हा चित्रपट काढण्यास राजकपूर यांना प्रवृत होण्यास एक कॉमिक जबाबदार आहे. राजकपूर नेहमी आर्ची कॉमिक्स वाचत असत, एक दिवस ते कॉमिक वाचत असताना त्यांतील एक संवाद त्यांना वाचण्यास मिळाला तो होता ‘यू आर टू यंग टू फॉल इन लव’ – ये उम्र नहीं है प्यार की. हा संवाद वाचून त्यांच्या डोक्यात वीज चमकल्या सारखे झाले व बॉबीची कल्पना आली.
१८ एप्रिल १९७५ रोजी "सामना" मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील "सामना‘ चित्रपट हे एक महत्त्वाचे वळण. ‘मारुती कांबळेचं काय झालं’ या अजरामर संवादासह सरपंच आणि मास्तर यांच्यातील संभाषणाची जुगलबंदी, . हा मास्तर, गप, गुमान र्हावा की… कशाला उगाच नसत्या चौकशा… आणि त्याच जोडीला ‘सख्या रे घायाळ रे हरिणी ’हे सामना चित्रपटांतील जबरदस्त गाणे व स्मशानशांतता असलेल्या महालांतील ती निघृण हत्या, याने गाजलेला गिरीराज पिक्चर्स या बॅनरचा 'सामना' हा चित्रपट. या चित्रपटाने राज्यातील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. एका ध्येयनिष्ठ मास्तरने (डॉ. श्रीराम लागू) एका सहकार सम्राटाच्या (निळू फुले) अस्तित्वास दिलेले आव्हान या कथासूत्राभोवती हा चित्रपट होता. हा चित्रपट झळकला आणि नंतर २५ जून रोजी देशात आणीबाणी जाहीर झाल्याने, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. विजय तेंडुलकरांची कथा-पटकथा-सवांद असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांचे होते. तर निर्मिते रामदास फुटाणे व माधव गालबोटे हे होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. "सामना" चित्रपटाने बर्लिन महोत्सवात भारताची ‘प्रवेशिका’ म्हणून गेलेला पहिला मराठी चित्रपट मान मिळवला. या चित्रपटात स्मिता पाटील यांनी छोटी भूमिका केली होती. 'या टोपीखाली दडलंय काय' या गाण्यात 'पप्पा……… ' स्मिता पाटील होत्या. डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अभिनयाचा 'सामना' खूप गाजला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा 'माईलस्टोन' सिनेमा आहे. त्या वेळी अवघ्या दीड लाख रुपयांत चित्रपट बनला गेला. बेचाळीस वर्षांनंतरही ब्लॅक एन्ड व्हाईट मध्ये असूनही हा चित्रपट आजही त्याच उत्साहाने बघितला जातो. व चित्रपटाची विविध संदर्भात विशेष चर्चा सुरु असतेच.
सामना १९७५ सामाजिक
३५ मिमी/रंगीत/११२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी७६७०५/२-१-१९७५./यू
निर्मिती संस्था :गिरीराज पिक्चर्स
निर्माता :रामदास फुटाणे, माधव गानबोटे
दिग्दर्शक :जब्बार पटेल
कथा :विजय तेंडुलकर
पटकथा :विजय तेंडुलकर
संवाद :विजय तेंडुलकर
संगीत :भास्कर चंदावरकर
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :शा. वैद्य
गीतलेखन :आरती प्रभु, जगदीश खेबुडकर,जब्बार पटेल
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :निवृत्त दळवी
वेषभूषा :पांडुरंग खटावकर
नृत्य दिगदर्शक :सोहनलाल
स्थिरचित्रण :डी. व्ही. राव
गीत मुद्रण :बी.एन्.शर्मा, रॉबिन चटर्जी
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार, बाबा लिंगनूरकर
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओज्, कोल्हापूर, शालिनी स्टुडिओज्, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज
कलाकार :अस्वले गुरुजी, आबू, आशा पाटील, उदय लागू, उषा नाईक, औंधकर, नंदू पोळ, निळू फुले, भालचंद्र कुलकर्णी, मीटकर, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रमेश टिळेकर, लालन सारंग, विलास रकटे, शहाजी बारे, शिवाजी भोसले, श्रीराम लागू, संजीवनी बिडकर, सुरेखा शहा, स्मिता पाटील, हेमसुवर्णा
पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, रवींद्र, श्रीराम लागू
गीते :१) कुण्याच्या खांद्यावर कुणाचे ओझे, २) हा महाल कसला रानझाडी ही दाट, ३) कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगिल काय या टोपीखाली दडलय काय?, ४) सख्या चला बागांमधी रंग खेळू चला, ५) रंगमहाली रंगबाजीचा डाव आला रंगाला
कथासूत्र. खेड्यातून आता श्रीमंत झालेला बागाईतदारांचा एक वर्ग राजकारणात शिरून पुढारी बनतो व अनेक कृष्णकृत्ये करतो आणि अशा तथाकथित पुढाऱ्यांना वेळीच काबूत ठेवले पाहिजे हे कथासूत्र.हिंदुराव धोंडे पाटील हे पुढारी आणि जुने ज्वलंत गांधीवादी मास्तर.दोघांची मैत्री जमली.म्हणजे पाटलांनी चातुर्याने जमवली.पण एका खुनाच्या प्रकरणाने मास्तर अस्वस्थ झाले आणि पाटील व मास्तर असा सामना सुरु झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
खालील लिंक क्लिक करून "सामना‘ चित्रपट बघू शकता.
