६०वर्षांपूर्वी मायकल वुडरफ यांनी ब्रिटनच्या हॉस्पीटलमध्ये जिवंत व्यक्तिवर किडनी प्रत्यारोपण केलं होतं. याआधी १९५४ ला अमेरिकाचे डॉक्टर जोसेफ ई मरे यांनी पहिल्यांदा प्रत्यारोपण केलं होतं. पण ते मृत व्यक्तीवर केलं होतं.
वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दप्रयोगातल्या वैज्ञानिक या शब्दामुळं थोडीशी दिशाभूल होते. वैज्ञानिक आपल्या संशोधनकार्यासाठी जी प्रणाली वापरतात ती या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात अभिप्रेत आहे. वैज्ञानिक आपलं काम कसं करतात? तर ते कोणतंही विधान तसं सहजासहजी किंवा कोणाच्याही दबावाखाली मान्य करत नाहीत.
भप्पी सोनी दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट २६ एप्रिल १९६८ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाच फिल्म फेअर पारितोषिके मिळाली होती. या चित्रपटातील सर्व गाणी लाजबाब होती.
विस्तारीकरणासाठी कैक वर्षापासून उभारलेले व कामगारांचे श्रद्धास्थान असलेले गणेशमंदिर मुळापासून हलवले जाते व नवऱ्याला यासाठी प्रथमच कडाडून विरोध करणारी व प्रसंगी त्याच्या विरोधात जाणारी वीणादेखील उन्मळून पडते तुटते. दोघांच्याही या आस्तिक-नास्तिकच्या लढ्यामध्ये,दोघांमध्ये दुरावा व अबोला येतो. त्यातच तिचं Miscarriage हि होते. मरणासन्न अवस्था होते.
साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं. शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्म वेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकाना अचूक तारीख सांगता यायची नाही. त्यामुले जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकचा एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. पण गुरुजींना एझ्याट तारीख हवी असल्याने, पण ती काही पालकांना सांगता यायची नाही. मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ – दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली.
इडलीचा जेव्हा विषय येतो तेव्हाअप्रत्यक्षपणे साऊथचे म्हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. पण असे म्हणतात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. पाक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते ८०० ते १२०० इ.पूर्वमध्ये भारतात इडली आली आहे. ‘इडली’ शब्दा ची निर्मिती ‘इडलीग’ यापासून झाली होती. याचा उल्लेख ‘कन्नड’ साहित्यात आढळतो.
१९४३ साली दुसरे महायुद्ध चालू होते. नेताजींनी जपान व जर्मन सरकारांशी संगनमत करून आझाद हिंद सेनेकडून ब्रिटिश प्रदेशावर आक्रमणे सुरू केली. या मोहिमेचा भाग म्हणून अंदमान-निकोबार द्विप समुह त्यांनी जिंकला.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत ‘किशोर’ची निर्मिती झाली, ती मूळ संकल्पना होती, तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांची.
अनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.
एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो.
Copyright © 2025 | Marathisrushti