(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तेलगू देशम पक्षाचा वर्धापन दिन

    १९९४ सालात एन. टी. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तेलगू देसम पक्षाने पुन्हा बहूमत मिळवले. किंबहूना सामान्य मतदाराला उघड आमिष दाखवून मते मिळाणारी ती पहिली निवडणूक असावी. एक रुपया किलो तांदूळ देण्याच्या आश्वासनाने रामाराव यांना प्रचंड बहूमत मिळालेले होते.

  • राजकमल कलामंदिरचा वर्धापन दिन

    राजकमल बद्दल त्या काळी असे म्हणले जायचे की निर्मात्याने स्क्रिप्ट घेऊन यावे व चित्रपटाची रिळे घेऊन जावी. व्ही.शांताराम यांनी राजकमल मध्ये एडिटींग, रेकॉर्डिग, डबिंग, मिक्सिंगचे स्टूडियो बनवले होते. या स्टुडिओमध्ये ब्लॅक आणि व्हाइट चित्रपटाची प्रोसेसिंग लॅबही होती.

  • अमेरिकेचा जपानवर अणुबॉम्बचा हल्ला

    ६ ऑगस्ट १९४५ ची सकाळ ही जगाला हादरून टाकणारी सकाळ ठरली होती. या दिवशी अमेरिकेने जपानचे शहर अणुबॉम्बचा वापर करून उध्वस्त केले. याला आज ७४ वर्षे पुर्ण झाली.

    उद्धवस्त झालेले हिरोशिमा शहराने राखेतून निर्माण होणा-या फिनिक्स पक्षासारखी पुन्हा झेप घेतली. आज संपूर्ण हिरोशिमा शहर एक नवं रूप घेऊन उभे आहे. आज कुणालाचा वाटणार नाही या शहरात, कधीकाळी अणुबॉम्ब फुटला होता आणि हे शहर बेचिराख झाले होते. हिरोशिमाही आज जपानमधील इतर शहरांसारखे विकसित झाले आहे. आपला भुतकाळ विसरून हे शहर प्रगती करत आहे. झपाट्याने या शहराचा विकास होत आहे. चोहीकडे मोठमोठ्या इमारती पाहायला मिळत आहेत. या शहराचा भुतकाळ विसरता येत नसला तरी वर्तमानामध्ये हे शहर आनंद आहे. उद्धवस्तो झालेल्या या शहरात आज दोन लाख नागरिक राहात आहेत. अणुबॉम्बने बेचिराख झालेले हिरोशिमा पुन्हा उभे राहिले आहे. विध्वंसाच्या पाऊलखुणा मात्र आज कुठेच दिसत नाहीत.

    जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. त्यानंतर आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. जपानच्या शरणागतीची कलमे जाहीर करण्यासाठी अमेरिकेचे हॅरी ट्रमन, इंग्लंडचे चर्चिल आणि तैवानस्थित चँग कै शेक यांची बैठक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमुळे लांबत होती. जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी अमेरिकेने जुलै १६ रोजी केल्यानंतर ट्रमन यांनी ती बातमी २४ जुलै रोजी स्टालिन यांना दिली. हेरगिरीतून ही बातमी स्टालिन यांना आधीच कळाली होती. सोविएत रशियाने जपानवर हल्ला करण्याची जोरदार तयारी चालविल्याची बातमी ट्रमन यांनादेखील हेरगिरीतूनच कळाली होती. महायुद्धाने स्पर्श न केलेल्या हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्टनंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याची आज्ञा जनरल कार्ल स्पाट्झ यांना २५ जुलै रोजी मिळाली.

    दुसऱ्याच दिवशी जपानला शरणागतीचा निर्वाणीचा इशारा देणारी ती लांबलेली बैठक जर्मनीतील पोस्टडॅम येथे झाली. त्याच दिवशी तो इशारा आणि इशारा न पाळल्यास ‘न भूतो..’ हानी करण्याची धमकी नभोवाणीवरून प्रथम इंग्रजीत आणि नंतर दोन तासांनी जपानी भाषेत जपानकडे पोहोचविली. राजनैतिक पातळीवरून हा इशारा मात्र जपानी शासनाला पोहोचविला नाही. रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला.

    हिरोशिमानंतर तीनच दिवसांत नागासाकीवर अमेरिकेने असाच आणखी एक अणुबॉम्ब टाकला. पुन्हा तसाच नरसंहार झाला. काही दिवसांतच जपानने शरणागतीचे पांढरे निशाण फडकवले. दुसरे महायुद्ध संपले; ते अमेरिका व दोस्त राष्ट्रांनी जिंकले पण माणुसकी मात्र पराभूत झाली. आजच्या दिवशी मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी देशोदेशींचे लाखो लोक जागवितात. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’ असे म्हणत पुन्हा कधीही कोणीही अणुबॉम्बचा वापर करू नये अशी इच्छा व्यक्त करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • वेस्ट इंडिज संघाचा पहिला विश्वचषक विजय

    क्लाइव्ह लॉईड व व्हिव्हियन रिचर्ड्स हे या सामन्याचे हिरो ठरले. प्रथम फलंदाजी करताना लॉईडने ८५ चेंडूंत १२ चौकार व दोन षटकार ठोकून १०२ धावा केल्या, तर रिचर्डसच्या अचूक फेकीने ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद झाले.

