आजकाल सतत एक उपदेश ऐकवला जातो. वैज्ञानिक दृष्ठिकोन बाळगा. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आत्यंतिक गरज आहे. समाजधुरीण, रातकीय नेते, शिक्षणमहर्षी, एवढंच कशाला पण गल्लीतल्या सत्यनारायणाच्या पूजेला पाहुणा म्हणून बोलावलेला एखादा अभिनेता किंवा असाच पेज थ्रीवरचा सेलिब्रिटीही आपल्याला ते सुनावून जातो.

लेखाचं शिर्षक वाचून सगळ्यांना आश्चर्य वाटेल की अशा रंगाचं हृदय कसं काय असू शकतं ? तुम्हाला खरं वाटो की न वाटो अशा रंगाचं हृदय अस्तित्वात आहे. हो हो हो अहो असं घाबरून जाऊ नका , मी कुठल्या मनुष्याच्या हृदयाबद्दल बोलत नाही आहे , मी बोलतोय एका पदकाबद्दल. हे पदक खूप खास आहे. का ते जाणून घेऊ.
७ ऑगस्ट रोजी जांभळा हृदय दिन, सैन्य गुणवत्तेसाठी साजरा केला जातो. सर्वात जुनी अमेरिकन सैन्य गुणवत्ता तयार केल्याबद्दलचा हा स्मृतिदिन. पर्पल हार्ट बॅच , मिलिटरी ऑर्डरमधील पुरुष आणि स्त्रियांचा सन्मान करते. अमेरिकन क्रांतिकारक युद्धाच्या वेळी बॅज फॉर मिलिटरी मेरिटने सहा ज्ञात सैनिकांना गौरविले गेले होते.
जनरल जॉर्ज वॉशिंग्टनने १७८२ मध्ये बॅज ऑफ मेरिटची निर्मिती केली. वॉशिंग्टनने कोणत्याही एकुलत्या एक गुणवंत कृतीसाठी सैनिकांना हा सन्मान सादर करण्याचा मानस धरला. त्याच्या डिझाइनमध्ये चांदीच्या पातळ काठाने बांधलेला जांभळ्या हृदयाच्या आकाराचा रेशमाचा तुकडा होता. संपूर्ण चेहरा ओलांडून मेरिट हा शब्द चांदीमध्ये कोरला होता. हे बॅज अमेरिकन देशभक्ताचे धैर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे, परंतु हा पुरस्कार कोणी डिझाइन केला हे कोणालाही माहिती नाही.
वॉशिंग्टनच्या 200 व्या वाढदिवशी पर्यंत, जांभळ हृदय क्रांतिकारक युद्धातील तळटीप म्हणून कायम राहिले. जनरल डग्लस मॅकआर्थरच्या प्रयत्नातून अमेरिकेच्या युद्ध विभागाने जांभळा हृदयाची ऑर्डर तयार केली. आज पदक जॉर्ज वॉशिंग्टनचा अभिमान आणि त्याच्या ध्वजादि चिन्हं असलेली ढाल आहे.
नावांची अचूक आणि संपूर्ण यादी यापुढे अस्तित्वात नसली तरी नॅशनल जिओग्राफिकने अलीकडेच असा अंदाज वर्तविला आहे की जवळपास १.९ दशलक्ष सेवा सदस्यांनी जांभळ्या ह्रदयांची निर्मिती केली आहे. हा सर्वात जुना अमेरिकन सैन्य सन्मान आहे जो अद्याप सेवा सेवकांना दिला जातो. १९४४ पर्यंत पर्पल हार्टने सेवा सदस्यांच्या ह्या स्तुत्य कृत्याला मान्यता दिली. त्यानंतर १९४४ मध्ये, आवश्यकतेमुळे केवळ जखमी किंवा युद्धात ठार झालेल्यांसाठी हा पुरस्कार मर्यादित होता.
