(User Level: User is not logged in.)

दिनविशेष

एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इ‌थे

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतीय पत्रकारिता दिवस

    मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली.

  • नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर शहरात प्रथमच ‘स्वतंत्र’ भारताचा ध्वज फडकवला

    १९४३ साली दुसरे महायुद्ध चालू होते. नेताजींनी जपान व जर्मन सरकारांशी संगनमत करून आझाद हिंद सेनेकडून ब्रिटिश प्रदेशावर आक्रमणे सुरू केली. या मोहिमेचा भाग म्हणून अंदमान-निकोबार द्विप समुह त्यांनी जिंकला.

  • चतुरंग प्रतिष्ठानचा ४७ वा वर्धापन दिन

    मुंबईतील गिरणगावात सुरू झालेली आणि कालांतराने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारी ‘चतुरंग प्रतिष्ठान’ ही संस्था. संगीत, नाटय़, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानची स्थापना अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर १९७४ रोजी झाली.

  • जागतिक सायकल दिवस

    हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीमध्ये तर वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सम-विषमचा प्रयोग केला गेला. वाढत्या प्रदूषणाचा धोका वेळीच ओळखला नाही तर दिल्लीसारखी परिस्थिती आपल्या शहरातही उद्भवू शकते. त्यामुळे यावर उपाय करता येण्याजोगा एकच पर्याय आहे. तो म्हणजे शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात प्रवासासाठी सायकलचा वापर करणे. प्रदूषण रोखण्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीही सायकल चालविणे उत्तम व्यायाम ठरतो.

  • कटी पतंग’ चित्रपट प्रदर्शित झाला

    शक्ति सामंत यांनी दिग्दर्शित केलेल्या कटी पतंगमध्ये राजेश खन्ना व आशा पारेख ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. प्रेम चोप्रा, बिंदू, नझीर हुसेन, सुलोचना, नाझ, सत्येन कप्पू, मदन पुरी, डेझी इराणी, ज्युनियर महमूद आणि हनी इराणी यांनी सुद्धा या चित्रपटात अभिनय केला आहे.

    कटी पंतगमधल्या भूमिकेसाठी आशा पारेख यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

    हा सिनेमा गुलशन नंदा ह्या प्रसिद्ध लेखकाच्या 'कटी पतंग' कादंबरीवर आधारित आहे. चित्रपट बनवतांना अगदी पुस्तकाप्रमाणेच केला आहे. गुलशन नंदा ह्यांच्या कादंबऱ्यांवरील आणखी सिनेमे म्हणजे दाग, खिलौना असे खूप आहेत.

    या चित्रपटातली गाणी खूपच प्रसिद्ध झाली होती. ये श्याम मस्तानी, प्यार दिवाना होता है, ये जो मोहब्बत है, जिस गलीमें तेरा घर आणि टायटल सॉंग ना कोई उमंग है,आज ना छोडेगे, मेरा नाम शबनम ही सर्व गाणी असंख्य भारतीयांच्या ऑल-टाईम फेवरीट लिस्ट मध्ये असतील. अर्थात संगीत आर.डी बर्मन यांचे, किशोरकुमार, मुकेश, लता आणि आशा असे गायक गायिका असल्यावर दुसरं आणखी काय होणार म्हणा. उत्तम संगीत, अर्थपूर्ण संवाद व सुरेख चित्रीकरण या मुळे हा चित्रपट ४९ वर्षे झाली तरी अजून बघावासा वाटतो.

    कटी पतंग चित्रपट

    https://www.youtube.com/watch?v=U44HKiKsB78

    कटी पतंग चित्रपटातील गाणी

    https://www.youtube.com/watch?v=7HTW1uUIIWQ

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • जागतिक पुस्तक दिवस

    आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनसा झाला आहे.

  • बालदिन

    पंडित नेहरूंचे लहान मुलांवर अतिशय प्रेम होते. पडिंत नेहरू यांनी लहानमुलांच्या शिक्षणावर आणि संभाळावर अधिक भर दिला होता. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य असे ते म्हणत.

  • ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची ५४ वर्षे

    ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची ५४ वर्षे

    हिंदुस्थानी संगीत, संगीतातील घराणी, घराण्यांचा अभिनिवेश आणि दोन भिन्न घराण्यांच्या गायकांमधील संघर्ष हा ‘कट्यार’चा विषय. या नाटकाला काहीजणांनी आदर्श संगीत नाटक म्हटलं. काहींनी परंपरेला सोडून असलेलं नाटक म्हटलं. याच्यासारखं नाटक पूर्वी झालं नाही असंही काहीजणांनी म्हटलं.

  • गुड फ्रायडे

    आजच्या गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आले होते. येशूच्या बलिदानाचा हा दिवस म्हणून तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो, पण त्याचबरोबर ‘होली फ्रायडे’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘इस्टर फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो.

  • जागतिक अस्थमा दिवस

    जगभरात असणाऱ्या दमा किंवा अस्थमाच्या रुग्णांमध्ये आणि या विषयी संभ्रम मनात असणाऱ्यांमध्ये याबाबतची जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो.