी, डोक्याकतील कोंड्यापासून मुक्तीन मिळवण्यासाठी अशा अनेक गोष्टींमध्ये ऑलिव्ह ऑईल उपयुक्तस ठरते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २

    अनाद्यंतमाद्यं परं तत्त्वमर्थं
    चिदाकारमेकं तुरीयं त्वमेयम् |
    हरिब्रह्ममृग्यं परब्रह्मरूपं
    मनोवागतीतं महःशैवमीडे ‖ २ ‖

    कैलासनाथ भगवान शंकरांच्या या नितांत रमणीय स्तोत्रात त्यांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    अनाद्यंतम्- जे अनादि तत्त्व आहे. जे अनंत आहे. अर्थात ना ज्यांना आदी आहे ना अंत आहे. जे आहेतच आहेत. परम सनातन शाश्वत आहेत.
    आद्यं - जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे प्रथम तत्व आहेत. आदि तत्व आहेत.
    परं तत्त्वम् - जे सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे. अंतिम सत्ता आहेत.
    अर्थं- जे खऱ्या अर्थाने प्राप्त करावी अशा प्रकारचे तत्व आहे. मिळवण्याचे अंतिम स्थान आहे. जीवाने शरण जाण्याचे परमश्रेष्ठ स्थान आहेत.
    चिदाकारम्- ज्यांचे स्वरूप म्हणजेच काही चैतन्याचे प्रगटीकरण आहे. निर्गुण निराकार चैतन्याचा सगुण साकार अविष्कार आहेत.
    एकं - ज्यांच्या समान अन्य कोणीही नाही. एकमेवाद्वितीय. अतुलनीय.
    तुरीयं - तीन गुणांच्या अतीत असणारी चौथी समाधी अवस्था असणारे. सदैव त्याच अवस्थेत स्थिर असणारे.
    त्वमेयम् -मेय म्हणजे मोजमाप. अमेय म्हणजे याचे मोजमाप करताच येत नाही असे. अपरंपार. अमर्याद.
    हरिब्रह्ममृग्यं- हरी म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव यांच्याद्वारे मृग्य म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा शोध घेतला जातो असे.
    पुराणकथेनुसार ज्यावेळी भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट होतात त्यावेळी भगवान विष्णू कासवरूपात खाली तर भगवान ब्रह्मदेव हंसरूपात वर त्यांचा शोध घेतात. पण त्या दोघांनाही यांच्या स्वरूपाचा अंतपार लागत नाही.
    परब्रह्मरूपं- परब्रह्मस्वरूप असणारे.
    मनोवागतीतं- मन आणि वाइनच्या आतीत असणाऱ्या, महःशैवमीडे - भगवान शंकराची मी स्तुती करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • रेल्वेसिग्नल्स

    रेल्वेप्रवास विनाअपघात सुरू राहण्यात सिग्नलची व्यवस्था अपरिहार्य असते.

    जेव्हा इ.स. १८०६ च्या सुमारास दगडीखाणी असलेल्या जागांजवळ घोडे व गाढवे यांच्याद्वारा ओढून नेल्या जाणाऱ्या मालगाड्या प्रथम वापरण्यास सुरुवात झाली, तेव्हा रखवालदार रेल्वेलाईनवर उभं राहून हातानं सिग्नल दाखवीत. अशा वेळी काळोखामध्ये मिणमिणत्या कंदिलांचा उपयोग केला जात असे.

    जगातील पहिली इंजिन लावलेली प्रवासी गाडी डार्लिंग्टन ते स्टॉकटोन या अंतरात जेव्हा प्रथम धावली, त्यावेळी त्या मार्गावर रेल्वेसिग्नलस् नव्हते. घोड्यावर आरूढ झालेल्या पोलिसांनी गाडीपुढे धावत मार्ग मोकळा करून दिला होता. हळूहळू ठरावीक अंतरावर ऐटबाज पोलीस उभे राहून मार्ग खुला ठेवीत. पुढे खांबावर फिरणाऱ्या हाताच्या आकाराच्या विविध रंगांच्या चकत्यांचा वापर करून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली. रात्रीच्या वेळी स्टेशनवर मेणबत्तीच्या उजेडात गाडीला मोकळा मार्ग दाखविला जात असे.

    जसजशी गाड्यांची संख्या वाढू लागली, तसतशी सुरक्षिततेची गरज अधिकाधिक जाणवू लागली. गाड्यांचा वेग वाढला. त्यातून आंतरबद्ध प्रणालीमुळे (इंटरलॉकिंग सिस्टीममुळे) एका वेळी एकच गाडी जात असे. याकरता जाड वायरने सांधे हलविले जात. हे काम पाँईंटमन करीत. पुढील काळात स्टेशन येण्याच्या आधी व नंतर उंचावर केबिन बांधण्यात आल्या. या जागेवरून पाँईंटमन प्रचंड मोठा लोखंडी दांडा हातानं हलवून सांधे बदलू लागले व गाडीला झेंडा दाखविण्याचं काम केबिनमन करू लागले.

    दोन स्टेशनांमधील संवाद वायरलेसनं साधता येऊ लागल्यावर, पुढच्या स्टेशनची परवानगी असल्याशिवाय आधीच्या स्टेशनातून गाडी पुढे सोडलीच जात नसे.

    जिथे एकेरी मार्ग होता त्या स्टेशनवर इंजिन ड्रायव्हरला 'नील्स बॉल टोकन' मिळत असे. या टोकनमधून पुढील मार्गांची संपूर्ण माहिती दिली जात असे.

    यानंतरच्या काळात तांबडा, पिवळा व हिरवा ह्या तीन मुख्य रंगांचे प्रखर उजेड असलेले सिग्नल्स सुरू झाले. तांबड्या रंगाचा सिग्नल म्हणजे पूर्णपणे थांबणे, पिवळा रंग म्हणजे गाडी सावकाश, खबरदारी घेत हळूहळू पुढे नेणे; तर हिरव्या रंगाचा सिग्नल म्हणजे गाडी सुखरूप पुढे जाण्यास परवानगी आहे अशी ही सिग्नल्सच्या रंगांची आजही सुरू असलेली गृहीतकं तेव्हाही प्रचलित होती.

    सिग्नल्सचं संपूर्णपणे विद्युतीकरण झाल्यामुळे आणि पूर्णतः स्वयंचलित यंत्रणा असणारे सिग्नल्स सुरू झाल्यामुळे मात्र खरी क्रांती झाली. गाडीचा पहिला डबा सिग्नल ओलांडून गेल्यावर लागलीच तांबडा दिवा लागतो. (Track Circuiting). केबिनमधील 'सेंट्रल कंट्रोल पॅनल'वर जाणाऱ्या व येणाऱ्या या सर्व गाड्या छोट्या दिव्यांच्या स्वरूपांत दिसतात. एखाद्या गाडीने चुकीमुळे लाल सिग्नल ओलांडला तर ड्रायव्हरला धोक्याची सूचना मिळते; परंतु तरीही गाडी थांबविली नाही, तर मात्र गाडीला ब्रेक लागत ती हळूहळू थांबते. या यंत्रणेमुळे गाडीची सुरक्षितता जवळजवळ शंभर टक्के नक्की झाली आहे.

    मुख्य शहराच्या बाहेर गेल्यावर, रेल्वेमार्गाची संपूर्ण जबाबदारी मधल्या, स्टेशन्सवरील स्टेशनमास्तर, केबिनमन, त्याचा मदतनीस पाँईंटमन यांच्यावर असते. रात्रीच्या वेळी केबिनमन केबिनच्या खिडकीतून हिरवा किंवा लाल प्रखर दिवा दाखवितो.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • जागतिक वन्यजीव दिवस

    वन्यजीव शिकार थांबून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने ३ मार्चला जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. १९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

  • बनावट संशोधन

    चित्रपटांमध्ये कुणीतरी डॉ. नो,, सिंकारा, डाँग किंवा कोणतातरी ‘पुरी’ आपल्याजवळ वैज्ञानिकांची फौज बाळगतो आणि आपल्याला हवे असणारे रसायन, अस्त्र किंवा बॉम्ब तयार करवून घेतो. काही गोष्टी खऱ्या वाटत नाहीत, परंतु असे दृश्य खरे असावे यावर विश्वास ‘लायंसेंको’ प्रकरणावरून बसतो. या प्रकरणामुळे खोटे संशोधन, सत्ताधाऱ्यांचा स्वार्थ, शास्त्रज्ञांच्या हत्या आणि हे सर्व ज्याच्यामुळे घडून आले, त्या तथाकथित शास्त्रज्ञाची आत्महत्या इतके सर्व जगासमोर आले.

