(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कापड खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

    कापड निर्मिती करताना त्याचा वापर कशाकरिता करावयाचा आहे, त्याचे महत्व प्रथम लक्षात घेतले जाते. त्याकरिता वापरले जाणारे तंतू, त्याचे सूतांक, ताणा-बाण्याची घनता अशा सर्व तांत्रिक बाबी ध्यानात ठेवल्या जातात.

  • जागतिक आदिवासी दिवस

    संयुक्त राष्ट्र संघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

    संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले. खरे तर १९७२ सालापासून युनोने आदिवासींच्या प्रश्नांना हात घालायला सुरुवात केली. आदिवासींच्या संदर्भात वाढत्या संघर्षामुळे १९७२ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाकडे आदिवासींच्या समस्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पुढे १८ डिसेंबर १९९० च्या युनोच्या आमसभेत १९९३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष म्हणून जाहीर केले आणि हे वर्ष १० डिसेंबर १९९२ च्या मानवाधिकार दिवसापासून सुरू झाले. या वर्षाच्या दरम्यान आदिवासींचे विविध प्रश्न जगासमोर मांडण्यात आले.

    भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गेटवे ऑफ इंडिया ९७ वर्षाचे झाले

    मुंबई म्हटले की पहिल्यांदा आठवते ते गेटवे ऑफ इंडिया. ही वास्तु ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू ठरली आहे.

  • ऑफसेट पद्धतीने छपाई

    लिथो पद्धतीने छपाई यशस्वी होऊ लागली पण तिचा वेग अत्यंत कमी होता. साधारण तीन दशकापूर्वीच लिथो छपाई नामशेष झाली. ऑफसेट छपाईत दगडाची जागा जस्ताच्या पत्र्याने घेतली. यंत्राच्या ठरलेल्या आकाराला, ठरलेल्या जाडीचा जस्ताचा पत्रा बसवून त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन त्याच्या ऑफसेट फ्लेट्स तयार होऊ लागल्या.

  • महाकवी कालिदास जयंती

    आज आषाढ मासारंभ होत आहे़. हा महिना जसा शेतकऱ्यांच्या, अध्यात्मिक भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसाच तो साहित्य विश्वाच्याही दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा आहे़ आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे आजची तिथी ही महाकवी कालिदास जयंती अलिकडे  ‘संस्कृत दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली ‘मेघदूतम’ ही कवी कालिदासांची साहित्यकृती अजरामर ठरली.

  • सर्वात पहिल्यांदा जनगणमन म्हटले गेले

    या गीताची पाच कडवी असून ती म्हणण्यास वेळ लागतो, यामुळे केवळ पहिलेच कडवे संबंध भारतात म्हटले जाते. पाचही कडव्यांच्या राष्ट्रगीताचे संकलन भारतीय संस्कृतिकोश खंड-८ यामध्ये प्रामुख्याने आढळते.

  • भारतीय प्रसारण दिवस

    ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन आकाशवाणी माध्यम मनोरंजन आणि प्रबोधन या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी काम करीत आहे.

  • व्हॅलेंटाइन डे

    ‘संत व्हॅलेंटाईन’ याने सम्राटाच्या आज्ञेविरोधात जाऊन प्रेमी युगल असलेल्या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून दिली. सम्राटाला ‘व्हॅलेंटाइन’च्या त्या कृतीचा खूप राग आला. त्याने चिडून जाऊन ‘व्हॅलेंटाईन’ला देहदंड दिला. ज्या दिवशी ‘व्हॅलेंटाईन’ला मरण आले, तो दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अर्थात ‘प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीयन देशात सुरू झाली.

  • जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिन

    हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, चीन येथे हुमेन या गावी फार मोठ्या प्रमाणात ओपियमची (खसखस) शेती केली जात होती. याच ओपियमच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात विविध ड्रग्ज (अंमली पदार्थ) बनविण्यासाठी व्हायचा. याच्या विरोधात लिन झीयू या व्यक्तीने खूप मोठे आंदोलन तेथे उभे करून यशस्वी केले. याच कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्या सन्मानार्थ २६ जून १९८९ पासून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.

  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा वर्धापन दिन

    २०१७ वर्षाच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदा पाच स्थानांची झेप घेतली आहे. आता रिलायन्सच्या पुढे रशियाची गॅस कंपनी गेजप्रॉम आणि जर्मनीची ई. ऑन या दोन कंपन्या आहेत.