https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo
https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM
३१ जुलै १९९५ रोजी भारतातील मोबाईल सेवा सुरू झाली. कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला, हा कॉल केला होता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी. मोबाइलचे जाळे देशात पहिल्यांदा कोठे अंथरले जाईल तर ते कोलकात्यामध्येच, हा त्यांचा हट्टाग्रह होता. ते सुरू झाले तेव्हा त्यांनी रायटर्स बिल्डींगमधून तेव्हाचे केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल फोन केला.
ठरल्याप्रमाणे वर्षभर ही मालिका चालणार होती. त्यानुसार ५२ भाग प्रसारित करण्याचे ठरविले होते. १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत गीतरामायण प्रसारित करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीवरून लोक गीतरामायण ऐकायचे. हाच भाग शनिवारी व रविवारी पुन्हा त्याचवेळी ऐकविला जायचा. योगायोग असा की, यंदाच्या वर्षाप्रमाणे ५५ सालीही अधिक मास होता. त्यामुळेच ५२ भागांवरून ५६ भाग झाले. अर्थात ५६ गाण्यांची निर्मिती झाली.
"मला सर्वांना वापरता येईल अशी मोटार बनवायची आहे." ३० वर्षांचा फोर्ड सर्वांसमोर आपल्या नवीन तयार केलेल्या मोटारीचे डिझाईन पेश करत होता. त्यांचा जन्म ३० जुलै १८६३ रोजी झाला.
"हि फोर्ड मोटार दणकट, वजनाला हलकी फक्त १००० पौंड वजनाची आहे. ४ सिलिंडर इंजिनाची हि गाडी ताशी ४५ मैल वेगाने धावू शकते. सध्या हिची किंमत फक्त $९०० आहे. हिच्या बरोबरीच्या गाड्या साधारणपणे $१५०० ला विकल्या जातात. आणि यामुळेच हि गाडी सर्वांना परवडणारी जगातील पहिली गाडी असेल." असे म्हणून त्याने सर्वांच्या पुढे आपल्या गाडीचे एक चित्र सरकवले. हेन्री फोर्डच्या उद्योगीपणाचा अनुभव त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना त्याच्या लहानपणा पासूनच येऊ लागला होता. त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला एक पॉकेट वॉच आणून दिले होते. त्यात तो रमला. इतका की तो पंधरा वर्षाचा होई पर्यंत त्याने आपले शेजारी आणि मित्र यांची घडय़ाळे शंभरदा उघडली आणि पुन्हा त्यांची जुळवणी केली. तो तेरा वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरपले आणि तो जवळपास मानसिकरीत्या उध्वस्त झाला. त्याचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते.
समजू लागले त्या वयापासूनच यंत्राशी त्यांची मैत्री झाली, या यंत्रांच्या ओढीनेच ‘अश्वहीन रथ’ म्हणजेच मोटरगाडी बनविण्याचे त्यांना पडलेले स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीने केलेले कठोर परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. घोडय़ाशिवाय कधी रथ चालतो काय, अशी चेष्टा लोक करीत. शेवटी अनेक दुरुस्त्या करीत १८९३ मध्ये त्याने आपली गाडी रस्त्यावर आणलीच. मात्र पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले, या गाडीच्या आवाजाने घोडे उधळतात,गाई दूध देत नाहीत, कोंबडय़ा अंडी घालत नाहीत, रस्ते खराब होतात, अशा तक्रारी लोक करीत होते. आज हे वाचताना गंमत वाटते.अशा तक्रारी लोक करू लागले. शेवटी डेट्रॉइटच्या नगरपालांकडून हेन्री फोर्ड यांनी गाडी चालविण्याचा परवाना काढला.अमेरिकेतला हा पहिला परवाना होता.
हेन्री फोर्ड यांचे ७ एप्रिल १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / विनोद शिवाजी गोरे
या आत्मचरित्रात एकामागून एक प्रसंगांच्या लडी उलगडत जातात. कौटुंबिक कापडखरेदी, सूट शिवणं, मुलांची शालेय प्रगती, सहकुटुंब नाटकाला जाणं, मावशीच्या पार्ल्यातल्या बिऱ्हाडाचा शोध, विडीचा ज्वलंत प्रश्न, खिसा कापला जाणं, ज्योतिष आणि अध्यात्मिक अनुभव, सारं कांही मध्यमवर्गी कारकुनी जीवनाचं सार!
या नाटकाचे कथानक श्रीकृष्ण चरित्रातील एका लोकप्रिय प्रसंगावर आधारलेले आहे. नारद हा या कथानकातील सूत्रधार असल्याने संगीतानुकूल वातावरण आपोआपच निर्माण होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली विद्यार्थी संघटना आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली होती. देशातील विविध विद्यापीठांमधील डाव्या विचारांचा पगडा कमी करणं हा अभाविपच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता.