  • घरातच फुलवा बाग

    घराभोवती बाग फुलवण्याची कितीही इच्छा असली तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे बागेसाठी जागा पुरत नाही. अशा वेळी निसर्गप्रेमींना घरातच बाग फुलवावी असे वाटते. इनडोअर प्लॅन्ट्समुळे ते सहज शक्य होते. या रोपांमुळे घर सुशोभित होतेच, पण हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढही होते. थोडी काळजी घेतली आणि वेळेवर खत-पाणी दिले तर घरातील बागही आपल्याला बाहेरच्या बागेसारखाच आनंद देते.

  • गरज ई-साक्षरतेची

    भारत देश विकासात्मक प्रक्रियेत अग्रेसर होत असून जगातील अर्थव्यवस्थेत तो आपले स्थान भरभक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटलायझेशनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दि. १ जुलै २०१५ पासून भारतात ख-या अर्थाने डिजिटलायझेशनला सुरुवात झाली असे म्हणता येईल. डिजिटल इंडिया असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले.

  • टीव्ही बघणे…एक क्रिया

    आपण टीव्ही वर जेव्हा कार्यक्रम पाहतो तेव्हा आणखी काय काय दिसते? प्रत्येक चॅनेल आपले नाव, तारीख व वेळ दाखविते. याव्यतिरिक्त बर्‍याच वेळा टीव्हीचा पडदा इतर कशा-कशाने व्यापलेला असतो. हे ‘इतर’ म्हणजे काय? तर कार्यक्रमांसंबंधी आणि प्रयोजक कंपन्यांच्या वस्तू व सेवेशी संबंधित जाहिराती, सूचना, निवेदने, आवाहने इत्यादी. हे सर्व चित्र, लिखित शब्द (Text)  व ध्वनी या स्वरूपात असते. टीव्ही पहात असताना डोळे व कान काम करत असतात आणि हो, मेंदूही.

  • अल्बर्ट आइनस्टाइन ! अर्थात देशो देशीचे ज्ञानेश्वर !!!

    अल्बर्ट आइनस्टाइन..... एका महान भौतिक शास्त्रज्ञ , ज्याच्या सापेक्षवादाच्या सिद्धांता मुळे आपल्या विश्वासंबंधीच्या कल्पनेमध्ये अतिशय अमुलाग्र आणि क्रांतिकारक बदल झाला.

    अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म शुक्रवार १४ मार्च १८७९ या दिवशी दक्षिण जर्मनीतील उल्म या संपन्न गावात झाला.हर्मान आणि त्यांची पत्नी पौलिन यांचा हा पहिला मुलगा .त्याच्या डोक्याचा आकार जर वेगळा होता. इतर मुलांच्या मानाने बोलायला उशीरा लागल्याने त्याच्या आईला तो मतीमंद असावा अशी भीती वाटत असे.इतर मुलांबरोबर खेळ खेळल्यावर मी दमतो अशी तो तक्रार त्याच्या आई जवळ करीत असे.तो खूप शांत आणि एकांत प्रिय होता.मस्ती करण्यापेक्षा वाचन आणि संगीत ऐकणे हा त्याचा छंद होता.अल्बर्ट नेहमी धीरगंभीर पण निश्चयी स्वभावाचा होता.अतिशय एकाग्रतेने तो पत्याचा बंगला बनवीत असे. पण लहानपणी तो शांत असला तरी सहनशील नव्हता .५ वर्षाचा असताना त्याने रागाच्या भरात त्याच्या शिक्षिकेला खुर्ची फेकून मारली होती .या घटनेचा त्याच्या मनावर खोल परीणाम झाला आणि निश्चय पूर्वक तो विवेकी बनला.