आजही हा पुरस्कार अमेरिकीन सैनिकांसाठी एक फार मोठा गौरव म्हणून ओळखला जातो.
purple heart day, August 7, USA, Washington
विस्तारीकरणासाठी कैक वर्षापासून उभारलेले व कामगारांचे श्रद्धास्थान असलेले गणेशमंदिर मुळापासून हलवले जाते व नवऱ्याला यासाठी प्रथमच कडाडून विरोध करणारी व प्रसंगी त्याच्या विरोधात जाणारी वीणादेखील उन्मळून पडते तुटते. दोघांच्याही या आस्तिक-नास्तिकच्या लढ्यामध्ये,दोघांमध्ये दुरावा व अबोला येतो. त्यातच तिचं Miscarriage हि होते. मरणासन्न अवस्था होते.
काही काळानी मी आरोग्याच्या विषयी व संगीत व चित्रपट या विषयी समूह चालू केले. संगीत व चित्रपट या विषयी लिखाण करत असताना एक कल्पना सुचली आपण रोज कॅलेंडर नुसार त्या त्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी, जन्मदिनी, स्मृतिदिनी त्यांची माहिती टाकावी, या कल्पनेला खूपच प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाने अनेक कलाकारांनी खूप छान प्रतिसाद दिला.
मरिन ड्राइव्ह म्हणजे ‘क्वीन्स नेकलेस’ इतकीच बहुसंख्य मुंबईकरांना त्याची ओळख आहे. मात्र हा नेकलेस तयार होण्याच्या काही वर्ष आधी नेकलेससमोरच्या अरबी समुद्रात भराव टाकून समुद्र मागे हटवण्यात आला होता. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून सध्या जिथं प्रेमीयुगुलं जिने-मरने की कसम खातात, तो समुद्रासमोरचा कठडा आणि पाथ-वे बांधण्यात आला, त्या घटनेला १८ डिसेंबरला तब्बल १०२ वर्षे पूर्ण झाली. ‘युनेस्को’ने वर्ल्ड हेरिटेज प्रथम श्रेणीचा मान या पाथ-वे आणि कठड्याला दिला आहे.
ब्रिटिशांच्या आमदानीत मुंबई हे दुसरं लंडन शहर वसविण्याचे स्वप्न पाहिलं जात होतं. त्यानुसार व्हिक्टोरिया टर्मिनस, जनरल पोस्ट ऑफिस, पश्चिम रेल्वे मुख्यालय, मुंबई महापालिका मुख्यालय अशा कलात्मक वास्तूशैलीचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू उभारण्यात आल्या. ब्रिटिशांची कलासक्त दृष्टी लंडनमधील वास्तूंसारखं बांधकाम मुंबईत व्हावं अशी होती. मरिन ड्राइव्ह पाहाण्याचा दृष्टिकोन तसाच होता. इंग्लंडमधून मुंबईत स्थलांतर केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुंबईची दमट हवा सहन होईना. त्यांनी समुद्राच्या ताज्या हवेत फेरफटका मारण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटपर्यंतचा अरबी समुद्राचा शेकडो एकर भूभाग मागे हटवून पाथ-वे बांधण्याचा प्रस्ताव मांडला व तो मंजूर झाला.
सरकारने मागणी मंजूर केली, तरी समुद्र मागे हटविणे वाटतं तितकं सोपे नव्हतं. मरिन ड्राइव्ह ते नरिमन पॉइंट अशा मोठ्या पट्ट्यात भराव टाकण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यावेळेस अरबी समुद्राची हद्द गिरगावच्या सध्याच्या केळेवाडी, चंदनवाडी स्मशानभूमीपर्यंत होती. तिथपर्यंतच्या चौपाटीवर भराव टाकण्यासाठी मुंबईच्या आसपासच्या भागातून माती आणून टाकण्यात आली. भराव टाकण्याच्या कामासाठी स्थानिक मजुरांचा वापर करण्यात आला. मुंबईच्या नैसर्गिक कलात्मक सौंदर्यांत भर टाकणाऱ्या या पाथ-वेचे बांधकाम डिसेंबर, १९१५ मध्ये सुरू झाले आणि पाच वर्षांत म्हणजे १९२० मध्ये पूर्ण करण्यात आले. समुद्रात एकूण १६०० एकर भूभागावर भराव टाकण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र फसलेले नियोजन, दलदलीचा कमी झालेला उपसा आणि कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप यांमुळे प्रत्यक्षात फक्त ४४० एकर भूभागावर भराव टाकण्यात ब्रिटिश सरकार यशस्वी ठरले. गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटच्या किनाऱ्यालगत असलेला उलट्या ‘सी’ आद्याक्षरासारखा किंवा चंद्रकोर आकाराचा हा पाथ-वे ४.३ किमी इतका विस्तारला आहे.