स्विगी.! झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी..! १४ ऑगस्ट २०१४ ला सुरु झालेली ही कंपनी. अल्पावधीतच ग्राहकांच्या लोकप्रियतेला पात्र ठरणारी कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. या कंपनीची स्थापना नंदन रेड्डी, राहुल जेमिनी आणि श्रीहर्ष मजेती या तिघांनी केली. यातील नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मजेती हे दोघे बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स) पिलानीचे विद्यार्थी.
या दोघांनी 'बंडल' नावाची कुरिअर लॉजिस्टिक्स कंपनी सुरु केली. वर्षानंतर लोकल हॉटेल व्यावसायिकांशी जोडुन फुड ऑर्डर डिलिव्हरीची सुरुवात केली. आयआयटी खरगपूर येथे शिकणाऱ्या राहुल जेमिनी यांच्याशी या दोघांची ओळख झाली. राहुल हे 'मिंत्रा'चे संगणक अभियंता म्हणून कार्यरत असणारे व्यक्ती. असे तिघे मिळवून स्विगी चालवू लागले.
स्विगीवर बिर्याणी, बटर नान, फ्राइड राईस हे पदार्थ सर्वाधिक मागविले जातात. ५७% ऑर्डर्स वेब तर ४३% ऑर्डर्स या अॅइपच्या माध्यमातून दिल्या जातात. स्विगीच्या एका आकडेवारीनुसार ५५,०००+ हॉटेल्स, १,२०,०००+ डिलिव्हरी पार्टनर्स, ५,०००+ मनुष्यबळ कार्यरत आहेत. आज स्विगी कंपनीचे बाजारमुल्य ३.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके आहे. अॅसपचे १० लाखांहून अधिक वापरकर्ते जगभरात आहेत. १५ हुन अधिक आर्थिक संस्थांनी भांडवल स्वरूपात १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स पेक्षा अधिक मदत केली आहे.
स्विगीच्या अॅीपमध्ये मुख्य गोष्टी तीन. पहिली ग्राहक, दुसरी डिलिव्हरी पार्टनर्स, तिसरी हॉटेल्स!
५००० ते ७५०० ग्राहक प्रतिदिन या अॅयपवर फुड ऑर्डर करतात. ग्राहकांना वेगवेगळे कॅशबॅक देऊन आकर्षित केले जाते. ग्राहक त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे ऑर्डर करू शकतो. मेंबरशिप असणाऱ्या ग्राहकांना विशेष ऑफर्स दिल्या जातात. अॅडपवर येणाऱ्या ऑर्डर्समधून ग्राहकाचा खाण्यापिण्याचा ट्रेंड शोधला जातो. त्यानुसार पुढील वेळी त्याच्या आवडीच्या हॉटेलचे अन्नपदार्थ स्क्रीनवर दाखवले जातात. ग्राहकांकडून किरकोळ स्वरूपात डिलिव्हरी चार्जेस आणि पॅकेजिंग चार्जेस आकारले जातात. जर आपण प्रीमियम सभासद असाल तर हे चार्जेस आकारले जात नाहीत. सांगलीत जवळपास ४०० हून अधिक युवकांना येथे रोजगार मिळाला आहे. यामध्ये तरुण वर्गापासून आबालवृद्ध लोक कार्यरत आहेत.
पार्ट टाईम तसेच फुल टाईम अशा वेळेत काम करू शकता. जॉबला लागल्यानंतर सर्वसाधारणता १,००० रु. भरावे लागतात. (दोन्ही कंपनीचे नियम वेगवेगळे आहेत.) दर आठवड्याला कामाचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा होतात. फुल टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ८,००० ते रु. १५,००० दरम्यान पगार मिळतो. पार्ट टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ६,००० ते रु. ११,००० दरम्यान पगार मिळतो.
ऑर्डर्स ऑनलाईन येत राहतात. त्याप्रमाणे त्या स्वीकारून हॉटेलमधून घेऊन ग्राहकापर्यंत पोहोचविल्या जातात. हॉटेल्सकडून या कंपन्या १०-२५% कमिशन चार्ज आकारतात. हॉटेल चालकांना एकसलग ऑर्डर्स मिळतात म्हणून ते देखील आनंदाने पैसे देऊ करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्या काळात बिकिनीकडे चुकीच्या पद्दतीने देखील पहिलं गेलं. बिकिनी परिधान केलेल्या महिलांमध्ये मादकताच जास्त दिसते असे अनेक आरोप झालेत. आणि म्हणूनच महिला बिकिनी घालण्यास फारशा धजावत नव्हत्या. अशात बिकिनीचा खप वाढावा म्हणून बिकिनी विकण्यासाठी वापरण्यात येणारी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य आणि मुक्तपणाच प्रतिक म्हणून बिकनीची जाहिरातबाजी केली गेली आणि त्यानंतर महिलांनी देखील बिकिनीला याच नोटवर आपलंस केलं आणि बिकीनीचा वापर करण्यास सुरवात केली.
Copyright © 2025 | Marathisrushti