    अल्बर्ट याचे त्याची बहिण माजा आणि त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होते .आई वडिलांना आणि बहिणीला त्याने कधीही अंतर दिले नाही.अल्बर्ट ची आई बुद्धिमान होती.वडील अभियंते होते.अल्बर्ट चा भाऊ जेकब आणि त्याच्या वडिलांचा एक कारखाना होता.

    अल्बर्ट च्या वडिलांनी लहानपणी त्याला एक होकायंत्र दिले होते. होका यंत्राची सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशाच दाखवते हे लक्षात आल्यावर त्याला खूप कुतूहल वाटले .तो या घटनेने इतका उत्तेजित झाला कि त्याच्या अंगाला कंप सुटला . त्यावेळी तो जेमतेम ६ वर्षाचा होता.त्याला ते सर्व गूढ वाटले आणि गूढ शक्तीची उकल करण्याचा ध्यास त्याने घेतला.
    काही वर्षांनी गणितातील संख्यांच्या बाबतीत सुद्धा काही तरी गूढ आहे असे त्याला वाटू लागले.गणित आणि विज्ञान याचे आकर्षण वाढले आणि अंधार कसा पडतो ? सूर्याचे किरण कशाचे बनलेले आहेत ? या सारख्या प्रश्नांची उत्तरे तो शोधण्याचा प्रयत्न करू लागला.या संबंधी प्रश्न विचारून तो त्याच्या वडील आणि काकांना भंडावून सोडत असे.अल्बर्ट शाळेतल्या इतर मुलांबरोबर रमत नसे पण अभ्यासात तो खूप हुशार होता.त्याचा वर्गात नेहमी १ ला नंबर येत असे.

    वयाच्या १० व्या वर्षात अल्बर्ट स्वतःच गणित शिकू लागला.शाळेचा ठरलेला गृहपाठ झाला कि अल्बर्ट गणितातील कोडी सोडवत बसत असे.

    जर्मन कायद्या प्रमाणे अल्बर्ट ला घरच्या घरी धर्म शास्त्राचे शिक्षण मिळाले.आइनस्टाइन कुटुंब ज्यू धर्माचे होते.घरी धार्मिक आचार विचार काटेकोरपणे पाळले जात .परंतु ज्या परमेश्वरावर विश्वास ठेव असे त्याचे शिक्षक नेहमी सांगत त्या परमेश्वरावरील त्याचा विश्वास वयाच्या १२ व्या वर्षीच पूर्ण पणे उडाला .पण निसर्गातील आश्चर्यकारक घटनांकडे तो मोठ्या कुतूहलानी पाहत असे.

    या दरम्यान अल्बर्ट च्या आई वडिलांनी कारखान्यात खोट आल्याने म्युनिच मधील आपला व्यवसाय गुंडाळला आणि ते इटलीला गेले.अल्बर्ट शिक्षण पूर्ण करण्यासाठी जर्मनीतच राहिला.परंतु वयाच्या १७ व्या वर्षी लष्करात भरती व्हावे लागेल म्हणून त्याने जर्मनी सोडली आणि तो आपल्या आई वडिलांकडे इटलीला गेला.अल्बर्टला युद्ध , रक्तपात ,हिंसा हे अत्यंत पाप आहे असे वाटे. त्याच्या मनात दुस-याला मारणा-या लोकांबद्दल घृणा उत्पन्न झाली.
    अल्बर्ट पदवीधर झाल्यावर नोकरी शोधत होता.जवळ जवळ वर्षभर त्याला नोकरी मिळाली नाही.शेवटी एका शाळेत त्यास शिक्षकाची हंगामी नोकरी मिळाली.त्याला ती नोकरी प्रथम आवडली नव्हती पण नंतर त्याला शिक्षकी पेशा आवडू लागला.अध्यापन करताना त्याने आपले संशोधनाचे कार्य सुरु ठेवले.अल्बर्ट च्या विज्ञान विषयाच्या कल्पना भन्नाट असायच्या . तो नियतकालीकांतून लेख लिहायचा.१९०१ मध्ये त्याने झुरिच विद्यापिठात पी एच डी साठी पाठवलेला प्रबंध झुरिच विद्यापीठाने नाकारला.अल्बर्ट निराश झाला पण ऐन वेळी त्याच्या मदतीला त्याचा जिवलग मित्र मार्सेल ग्रोसमान धावून आला.त्याचे वडील स्वित्झेर्लंड मधील बडे प्रस्थ होते.त्यांनी बर्न शहरातील आपल्या मित्राकडे अल्बर्ट ची शिफारस केली.ते संशोधनाच्या पेटंट देणा-या कार्यालयाचे प्रमुख होते.१९०२ मध्ये अल्बर्ट ला त्या संस्थेत नोकरी मिळाली.स्विस संशोधकांनी पेटंट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची नोंदणी आणि छाननी हि संस्था करीत असे.या संस्थेत अल्बर्ट तंत्र विषयक तज्ज्ञ तिसरा वर्ग ( कनिष्ठ )म्हणून नोकरीला लागला.या कार्यालयात अल्बर्ट आइनस्टाइन यांस तंत्रविषयक सल्लागार (दुसरा वर्ग ) अशी पदोन्नती मिळाली.ते काम करताना त्याला स्वतःचे संशोधन करण्यासाठी खूप वेळ मिळू लागला.