ब्रिटिश बांधकाम शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुंबईतील अशा अनेक वास्तूंची बांधकामं क्रिसेन्ट (चंद्रकोर) पद्धतीने केली आहेत. या पाथ-वेचे बांधकाम सुरू झाल्याचे आणि कधी संपल्याची साक्ष देणारा फाऊंडेशन स्टोन आजही चौपाटीजवळच्या मफतलाल तरणतलावच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. मरिन ड्राइव्ह भागात ब्रिटिशांची मरिन बटालियन लाइन्स होती. त्या नावावरून मरिन लाइन्स तसेच बटालियन्सच्या परेडमुळे मरिन ड्राइव्ह हे नाव पडलं असल्याचं सांगितलं जातं. पुढे या बटालियन्सच्या जागी एअरफोर्स कर्मचारी वसाहती आल्या. ब्रिटिश राजवटीत केनेडी सी-फेस नावाने ओळखला जाणारा हा परिसर स्वातंत्र्योत्तर काळात नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग नावाने ओळखला जाऊ लागला. मुंबईतील बेफाम आणि बेभान पाऊस पाहण्यासाठी मुंबईकरांसह परदेशी पर्यंटकांची पावलेही मरिन ड्राइव्हकडे वळतात. पहिल्याच पावसात पाणी तुंबून मुंबईकरांची दैना उडते. तसाच काहीसा प्रकार प्रकार मरिन ड्राइव्हबाबत पाथ-वे आणि कठडा बांधल्यानंतर झाला. पाथ-वेच्या भुपृष्ठातून अनेक ठिकाणी समुद्राचे पाणी शिरकाव करू लागले. त्यामुळे हे बांधकाम केल्यानंतर अवघ्या सहा वर्षांतच १९१६मध्ये पुन्हा पाथ-वेची डागडुजी ब्रिटिशांना करावी लागली. त्यानंतर तब्बल ८६ वर्षांनंतर पुन्हा पाथ-वेवर समुद्रातून पाणी शिरू लागल्याने २००६ मध्ये राज्य सरकारमार्फत दुरूस्ती करण्यात आली.
अलीकडे म्हणजे १९८० पर्यंत चर्नी रोडवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून उसळता अरबी समुद्र सहज दिसत असे. मात्र समुद्रासमोरच्या वास्तूंच्या वाढत्या आकारामुळे मुंबईकरांना समुद्र आणि दिसणं बंद झालं आहे. मुंबईत जागेला आलेल्या सोन्याचा भाव दक्षिण मुंबईसाठी फलदायी ठरला आहे. ब्रिटिश राजवटीत एक रुपयाच्या भाडेपट्टयावर घेतलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या इमारतीतील घरे चार-पाच कोटीपर्यंत सहज विकली जातात. मरिन ड्राइव्ह ते कफ परेडचा घरांचा दर तब्बल एक लाख रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. म्हणजे जमीनमालकांच्या सात पिढ्या बसून खातील इतकं मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं आहे. अर्थात हा चमत्कार समोरच्या अरबी समुद्राच्या बे-व्ह्यूमुळे झाला आहे.
