नेमके कोणते पदार्थ एकमेकांपासुन वेगळे करायचे आहेत, त्या पदार्थाच्या कणाचा आकार कसा आणि केवढा आहे, त्यांनी एकमेकांपासून किती वेगाने आणि किती प्रमाणात वेगळं होणं गरजेचं आहे, या साऱ्याचं अवधान सांभाळत, त्यानुसार योग्य ते उपकरण वापरते, तीच आदर्श गृहिणी, गृहखात्याची चीफ इंजिनियर!
या चित्रपटाचे दिग्दर्शक होते किशोर साहू. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या गीतकारांनी लिहिलेल्या सदाबहार गीतांना ज्येष्ठ संगीतकार शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं.
कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
राजा भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार व कदंब यांनी ज्या प्रदेशावर राजसत्ता गाजवली. तो प्रदेश म्हणजे कोकणच ह्रदय म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा. १ मे १९८१ रोजी राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून या सिंधुदुर्गची निर्मिती केली. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणाचा दक्षिणेकडील भाग आहे. त्याची निर्मिती आधीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगूर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग अशा आठ तालुक्यांच्या एकत्रितकरणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे.
आंतरराष्ट्रीय श्रम संगठन (आयएलओ)नुसार जगभरात २१ कोटीपेक्षा जास्त मुलांकडून बालमजुरी करून घेतल्या जाते. संपूर्ण जगातून ७१पेक्षा जास्त देशांत बालमजूरी होते. विकासशील देशांत बालमजूरीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास भारतात बालकामगारांची संख्या खूप अधिक आहे.
यंदा जागतिक रक्तदान दिवसाची थीम ‘सुरक्षित रक्त, जीव वाचवते’ (Safe Blood Saves Lives) असून. ‘रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा’ (Give Blood And Make The World a Healthier place) हे या वर्षीचं स्लोगन आहे.
हिमालयाची डोंगररांग, हिमशिखरांतून वाहत येणाऱ्या नद्या व त्यांची खोरी, अप्रतिम जंगल अशा अनेक नैसर्गिक ठेव्यांचे वरदान लाभलेला असा हा अरुणाचल. एका चौरस किलोमीटरला १७ माणसे अशी भूभागाची वाटणी असलेला प्रदेश. स्थल पर्यटन, निसर्ग पर्यटन, ट्रेकिंग, माउंटन बायकिंग, राफ्टिंग अशा अनेक उपक्रमांसाठी पूरक अशी ही भूमी. भारतातील उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं अरुणाचल प्रदेश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं.
राजा हेन्री आठवा यांना त्याच्या सूप मध्ये केस सापडला,त्यांनी शाही शेफचा शिरच्छेद करवला होता, नंतर इतर शेफना टोपी परिधान करण्यास आदेश दिले. तेव्हा पासून जगातील सर्व शेफनी जेवण बनवताना टोपी (शेफ कॅप) घालावयास सुरुवात केली.
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
Copyright © 2025 | Marathisrushti