    याच अल्बर्ट आइनस्टाइन याने नंतरच्या काळात जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताने संपूर्ण जगाचे लक्ष त्याने वेधून घेतले .

    E = mc²

    उर्जा =वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग हे अल्बर्ट आइनस्टाइन यांचे जग प्रसिद्ध सूत्र .यात कोणतीही गोष्ट प्रकाशाच्या वेगा पेक्षा ज्यास्त वेगाने जात नाही.... हे या सूत्राने स्पष्ट पणे दाखवून दिले .अल्बर्ट आइनस्टाइन यांनी न्युटनचा निरपेक्ष काळाचा सिद्धांत मोडीत काढलाच पण प्रत्तेक व्यक्तीगणित काळ व्यय वेगळा असतो आणि ती व्यक्ती किती जलद अथवा मंद गतीने हालचाल करीत आहे यावर काळव्यय किती होणार ते अवलंबून असते.उदाहरणार्थ --जवळ जवळ प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणा-या यानात बसून काही अंतराळवीर अवकाशात गेले तर त्या अंतराळवीरांच्या दृष्टीने ,त्यांचा काळव्यय पृथ्वीवर मागे राहिलेल्या माणसांपेक्षा कमी गतीने होईल .अर्थात नेहमीच्या गतीने जाणा-या माणसांसाठी न्युटनचा नियमही लागू पडतो.काही वस्तू प्रकाशाच्या वेगा इतपत वेगाने जावू लागल्या तर त्या आहेत त्या पेक्षा मोठ्या भासतील आणि त्यांच्या वस्तुमाना मध्ये प्रचंड वाढ होईल असे आइनस्टाइन यांनी प्रतिपादन करून गणिताच्या आधारे ते सिद्ध केले.
    संत ज्ञानेश्वर यांना जसे धर्ममार्तंड लोकांचा विरोध सहन करावा लागला तसाच अल्बर्ट आइनस्टाइन यांना तो सहन करावा लागला.त्यांचा हा नवा सिद्धांत मान्य करणे तत्कालीन शास्त्रज्ञ समूहाला खूप अवघड होते आणि त्यांचे सिद्धांत चटकन समजतही नसत.

    अणु बॉम्ब चा स्फोट ......!

    अणु भंजन करून खूप मोठी संघटक शक्ति मुक्त होईल याची जाणीव आइनस्टाइन यांनी जगाला करून दिली.आधुनिक याने, अंतराळातील होणारे प्रयोग याचे खरे जनक आइनस्टाइन हे आहेत हे संपूर्ण जगाने मान्य केले.Run away reaction हि रसायन शास्त्रातील स्फोट घडवणा-या प्रक्रियेला आइनस्टाइन यांच्या मुळे चालना मिळाली.प्रचंड वेगाने याने पृथ्वीचा तळ सोडण्यासाठी आणि पृथ्वीचे आवरण फोडून अवकाशात झेप घेण्यासाठी लागणा-या उर्जेचे , वेळेचे आणि गतीचे गणित आइनस्टाइन यांच्या सिद्धांताने सुटले . आज त्याचीच गोड फळे आपण चाखत आहोत.

    हिटलर आणि आइनस्टाइन --

    जर्मनी हि श्रेष्ठ आर्य वंशाच्या लोकांची भूमी असून ज्यू , जिप्सी ,किवा अन्य कोणत्याही धर्माच्या लोकांना जर्मनीत राहता येणार नाही असा फतवा हिटलर ने काढला .अनेक ज्यू लोकांनी तेथून पळ काढला तर अनेक भूमिगत झाले.या नाझी वादाशी मुकाबला करण्यासाठी अल्बर्ट आइनस्टाइन याने आपले सारे वैज्ञानिक ज्ञान वापरले.१९३९ साली त्यांनी अमेरिकेच्या रूझवेल्ट या अध्यक्षांना पत्र लिहिले .अणुशक्तीवर आधारित शस्त्रे तयार करणे शक्य आहे हे त्यांनी रूझवेल्ट यांना सांगितले.१९४१ साली रूझवेल्ट यांनी त्यांच्या सरकारी शास्त्रज्ञ समूहाला अणू बॉम्ब तयार करण्यास सांगितले.१९४३ साली आइनस्टाइन यांची अतिशय उच्च दर्जाच्या स्फोटक विषयक सल्लागार समितीचा प्रमुख म्हणून अमेरिकेने नेमणूक केली . जर्मनांना अणु बॉम्ब तयार करता येणार नाही याची पुसटशी जरी कल्पना मला असती तरी अणु बॉम्ब तयार करा असे मी अमेरिकेला सुचवले नसते असे निराश उद्गार आइनस्टाइन यांनी नंतर काढले होते.
    खरे तर आइनस्टाइन हे शांततेचे भोक्ते होते.त्यांना रक्तपात आवडत नसे म्हणूनच २ -या महायुद्धा नंतर आइनस्टाइन यांनी ज्या देशांनी अणू अस्त्र बनवली होती त्या त्या देशांनी ती नष्ट करावीत या साठी आइनस्टाइन यांनी जोरदार मोहीम उभारली.आपण एक अतिशय विनाश करणारी शक्ती मोकळी केली याचे शल्य जन्मभर आइनस्टाइन यांना होते . अणुशक्तीचा उपयोग विध्वंस करण्यासाठी न करता शांतते साठी आणि लोकांच्या दैनंदिन व्यवहारात जगाच्या भल्या साठी करावा असे त्यांचे मत होते. त्यांच्यातला ' विवेक ' आपण लोकांच्या हातात हे काय ज्ञान देवून बसलो याची खंत करीत असे.अणू शक्तीच्या दुष्परिणामाची जाणीव त्यांना झाली होती. जगाची हानी टाळण्यासाठी हे नवे तंत्रज्ञान अतिशय कडक नियंत्रणा खाली ठेवले पाहिजे असा इशारा त्यांनी सर्व जगाला त्याच वेळी दिला होता.१८ एप्रिल १९५५ रोजी आइनस्टाइन यांची प्राण ज्योत मालवली. आइनस्टाइन यांचा मेंदू त्याच्या मृत्यू नंतर प्रिन्स्टन हॉस्पिटल च्या पथौलॉजी च्या पयोग शाळेत परीक्षण करण्यासाठी जतन केला गेला.त्याच्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचे नमुने तपासले गेले त्यात अनेक आश्चर्य कारक गोष्ठी उघड झाल्या. आइनस्टाइन यांच्या मेंदू बाबत स्वतंत्र लेख लिहिता येईल .आजवर त्यांच्या मेंदूवर १००००० हून अधिक शास्त्रीय लेख वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहेत .अजूनही त्यावर संशोधन सुरु आहे.

    संत ज्ञानेश्वर आणि अन्य देशातील थोर शास्त्रज्ञ यांच्या काही समान दुवे आहेत परंतु त्यांच्यात काही मुलभूत फरक सुद्धा आहे. या लेखमालेच्या शेवटी मी तो लिहिणार आहे.

    -- चिंतामणी कारखानीस -