  • जागतिक व्याघ्र दिन

    जागतिक व्याघ्र दिन हा दरवर्षी २९ जुलैला साजरा केला जातो. हा दिवस खास , जगभरातील वाघांचे संगोपन आणि संरक्षण व्हावे तसेच ह्यांची कमी झालेली संख्या वाढावी ह्या हेतूने साजरा केला जातो. हा दिवस पहिले साजरा केला गेला सेंट पिटर्सबर्ग (रशियातील एक शहर) येथे आणि वर्ष होते २०१०. वाघाच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करणे , जागतिक जागरूकता वाढविणे आणि व्याघ्र संवर्धनाच्या प्रश्नांना पाठबळ देणे हे ह्या दिवसाचे उद्दिष्ट आहे.

    भारतात १९७३ साली ' प्रोजेक्ट टायगर ' सुरू झाले होते. त्यावेळी ९ व्याघ्रप्रकल्प होते आजमितीला ५० व्याघ्रप्रकल्प आहेत.

    महाराष्ट्रात बोर , मेळघाट , नवेगाव - नागझिरा , पेंच , सह्याद्री आणि ताडोबा या सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघ असल्याचे नवीन गणनेनुसार सांगण्यात आले आहे.

    - आदित्य दि. संभूस

    संदर्भ - माहितीजाल

    फोटो सौजन्य - गूगल

  • सशस्त्रसेना ध्वज दिन

    ‘हिमालयाच्या शिखरावरूनी सांगू जगाला सा-या गर्जुनी। खबरदार जर इथे याल, तर सांडतील रक्ताचे सागर’, अशी गर्जना करीत तळहातावर शिर घेऊन झुंजणा-या सैनिकांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस. घरादाराला आणि आप्तस्वकीयांना दूर सारून देशासाठी, स्वबांधवांच्या रक्षणासाठी कोसळत्या पावसात आणि गोठविणा-या थंडीत लढणा-या सा-या लढवय्यांचाच आज स्मरणदिन.

    आजच्या ध्वजदिनाच्या निमित्ताने त्या सर्व वीरांचा स्मृतिदिन. राष्ट्राच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ रणांगणात देह ठेवणा-या वीरांच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सढळ हाताने मदत करणे, हे त्यांचे.. आपले, सर्वाचे कर्तव्यच आहे. आज जमा होणारा निधी म्हणजे त्या नरवीरांना आदरांजली वाहण्याचीच एक संधी आहे. म्हणूनच आज एका व्यक्तीचा नाही, तर देशरक्षणार्थ आपल्या प्राणांची कुरवंडी करणा-या सा-या वीरपुत्रांचाच स्मृतिदिन. त्या वीरमरण पत्करलेल्या वीरांचे स्मरण करून आजही आपले सैनिक म्हणताहेत, ‘शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे। सज्ज व्हा उठा चला, सैन्य चालले पुढे।।’

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • छोटी सी बात चित्रपट

    अमोल पालेकर, विद्या सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अमोल पालेकर यांच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. चित्रपटाचा नायक हा लहानपणापासून आपल्या आई-वडिलांच्या छायेत वाढलेला असतो.

  • हॅलोविन डे

    ह्या दिवशी लोक विविध प्रकारचा भुताचा, पिशाचांचा, चेटकिणीचा, वेश परिधान करून रस्त्यांवर उतरतात. तसेच बरेच जण चांगल्या भूतांचे देखील कपडे परिधान करतात. ठिकठिकाणी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले जाते.

  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा वर्धापन दिन

    २०१७ वर्षाच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदा पाच स्थानांची झेप घेतली आहे. आता रिलायन्सच्या पुढे रशियाची गॅस कंपनी गेजप्रॉम आणि जर्मनीची ई. ऑन या दोन कंपन्या आहेत.

  • जागतिक दहशतवादविरोधी दिन

    जागतिक दहशतवादाचा सगळ्यात मोठा हादरा भारताला बसलेला आहे, यामुळे भारतीय युवकांची भूमिका दहशतवादाला समूळ नष्ट करण्याची असली पाहिजे. आमच्या देशात येऊन घातपाती कृत्य करणाऱ्या अतिरेकींना धडा शिकविण्यास सज्ज असले पाहिजे.