क्वीन्स नेकलेसचा उल्लेख केला नाही, तर मरिन ड्राइव्हच्या इतिहासावर अन्याय केल्यासारखे होईल. मरिन ड्राइव्हसमोर असलेला इंग्रजी अक्षर ‘सी’सारख्या रचनेचा रस्ता रात्रीच्या वेळी पिवळ्या दिव्यांनी उजळला की त्याला पाहून राणीच्या गळ्यातला रत्नहारासारखा दिसतो, त्यामुळेच क्वीन्स नेकलेस म्हणून तो देश-परदेशातही प्रसिद्ध पावला. दुसर्या महायुद्धापूर्वी म्हणजे १९३५च्या सुमारास मरिन ड्राइव्हच्या पाथ-वेला जोडून असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. १९४० मध्ये हे काम पूर्ण झाले. रस्त्याच्या पलिकडे पश्चिम रेल्वेचे चर्नी रोड, मरिन लाइन्स स्टेशन आणि आताचा महर्षी कर्वे रोड बांधण्यात आला. त्यानंतर या भागात निवासी इमारतींच्या बांधकामांच्या हालचाली सुरू झाल्या. १९३० साली जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी मरिन ड्राइव्ह रोडसमोरच्या भागात कलात्मक रचना असलेल्या घरांचे डिझाइन तत्कालीन जमीन मालकांना करून दिली. समुद्रासमोर असलेल्या या घरांचे दर त्यावेळेसही प्रचंड महाग होते. पारसी आणि इंग्रज वगळता मुंबईतील सामान्य वर्गाला ही घरे परवडणारी नव्हती. त्यावेळी बर्यापैकी गर्दी आटोक्यात असतानाही मुंबईत घरे भाड्याने घेणं लोक पसंत करीत. दरम्यान १९४५च्या सुमारास भारत-पाकिस्तान फाळणीच्या चर्चा होऊ लागल्या. त्याचा लाभ जमीनमालकांनी उठवला. फाळणीनंतर हजारो श्रीमंत हिंदू कुटुंबीयांनी मुंबईत मरिन ड्राइव्हला स्थलांतर केले.
या कुटुंबीयांचे नातलग आजही या भागात वास्तव्यास आहेत. मरिन ड्राइव्हच्या जुन्या इमारती जवळपास दादरच्या शिवाजी पार्क किंवा हिंदू कॉलनीतील इमारतींसारख्या दुमजली ठेंगण्या-ठुसक्या आहेत. कमी मजल्यांमुळे इमारतींना कलात्मक टच देणे शक्य झाले आहे. या बांधकामांचे वैशिष्ट्य म्हणजे मरिन ड्राइव्ह सी-फेस मोकळा सोडून गिरगाव चौपाटीसमोरच्या भागात या इमारती बांधण्यात आल्या आहेत. सी-व्ह्यू स्पष्ट दिसावा असा यामागचा उद्देश असावा. काही वषानंतर चर्नी रोड आणि मरिन ड्राइव्ह समुद्राच्या भागात क्लब, जिमखाने उभे राहिले आहेत. योग शिक्षण देणारी कैवल्यधाम ही वास्तू मरिन ड्राइव्हच्या समुद्रासमोर १९३९ला बांधण्यात आल्याचा उल्लेख संस्थेत पाहायला मिळाला. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारी मुद्रणालय, मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, तारापोरवाला मत्स्यालय, जवाहर बालभवन या वास्तू उभ्या राहिल्या. पुढे नरिमन पॉइंट ते कफ परेडपर्यंत हजारो इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्यातील बहुसंख्य बांधकामे ७० नंतर उभी राहिली आहेत.
समुद्राकडून येणाऱ्या भन्नाट वारा आणि मरिन ड्राइव्हचा कठडा प्रेमीयुगलं आणि मुंबईत येणाऱ्या हौशा-गवशांचे आकर्षण आहे. पावसाळ्यातली मुंबई पाहणं एक नेत्रसुखद अनुभव आहे. तो घेण्यासाठी परदेशी पर्यटक पावसाळ्यात मरिन ड्राइव्हला हटकून भेट देतात. तसेच मुंबईकरांची पावलं या दिवसांत कठड्याकडे वळलेली असतात.
संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
याला वैद्यकीय भाषेत ‘हिपेटायटीस’ असे संबोधतात तर मराठीत त्याला ‘यकृतदाह’ असे म्हणतात. हिपेटायटिस म्हणजेच कावीळ हा आजार आजही भारतात चिंतेचा विषय आहे. सर्वात जास्त मृत्यू होण्यामध्ये कावीळ या आजाराचा तिसरा क्रमांक लागतो. पण, आजही कावीळबाबत लोकांमध्ये तितकीशी जनजागृती पाहायला मिळत नाही. खरंतर, दुषित पाण्यामुळे, उघड्या वरच्या खाल्लेल्या अन्नपदार्थांमुळे कावीळ होते. पण, आजही लोकांचा या आजारासाठी गावठी औषधं म्हणजेच झाडपाल्यांच्या औषधांकडे जास्त कल असल्याचं समोर आलं आहे. भारतात ५० टक्के नागरिक आजही कावीळसाठी झाडपाल्यांची औषधं वापरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात प्रत्येक ३० ते ४० सेंकदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा यकृताच्या आजाराने होतो. पण, तरीही आपल्या शरीरामधील पाचशेहुन अधिक कार्य करणाऱ्या आणि अनेक रोगांना दूर ठेवणाऱ्या यकृताच्या आजाराबद्दल अजूनही जागरूकता आलेली नाही. कावीळबाबत भारतामध्ये बरेच गैरसमज आहेत. जसे की, माळ बांधणे आणि कावीळ उतरणे या गैरसमजुतींचा या रोगाशी काहीही संबंध नाही. या अंधश्रद्धेतूनही अनेकदा लोकांचा जीव जातो. कावीळ आपणास अनोळखी नाही. डोळ्यांमधील पांढरा भाग पिवळा होणे, त्वचा पिवळसर दिसणे आणि लघवी गडद पिवळी होणे ही काविळीची लक्षणेही आपल्याला माहिती असतात. मुळात कावीळ हा काही आजार नव्हे, ते एक लक्षणच आहे.
कारण ते आपल्याला जाणवते, दिसून येते. कावीळ होण्याची कारणे अनेक आहेत. त्यांचा परिणाम यकृताच्या कार्यपद्धतीवर होत असतो. यात सर्वात महत्त्वाचे व नेहमी दिसून येणारे कारण म्हणजे यकृतावर झालेला विषाणूंचा हल्ला.
कावीळबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून २८ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड हिपेटायटिस डे’ म्हणून साजरा केला जातो.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तुमच्या गरजेनुसार योग्य कॉम्प्युटर कॉन्फिगरेशन (Computer Configuration) निवडण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या:
‘हिमालयाच्या शिखरावरूनी सांगू जगाला सा-या गर्जुनी। खबरदार जर इथे याल, तर सांडतील रक्ताचे सागर’, अशी गर्जना करीत तळहातावर शिर घेऊन झुंजणा-या सैनिकांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस. घरादाराला आणि आप्तस्वकीयांना दूर सारून देशासाठी, स्वबांधवांच्या रक्षणासाठी कोसळत्या पावसात आणि गोठविणा-या थंडीत लढणा-या सा-या लढवय्यांचाच आज स्मरणदिन.
आजच्या ध्वजदिनाच्या निमित्ताने त्या सर्व वीरांचा स्मृतिदिन. राष्ट्राच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ रणांगणात देह ठेवणा-या वीरांच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सढळ हाताने मदत करणे, हे त्यांचे.. आपले, सर्वाचे कर्तव्यच आहे. आज जमा होणारा निधी म्हणजे त्या नरवीरांना आदरांजली वाहण्याचीच एक संधी आहे. म्हणूनच आज एका व्यक्तीचा नाही, तर देशरक्षणार्थ आपल्या प्राणांची कुरवंडी करणा-या सा-या वीरपुत्रांचाच स्मृतिदिन. त्या वीरमरण पत्करलेल्या वीरांचे स्मरण करून आजही आपले सैनिक म्हणताहेत, ‘शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे। सज्ज व्हा उठा चला, सैन्य चालले पुढे।।’
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’ म्हणण्याचा प्रघात आहे.
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती.
मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ‘छोडो भारत’ची गर्जना आणि दिलेला ”करेंगे या मरेंगे” हा मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले.
यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ”आता प्रत्येकजणच पुढारी होईल.”
ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली.
बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किलल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.
नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले.
जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता.
सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले. गांधीजींना याचा इन्कार करून याच्या निषेधार्थ २१ दिवसांचे उपोषणही केले. पण जगभरातील परिस्थितीही बदलत होती. युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकत होते. अमेरिका नावाची सत्ता उदयास येत होती. तिने युद्धाचे पुढारीपण घेतले होते. या साऱ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीसंग्रामाची तीव्रता ओसरली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti